Author: mahalokwani

कर्जत : महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यत स्पर्धेची परंपरा जोपासण्यासाठी व पुढे नेण्यासाठी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून गतवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्रातील सर्वात भव्य महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले होते. या स्पर्धेला माजी केंद्रीय मंत्री, खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांची देखील विशेष उपस्थिती होती. यासह अनेक आमदार, नेते व दिग्गज मंडळी या बैलगाडी शर्यत स्पर्धेला उपस्थित होते. हडपसरमधील अनुजा शेवाळे यांची बैलजोडी ठरली यंदाच्या वर्षीची महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धेची विजेती ! सोमवार रात्रीपासूनच राज्यभराच्या कानाकोपऱ्यातून बैलगाडी शर्यतप्रेमी कर्जत शहरात दाखल झाले होते. मंगळवारी सकाळी नोंदणी सुरू झाली आणि त्यानंतर स्पर्धेचे…

Read More

जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार जामखेड तालुक्यात बारावीच्या परिक्षेला सुरवात झाली असुन आज दि. २१ रोजी जामखेड तालुक्यात बारावी परिक्षेचे सहा केंद्र असुन त्यामध्ये 2626 विद्यार्थी – विद्यार्थीनी परिक्षा देत आहे. स्व एम ई भोरे ज्यु काँलेज,पाडळी येथे सुरु असलेल्या एच . एस . सी . (बारावी ) बोर्ड परिक्षा चालु झाल्या असुन सकाळी १० वाजता या केंद्रावर पालकांची विद्यार्थी – विद्यार्थिनी सोडण्यासाठी गर्दी झाली होती . परिक्षा योग्य पध्दतीने चालण्यासाठी स्व एम ई भोरे ज्यु काँलेज च्या गेटवर विदयार्थी – विना पालकांना प्रवेश नाकरण्यात आला . ज्यु काँलेज चे संस्थापक अध्यक्ष डाँ संजय भोरे यांनी विद्यार्थी व विदयार्थीनींना गुलाबपुष्प…

Read More

जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार जामखेड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 व्या जयंतीनिमित्त सोमवारी सर्व जातीधर्माच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती येथून छञपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांला हत्तीवर बसवून व दुसऱ्या रथात छत्रपतींचा पुतळा बसवून बीड रस्ता, छत्रपती शिवाजी पेठ मार्गात मोठ्या प्रमाणावर पुष्पवृष्टी करण्यात आली नंतर करमाळा खर्डा चौफुला येथे मिरवणूक विसर्जन करण्यात आली. या मिरवणुकीत आ. रोहीत पवार यांनी ढोल वाजवून नागरिकांचे लक्ष केंद्रित केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व जातीधर्माच्या वतीने सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास मिरवणूकीचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समिती येथून करण्यात आले होते. या मिरवणुकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची कर्मभूमी असलेल्या…

Read More

भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीचे फॅन फॉलोअर्स मोठ्या प्रमाणात आहेत. त्यात करोडो तरूणींच्या ताईत विराट वसलेला आहे. विराटची एक झलक पाहण्यासाठी मुली आतुर असतात. विराट कुठेही गेला तरी, त्याच्यासोबत सेल्फी घेणाऱ्यांची अक्षरक्षः झुंबड उठते. मात्र, विराटच्या एका चाहतीने त्याच्यासोबत सेल्फी घेण्याऐवजी चक्क त्याला सर्वांसमोर किस केले आहे. सध्या याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये नेमकं काय? व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक तरूणी विराटच्या जवळ जात त्याच्या होठांचे चुंबन घेत असल्याचे दिसून येत आहे. चाहतीने थेट विराटचे किस घेतल्याने अनेक चाहत्यांनी अनुष्काला काय चाललंय? असा प्रश्न विचारला आहे. काही सेकंदांची ही क्लिप इंटरनेटवर अपलोड होताच खळबळ…

Read More

महालोकवाणी न्यूज पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे Pune शिक्षण विभागासारख्या पवित्र विभागात भ्रष्ट अधिकारी काम करत असतील तर संपूर्ण आयुष्य मुले.मुली शिक्षण देऊन भावी पिढी घडविणाऱ्या त्यांच्याच खात्यातील सहकारी लाचेची मागणी करत असतील तर त्यांच्या मनातील वेदनांचा विचार न केलेलाच बरा , शिक्षण विभाग पुणे येथील 1) प्रमिला प्रभाकरराव गिरी वरीष्ठ लेखाधिकारी वर्ग. 2 (2) अनिल श्रीधर लोंढे.कनिष्ठ लेखाधिकारी शिक्षण विभाग कार्यालय सिनेगाँक स्ट्रिट पुणे .यांना दिनांक. 08.व 13 आणि 20 रोजी सदरच्या प्रकाराची पडताळणी करून दिनांक 20 फेब्रुवारी रोजी लाचलुचपत विभागाचे पोलीस उप अधिक्षक . विजयमाला पवार यांनी सापळा लावून 5000 हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.या घटनेने…

