महालोकवाणी न्यूज: चयापचय गतिमान करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे चालणे. ताशी ८ किमी किंवा त्याहून अधिक वेगाने चालल्याने अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होतो. विशेष म्हणजे १० मिनिटांच्या चालण्याचाही शरीराला फायदा होतो. दररोज ६० मिनिटे चालण्याचे शरीराला वेगवेगळे फायदे होतात. १० मिनिटे चालणे : साखर नियंत्रित होते नियमित १० मिनिटांच्या चालण्यामुळे फास्टिंग आणि पोस्ट मील ब्लड ग्लुकोज सुधारते. रात्रीच्या जेवणानंतर ते जास्त फायदेशीर आहे. टाइप २ मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी दररोज किमान ५००० पावले चालणे आवश्यक आहे. यामध्ये ३००० स्टेप्स ब्रिस्क वॉक म्हणजे गाणे गाता न येण्याएवढ्या वेगाने. 20 मि. चालणे : वृद्धत्व प्रक्रिया मंदावते दिवसातून २० मिनिटे वेगवान चालण्यामुळे मायटोकॉडियाच्या…
Author: mahalokwani
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार शनिवार दि.11.03.2023 रोजी कर्जत येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असता, जामखेड शहरातील व्यापारी असोसिएशनच्या वतीने जामखेड मधून जाणारा राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी राज्याचे महसूलमंत्री तथा अ.नगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.जामखेड व्यापारी असोसिएशन च्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, जामखेड शहरातील जाणारा राष्ट्रीय महामार्ग मध्ये शहरातील दोन किलोमीटर अंतरा मध्ये डिव्हायडर एरिया व युटिलिटी एरिया हा कमी करावा याकरिता आज रोजी जामखेड व्यापारी असोसिएशन च्या वतीने निवेदन देताना जामखेड व्यापारी असोसिएशन चे शरद शिंगवी, आकाश बाफना, अशोक बाफना, कांतीलाल खिंवसरा आदी सर्व व्यापारी असोसिएशनचे कार्यकर्ते…
महालोकवाणी न्यूज: परळीत( parali) पुन्हा एकदा मुंडे बहीण-भावात शाब्दिक चकमक सुरु झालीय. आपण दुसऱ्यांच्या कामाचं श्रेय घेत नाही, असा टोला पंकजांनी लगावला होता. त्यावरुन पलटवार करताना धनंजय मुंडेंनी पंकजांना खुलं आव्हान दिलंय. परळी तालुक्यातल्या इंदपवाडी आणि जीरेवाडीत जलजीवन कामाचं भूमिपूजन धनंजय मुंडेंच्या हस्ते झालं. यावेळी धनंजय मुंडेंनी, पंकजा मुंडेंच्या काळातील भूमीपजूनं आणि वारस्यावरुन डिवचलं. गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंमध्ये शाब्दिक चकमक सुरु झालीय…व्हिलन कोण ? म्हणत नाव न घेता, पंकजांनी धनंजय मुंडेंवर टीका केली होती. बीड (Beed) आणि विशेषत: परळीचं राजकारण म्हटलं की, धनंजय आणि पंकजा मुंडेंच्याच अवतीभवती फिरतं. त्यामुळं कोणत्या ना कोणत्या कारणावरुन अशी शाब्दिक चकमक…
महालोकवाणी न्यूज: सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी: ह.भ.प सतीश आजिनाथ बडे रा.जोगेवाडी ता. पाथर्डी, अहमदनगर यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या संस्कृत विषयात शास्त्रीय परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवत यश मिळवले आहे.सतीश बडे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोगेवाडी या ठिकाणी झाले आहे.तर श्री वामनभाऊ विद्यालय चिंचपूर पांगुळ या ठिकाणी इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण झाले. व उच्च माध्यमिक शिक्षण प्रतिनिधी हायस्कूल अँड जी.डी.बापू लाड कुंडल ता. पलूस जि.सांगली या ठिकाणी झाले आहे. शास्त्री ही पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तीन वर्ष इतका कालावधीत पूर्ण करावा लागतो. सदर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी बडे यांना प्रो.संस्कृती, विभाग प्रमुख अंबरीशजी खरे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. ह.भ.प.बडे…
महालोकवाणी न्यूज: जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार आज दि.11.03.2023 रोजी बारामती येथे देशाचे केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी आले असता, आज रोजी जामखेड व्यापारी असोसिएशनच्या वतीने जामखेड मधून जाणारा राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी देशाचे नेते माजी केंद्रीय कृषि मंत्री आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते ना.अजित पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, आपले लोकप्रिय आमदार रोहित पवार यांच्यासमवेत जामखेड व्यापारी असोसिएशन तर्फे निवेदन देताना राजेंद्र कोठारी सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस, ज्येष्ठ नेते अशोक शिंगवी, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर राळेभात, जेष्ठ नेते सुरेश भोसले, व्यापारी महासंघाचे ज्येष्ठ नेते अशोक चोरडिया, अजय कोठारी, सिव्हिल इंजिनियर मोसम बोगावत,…
