आपल्यावर पाळत ठेवली जात असून, घातपात घडविण्याचाही प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला. महालोकवाणी न्यूज: माजी मंत्री अशोक चव्हाण यांच्या मंत्रिपदाच्या लेटरहेडचा गैरवापर करून अज्ञात व्यक्तींनी बदनामी कारक बनावट पत्रे तयार केले असल्याची तक्रार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पोलिसांत केली आहे. एवढेच नव्हे तर आपल्यावर पाळत ठेवली जात असून, घातपात घडविण्याचाही प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला. या प्रकारावर खुलासा करत अशोक चव्हाण म्हणाले की,माझ्या लेटर पॅडचा दुरुपयोग होत असून माझ्यावर पाळत ठेवली जात आहे. माझा विनायक मेटे करण्याचा काही लोकांचा डाव असल्याचा गंभीर आरोप चव्हाणांनी केला. मी खोटं बोलून नेतृत्व करत नाही. आम्ही तुमचं नावं घेत…
Author: mahalokwani
निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना पक्षाचं आणि आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह काढून घेतलं आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. एक कार्यकर्ता (एकनाथ शिंदे) पक्ष प्रमुख बनला. मात्र उद्धव ठाकरे यांना आता पक्ष उभारण्याची मेहनत घ्यावी लागणार हे नक्की. सध्याचं राजकारण बघता आठवण येते ती म्हणजे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांचे सुपुत्र जगन मोहन रेड्डी यांची. जगन मोहन रेड्डी ची कहाणी अगदी एका सिनेमासारखीच आहे. यशस्वी उद्योजक ते राजकारणी आणि नंतर राज्याचा मुख्यमंत्री होण्यापर्यंतच्या प्रवासात त्यांनी खूप संघर्ष केला. नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत रेड्डी यांच्या पक्षाने दणदणीत विजय मिळवला. चला तर जाणून घेऊ.. YSR…
महालोकवाणी न्यूज: गेवराई तालुक्यातील ठाकर आडगांव येथील एक हुशार,कवी,लेखक, वात्रटिकाकार मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्तीमत्व ज्यांना आतापर्यंत अखिल भारतीय पत्रकार आणि पत्रलेखक संघ राज्यस्तरीय कोविड योद्धा समाजरक्षक महासन्मान पुरस्कार २०२१ मिळालेला आहे व राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा प्रथम पुरस्कार विजेते २०२२ पुरस्कार मिळालेला आहे श्री समाधान हनुमान सम्राट जे की लहानपणापासून लिहीण्याची,वाचण्याची सवय आहे विविध विषयांवर लिखण करणे कायम चालू असते सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील ठाकर आडगांव येथील युवक श्री समाधान हनुमान सम्राट हे गेल्या अनेक वर्षांपासून लिखाण करत आहेत त्यांनी आतापर्यंत शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्ग, शिक्षण क्षेत्र, मित्र,बाप,पाऊस, सोयाबिन,कापुस, ऊसतोडी, समाजसेवक अशा अनेक बाबींवर कवीता केली आणी यांचीच एक कविता ती…
महालोकवाणी न्यूज: नगर – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अद्वितीय व्यक्तीमत्वातून बुद्धीमत्ता, व्युहरचना, साहस, मानवतावादी दृष्टीकोन असे अनेक गुण आजच्या तरुण पिढीला घेण्यासारखे आहेत. महाराजांनी संकुचितपणा, भेदभाव न करता सर्व समाज घटकांच्या कल्याणाचा विचार करणारा राजा अशीच ओळख जगाला करुन दिली. त्यांची प्रेरणा विद्यार्थ्यांनी घेऊन त्यांचे विचार प्रत्यक्षात अंमलात आणले पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.उदय नाईक यांनी केले. विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पाहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ.उदय नाईक, शिक्षक समन्वयक प्रा.गणेश डहाणे, प्रा.सुनिल मांढरे, डॉ.एस.ए.मरकड, डॉ.के.बी.काळे, डॉ.आर.आर.नवथर, प्रा.निळकंठ देशपांडे, प्रा.आर.एस.तांबे, प्रा.अविनाश पुंड, विद्यार्थी प्रतिनिधी विशाल छाईलकर, वैष्णवी ढाकणे, मुस्कान…
जामखेड/प्रतिनिधी- धनराज पवारजामखेड शहरात श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त प्रथमच समस्त भिमसैनिक जामखेड तालुका व बौद्ध समाजाच्या वतीने अभिवादन करून समता बंधुताचा संदेश देत अनोखा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. शहरातील संविधान चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास दै.लोकमतचे तालुका प्रतिनिधी अशोक निमोणकर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले..यावेळी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड साहेब,शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद उपस्थित होते.. शहरात प्रथमच भगव्या वादळाला निळी सलामी देत भिमसैनिकांनी शिवजयंती उत्सवात साजरी केली..यावेळी बौद्ध समाजातील सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले,नगराध्यक्ष निखिल घायतडक,राजन समिंदर सर,भिमटोला ग्रुपचे बापूसाहेब गायकवाड, संचालक सागर सदाफुले,राजेंद्र सदाफुले,दादासाहेब घायतडक,समता ग्रुपचे अध्यक्ष…