Read More

आपल्यावर पाळत ठेवली जात असून, घातपात घडविण्याचाही प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला. महालोकवाणी न्यूज: माजी मंत्री अशोक चव्हाण यांच्या मंत्रिपदाच्या लेटरहेडचा गैरवापर करून अज्ञात व्यक्तींनी बदनामी कारक बनावट पत्रे तयार केले असल्याची तक्रार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पोलिसांत केली आहे. एवढेच नव्हे तर आपल्यावर पाळत ठेवली जात असून, घातपात घडविण्याचाही प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला. या प्रकारावर खुलासा करत अशोक चव्हाण म्हणाले की,माझ्या लेटर पॅडचा दुरुपयोग होत असून माझ्यावर पाळत ठेवली जात आहे. माझा विनायक मेटे करण्याचा काही लोकांचा डाव असल्याचा गंभीर आरोप चव्हाणांनी केला. मी खोटं बोलून नेतृत्व करत नाही. आम्ही तुमचं नावं घेत…

Read More

निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना पक्षाचं आणि आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह काढून घेतलं आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. एक कार्यकर्ता (एकनाथ शिंदे) पक्ष प्रमुख बनला. मात्र उद्धव ठाकरे यांना आता पक्ष उभारण्याची मेहनत घ्यावी लागणार हे नक्की. सध्याचं राजकारण बघता आठवण येते ती म्हणजे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांचे सुपुत्र जगन मोहन रेड्डी यांची. जगन मोहन रेड्डी ची कहाणी अगदी एका सिनेमासारखीच आहे. यशस्वी उद्योजक ते राजकारणी आणि नंतर राज्याचा मुख्यमंत्री होण्यापर्यंतच्या प्रवासात त्यांनी खूप संघर्ष केला. नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत रेड्डी यांच्या पक्षाने दणदणीत विजय मिळवला. चला तर जाणून घेऊ.. YSR…

Read More

महालोकवाणी न्यूज: गेवराई तालुक्यातील ठाकर आडगांव येथील एक हुशार,कवी,लेखक, वात्रटिकाकार मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्तीमत्व ज्यांना आतापर्यंत अखिल भारतीय पत्रकार आणि पत्रलेखक संघ राज्यस्तरीय कोविड योद्धा समाजरक्षक महासन्मान पुरस्कार २०२१ मिळालेला आहे व राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा प्रथम पुरस्कार विजेते २०२२ पुरस्कार मिळालेला आहे श्री समाधान हनुमान सम्राट जे की लहानपणापासून लिहीण्याची,वाचण्याची सवय आहे विविध विषयांवर लिखण करणे कायम चालू असते सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील ठाकर आडगांव येथील युवक श्री समाधान हनुमान सम्राट हे गेल्या अनेक वर्षांपासून लिखाण करत आहेत त्यांनी आतापर्यंत शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्ग, शिक्षण क्षेत्र, मित्र,बाप,पाऊस, सोयाबिन,कापुस, ऊसतोडी, समाजसेवक अशा अनेक बाबींवर कवीता केली आणी यांचीच एक कविता ती…

Read More

महालोकवाणी न्यूज: नगर – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अद्वितीय व्यक्तीमत्वातून बुद्धीमत्ता, व्युहरचना, साहस, मानवतावादी दृष्टीकोन असे अनेक गुण आजच्या तरुण पिढीला घेण्यासारखे आहेत. महाराजांनी संकुचितपणा, भेदभाव न करता सर्व समाज घटकांच्या कल्याणाचा विचार करणारा राजा अशीच ओळख जगाला करुन दिली. त्यांची प्रेरणा विद्यार्थ्यांनी घेऊन त्यांचे विचार प्रत्यक्षात अंमलात आणले पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.उदय नाईक यांनी केले. विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पाहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ.उदय नाईक, शिक्षक समन्वयक प्रा.गणेश डहाणे, प्रा.सुनिल मांढरे, डॉ.एस.ए.मरकड, डॉ.के.बी.काळे, डॉ.आर.आर.नवथर, प्रा.निळकंठ देशपांडे, प्रा.आर.एस.तांबे, प्रा.अविनाश पुंड, विद्यार्थी प्रतिनिधी विशाल छाईलकर, वैष्णवी ढाकणे, मुस्कान…

Read More

जामखेड/प्रतिनिधी- धनराज पवारजामखेड शहरात श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त प्रथमच समस्त भिमसैनिक जामखेड तालुका व बौद्ध समाजाच्या वतीने अभिवादन करून समता बंधुताचा संदेश देत अनोखा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. शहरातील संविधान चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास दै.लोकमतचे तालुका प्रतिनिधी अशोक निमोणकर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले..यावेळी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड साहेब,शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद उपस्थित होते.. शहरात प्रथमच भगव्या वादळाला निळी सलामी देत भिमसैनिकांनी शिवजयंती उत्सवात साजरी केली..यावेळी बौद्ध समाजातील सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले,नगराध्यक्ष निखिल घायतडक,राजन समिंदर सर,भिमटोला ग्रुपचे बापूसाहेब गायकवाड, संचालक सागर सदाफुले,राजेंद्र सदाफुले,दादासाहेब घायतडक,समता ग्रुपचे अध्यक्ष…

Read More