अहमदनगर ता 22 – निघोज (पारनेर) चे तत्कालीन सरपंच संदिप वराळ यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी प्रवीण रसाळ याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अटी- शर्तीवर जामिन मंजूर केला. जस्टीस एस. जी. मेहरे यांनी याबाबतचे आदेश दिले. दोन लाख रुपयांच्या व्यक्तीगत जामिनासह त्याला जामिन मंजूर करण्यात आला असला तरी रसाळ याला जिल्हा बंदीची अट घालण्यात आली असून प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला त्याला पोलिस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. संदीप वराळ यांचे हत्याकांड संपूर्ण राज्यात गाजले होते. संदीप वराळ यांची हत्या भरदिवसा चौकात करण्यात आली होती. सदरच्या घटनेशी आपला कोणताही संबंध नसल्याचा कांगावा त्यावेळी प्रवीण रसाळ याने केला होता. मात्र, पोलिसांना त्याच्याबाबतचे…
Author: mahalokwani
पुणे जिल्हा प्रतिनिधी: बबनराव धायतोंडे.. महालोकवाणी न्यूज ता . 21 किरकोळ कारणातून भांडण होऊन मलठण तालुका दौंड येथे ऐकाला आपला जिव गमवावा लागला या बाबत हर्षदा नारायण डोईफोडे राहणार मलठण यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे दौंड पोलिसांनी अमोल सुनील लवंगरे राहणार.. मलठण याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.दौंड पोलीस स्टेशन येथून मिळालेल्या माहिती नुसार शनिवारी दिनांक 11 रोजी रात्री 10 वाजता मलठण येथे फिर्यादी यांच्या राहत्या त्यांचे पती लक्ष्मण डोईफोडे व अमोल लवंगरे यांच्यामध्ये कसल्यातरी कारणावरून भांडण झाले. या भांडणांमध्ये अमोल लवंगरे याने कोणत्यातरी हत्याराने फिर्यादी यांचे पती नारायण डोईफोडे यांना डोक्यात गंभीर जखमी .केले होते त्यानंतर फिर्यादी…
गायरान जमिनींवरील अतिक्रमण हटवण्याच्या वेळी भूमीहीन कुटुंबांचा मुद्दा चर्चेत आला होता. दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केंद्र ‘सरकारने देशातील भूमीहीन कुटुंबांना जमीन द्यावी’ अशी मागणी केली आहे. केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घेऊन भूमीहीन कुटुंबांच्या विकासासाठी त्यांना प्रत्येकी पाच एकर जमीन द्यावी, असे ते यावेळी म्हणाले आहेत. सोबतच अशी योजना अंमलात आणण्यासाठी सरकारकडून ठराव करण्यात आला आहे. अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे. भारतातील गावागावांत भूमीहीन लोकं राहत आहेत. या लोकांना पाच एकर जमीन वाटण्याचा निर्णय राज्य आणि केंद्र सरकारने घ्यावा. तसे पहायला गेलं तर सध्या देशात २० कोटी एकर सरप्लस जमीन आहे. या जमिनीचा वापर देशातील चार कोटी…
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील उड्डाणपूला जवळील पोस्ट ऑफिस येथिल चौकाला पहिल्यापासूनच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आहे. व त्या नावाचा बोर्ड हा अहमदनगर मनपाच्या मार्फत लावण्यात आला होता. परंतु उड्डाणपुलाच्या कामामुळे सदरचा फलक हटवण्यात आला होता आता पुलाचे काम पूर्ण झाले आहे या पोस्ट ऑफिस चौकास विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्या तसेच उड्डाणपुलाखाली उभारण्यात आलेल्या उद्यानाला देखील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टी च्या वतीने करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे याना देताना पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड समवेत सोमा शिंदे, महेश भोसले, गौतमीताई भिंगारदिवे, नितिन कसबेकर, अनिल शेकटकर,…
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी देशातील सार्वजनिक आरोग्याविषयक प्रश्नावर तोडगा म्हणून मोठी घोषणा केली आहे. देशातील सर्व तरुण व्यक्तींना मोफत कंडोम उपलब्ध करुन दिले जातील असं मॅक्रॉन यांनी जाहीर केलं आहे. लहान वयामध्येच तरुणी गरोदर होण्याचं प्रमाण फ्रान्समध्ये फार जास्त आहे. त्यावरच तोडगा म्हणून मॅक्रॉन सरकारने हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेण्यामागील दोन प्रमुख कारणांपैकी एक कारण हे लैंगिक आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचंही आहे. कुठे आणि कसे मिळणार हे फ्री कंडोम? “ही गर्भनिरोधकांसंदर्भातील छोटीशी क्रांती आहे,” असं राष्ट्रध्यक्ष मॅक्रॉन यांनी ही घोषणा करताना म्हटलं. १८ ते २५ वयोगटातील व्यक्तींना मोफत कंडोम पुरवले जातील असं मॅक्रॉन यांनी म्हटलं आहे. प्लाटीज…