महालोकवाणी न्यूज: जामखेड प्रतिनिधी धनराज पवार राज्यस्तरीय भव्य महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीच्या दुसऱ्या पर्वाचे आ. रोहित पवार यांच्या वतीने कर्जत शहरात आयोजन; खा. शरदचंद्रजी पवार साहेब राहणार उपस्थित कर्जत | गतवर्षीप्रमाणे याही वर्षी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या संकल्पनेतून राज्यस्तरीय भव्य महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीच्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन कर्जत शहरात करण्यात आले आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी मागच्या वर्षी महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत आयोजित करून महाराष्ट्राची बैलगाडी शर्यतीची असलेली परंपरा जोपासण्यासाठी आणि जपण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले होते व त्याला संपूर्ण राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळाला होता. गेल्या काही वर्षांपासून बैलगाडी शर्यत ही…
महालोकवाणी न्यूज: संपादक- सचिन कांबळे जामखेड/कर्जत: १४ फेब्रुवारी 2023 रोजी जामखेड शहरातील नगर रोड येथील पुढारी वडाच्या झाडाची (वटवृक्ष) पुजा बिभिषण (मामा )धनवडे नगरसेवक तथा जामखेड शहर अध्यक्ष भाजपा यांच्या हस्ते तसेच मान्यवरांच्या उपस्थित अखेरचा निरोप देण्यात आला. या प्रसंगी नगरसेवक डाँ ज्ञानेश्वर झेंडे,शिवसेना तालुका प्रमुख प्रा.कैलास माने सर, अनिल यादव ,गणेशशेठ डोंगरे,शिवकुमार डोंगरे, वैभवशेठ कार्ले,भाऊ काशिद, अर्जुन म्हेत्रे, रविंद्र कडलग, भरत राळेभात, सचिन भंडारी,बंडू ढवळे आदी उपस्थित होते. या पुढारी वडापासून अनेक जणांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाले आहेत, तसेच या वडापासून अनेकांचे राजकारण सुरू झाले आहे. व कित्येक जणांचे राजकारण संपुष्टात पण आले आहेत, तर कित्येक कार्यकर्ते कर्जबाजारी पण…
महालोकवाणी न्यूज: कोरोनानंतर अनेक लोक डिजिटल खरेदी आणि पेमेंटकडे वळली आहेत. त्यामुळे आता बऱ्यापैकी देवाणघेवाण ही डिजिटल पेमेंट म्हणजे Upi Payment द्वारे किंवा पेटिएमद्वारे केली जाते. आता Upi Payment द्वारे पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पेमेंट करण्याची पद्धत बदलली असून आता सारखा पिन अपलोड करावा लागणार नाही. युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI हा अलिकडच्या वर्षांत सर्वाधिक वापरला जाणारा डिजिटल पेमेंट मोड म्हणून उदयास आला आहे. लहान UPI पेमेंट सोयीचे करण्यासाठी, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने सप्टेंबर 2022 मध्ये UPI Lite वैशिष्ट्य सांगितली आहेत. आता पेटीएमनेही हे फीचर आपल्या यूजर्ससाठी आणले आहे. या फीचरची खास गोष्ट म्हणजे 200 रुपयांपर्यंतच्या UPI पेमेंटसाठी…
पुणे जिल्हा प्रतिनिधी: बबनराव धायतोंडे. कात्रज तालुका करमाळा येथे भिमा ( Bhima) नदीचे किनारी पुरातन काळातील दगडी हेमाडपंथी निळकंठेश्वशराचे मंदिर असून येथे दर्शनासाठी महिला भगिनींनी चक्क चार किलो मिटर पाण्यातून होडीने जाऊन घेतले दर्शन या मंदिरात भगवान शंकर महादेव यांचे पदस्पर्शाने हि भूमी पावन झालेली आहे. पुर्वी येथे पिंपळाचे झाड होते याच झाडाचे पान तोडले की त्याचे सोने होत होते असे जुनी लोक सांगत होती असे सरपंच हंडाळ यांनी सांगितले. येथे चिलीया बाळाची कथा घडली होती म्हणून या मंदिरा ला अनन्य साधारण महत्त्व आहे. व येथे चिलीया बाळाची मुर्ती देखील आहे. या गावातुन जुनी रेल्वे देखील जात होती या ठिकाणी…
महालोकवाणी न्यूज मुंबई : मुंबई पोलिस दलासाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेमध्ये एका २६ वर्षीय उमेदवाराने मैदान पूर्ण करत प्राण सोडल्याने शुक्रवारी खळबळ उडाली. गणेश उगले असे मृत उमेदवाराचे नाव असून १६०० मीटर धावण्याची चाचणी पूर्ण केली आणि तो खाली कोसळला. यातच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी वांद्रे-कुर्ला संकुल पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. मूळचा वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असलेला उगले मुंबई पोलिस दलातील शिपाई भरती प्रक्रियेत चुलत भावाबरोबर सहभागी झाला होता. शुक्रवारी सकाळी तो कलिना विद्यापीठाच्या मैदानावर चाचणीसाठी उतरला. त्याने १६०० मीटरची चाचणी पूर्ण केली आणि अंतिम रेषा ओलांडल्यानंतर लगेचच जमिनीवर कोसळला. पोलीस भरती ( police Bharati) प्रक्रियेसाठी उपस्थित असलेल्या वैद्यकीय…