निघोज येथे आ. निलेश लंके यांचा वाढदिवस साजरा निघोज : विशेष प्रतिनिधी कांद्याचे भाव वाढले म्हणून दंगा करणारे भाजपावाले भाव पडल्यावर कांद्याकडे ढुुंकूनही पहायला तयार नसल्याची टीका करीत कांदा, ऊस तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेच्या अधिवेशनात आवाज उठविण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी निघोज येथे बोेलताना सांगितले. दरम्यान, तालुक्याच्या हितासाठी काही ना काही केले पाहिजे यासाठी सतत कार्यरत असलेल्या आ. नीलेश लंके यांनी सतत सामान्य माणसाच्या हिताची जपवणूक करण्यासाठी प्रयत्न केल्याचे गौरवोद्गारही पवार यांनी यावेळी काढले. आ. नीलेश लंके (Nilesh Lanke) यांचा वाढदिवस, निघोज पतसंस्थेचे बाबासाहेब कवाद निघोज नागरी पतसंस्था असे नामकरण, स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचे लोकार्पण,…
मुंबई : बिग बाॅस 15 मधून खरी ओळख मिळवणारी टिव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. बिग बाॅस 15 मधूनच तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांची लव्ह स्टोरी सुरू झाली. तेजस्वी प्रकाश हिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी करण हा थेट तेजस्वी हिला गोव्याला घेऊन गेला होता. अनेकदा हे दोघे स्पाॅट होतात. इतकेच नाहीतर नागिन मालिकेच्या सेटवर करण अनेकदा तेजस्वी प्रकाश हिला घेण्यासाठी देखील येतो. ज्याचे काही व्हिडीओ हे यापूर्वी व्हायरल झाले आहेत. करण कुंद्रा याची आई देखील तेजस्वी प्रकाशच्या घरी जाते. गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा रंगत आहेत की, तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांचे ब्रेकअप झाले आहे.…
H3N2 Influenza Symptoms: 3 वर्षांनंतर आता कुठे भारतासह संपूर्ण देशाची कोरोनाच्या महामारीपासून सुटका होत होती, मात्र अशातच इन्फ्लूएंजा व्हायरस H3N2 ने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्दी आणि ताप यांच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. याची वेळीच काळजी घेतली नाही तर हा साधा त्रास जीवघेणा ठरू शकतो. इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच ICMR च्या म्हणण्यानुसार, गेल्या 2-3 महिन्यांमध्ये इन्फ्लूएंजा व्हायरसच्या A सबटाइप H3N2 मुळे सर्दी, खोकला आणि ताप यांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, H3N2 मुळे रूग्णालयात दाखल करणाऱ्या रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक, पंजाब आणि हरियाणा या भागांमध्ये H3N2 मुळे मृत्यू…
महालोकवाणी न्यूज: कर्जत / जामखेड | नुकतीच कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. काल अर्थसंकल्पीय भाषणामध्ये थोर व्यक्तींच्या जन्मभूमीच्या बाबतीत बोलत असताना अनावधानाने पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा उल्लेख अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राहिला होता तो उल्लेख महापुरुषांच्या जन्मभूमीच्या विकासाच्या बाबतीत जेव्हा ते उत्तर देतील त्या उत्तरात ते सकारात्मक राहतील असा विश्वास व्यक्त करत चौंडी या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळासाठी मोठ्या प्रमाणात निधी द्यावा, अशी मागणी यावेळी आमदार रोहित पवार यांनी केली तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात जो निधी देण्यात आलेला आहे त्यावर असलेली स्थगिती देखील उठवण्यात यावी अशी विनंती उपमुख्यमंत्री…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड शहरातील महावीर भवन येथे दि.९ मार्च रोजी सायंकाळी ८ वाजता व्यापारी,टपरीधारक तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते व नेते यांची जामखेड 548 D अतिक्रमण संदर्भात बैठक पार पडली या या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी व्यापारी व टपरीधारकांना पाठिंबा दिला व जामखेड शहरातील सर्व टपरीधारक व व्यापाऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही. या करिता आज रोजी जामखेड तहसिल कार्यालय येथे तहसिलदार योगेश चंद्रे व जामखेड पोलीस स्टेशन चे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की,जामखेड हे बीड, नगर, सोलापूर व उस्मानाबाद या चार जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील शहर आहे त्यामुळे जामखेड शहराची बाजारपेठ अतिशय मोठी व…