‘केंद्रातील लोकपालच्या धर्तीवर राज्यातही नवीन लोकायुक्त कायदा करण्यात येणार आहे. या कायद्याच्या कक्षेत मुख्यमंत्री; तसेच मंत्री यांचा समावेश असेल. या विधेयकाला मंत्रीमंडळाने मान्यता दिली असून, याच अधिवेशनात लोकायुक्त कायद्याचे विधेयक मांडणार आहोत,’ अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. दरम्यान, लोकायुक्त कायदा नेमका काय आहे? लोकायुक्ताचे अधिकार कोणते? मुख्यमंत्रीही लोकायुक्तांच्या कक्षेत येणार, म्हणजे नेमकं काय होणार? याच विषयी जाणून घेऊ. ▶ लोकायुक्त कायदा काय आहे? ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी दिल्लीत २०११ साली केलेल्या आंदोलनानंतर केंद्र सरकारने देशात लोकायुक्त कायदा लागू केला. लोकपाल विधेयक, २०१३ ज्याला लोकपाल आणि लोकायुक्त विधेयक २०१३ असंही म्हटल्या जातं. भारतात भ्रष्टाचारविरोधी प्रस्तावित कायदा आहे. ज्यामध्ये लोकायुक्तच्या संस्थेची…
चेहऱ्यावरील मुरूमं आणि पुरळ कापराच्या तेलामध्ये आढळणारे अँटीबॅक्टेरियल घटक हे त्वचेवरच्या मुरूमांना आणि पुरळ घालविण्यासाठी मदत करतात. याशिवाय कापूर तेल रोज उपयोगात आणल्यामुळे अर्थात रोज लावल्याने मुरूमांमुळे चेहऱ्यावर आलेले डाग निघून जाण्यासही मदत मिळते. याचा वास काही जणांना कदाचित सहन होणार नाही. मात्र त्याचा फायदा अधिक आहे. त्यामुळे तुम्ही याचा नियमित वापर करून घ्या. फुटलेल्या टाचांवर रामबाण उपाय थंडीच्या दिवसात किंवा काही जणांना १२ महिने टाचा फुटण्याचा त्रास होत असतो. टाचा फुटल्यावर अधिक प्रमाणात इन्फेक्शनही होते. हे इन्फेक्शन टाळण्यासाठी तुम्हाला कापूर तेलाचा उपयोग करून घेता येतो. कोमट पाणी एका बादलीत घ्या आणि त्यात कापूर तेल मिक्स करा. यानंतर त्या पाण्यात…
पोलिस भरतीची मैदानी चाचणी आता २ जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यात पुरुष उमेदवारांना १६०० आणि १०० मीटर धावणे, गोळाफेक अशा चाचण्या द्याव्या लागतील. महिलांना ८०० मीटर व १०० मीटर धावण्याची शर्यत पार करावी लागेल. यंदा गोळाफेकीसाठी उमेदवारांना सलग तीन संधी मिळणार आहेत. पूर्वी पहिला गोल (संधी) वॉर्म-अपसाठी ग्राह्य धरला जात होता. पण, आता उमेदवाराला सलग तीन संधी असतील. त्यात सर्वात लांब गोळा फेकलेल्यांना १५ गुण मिळणार आहेत. गोळाफेक (पुरुष : ७.२६० किलोचा गोळा) : ८.५० मीटर किंवा त्यापेक्षा कमी : १५ गुण, ७.९० मीटर ते ८.५० मीटर : १२ गुण, ७.३० मीटर ते ७.९० मीटर : १० गुण, ६.७० मीटर…
पुणे जिल्हा प्रतिनिधी: बबनराव धायतोंडे दौंड नगरपालिकेच्या हद्दीमध्ये एकही सार्वजनिक मुतारी नसल्यामुळे दौंड शहरात येणाऱ्या व शहरातील लोकांची लघुसंखेची सोय नसल्यामुळे.दौंड शहरामध्ये पोलीस उपाधीक्षक कार्यालय व पोलीस निरीक्षक कार्यालय या दोन्ही कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर म्हणजे पन्नास फुटावर असलेली.जुनी पोलीस वसाहत या पोलीस वसाहतीचा सार्वजनीक मुतारी म्हणून वापर सर्रास केला जात आहे. त्यामुळे येथे अतिशय दुर्गंधी पसरली असून डासांचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य झालेले आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.रोगराईचा मोठ्या प्रमाणात फैलाव होवू शकतो त्यामुळे दौंड शहरामध्ये।सार्वजनीक मुतारीची सोय .नसल्यामुळे फार मोठा चर्चेचा विषय बनला आहे. नगरपालिकेने नवीन रस्त्यांच्या कामासाठी चार ते पाच मुताऱ्या पाडल्यानंतर पर्यायी सोय केली नाही…
पुणे जिल्हा प्रतिनिधीः – बबनराव धायतोंडे दौंड तालुक्यातील आठ ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी दिनांक 20 /12/2022/.तहसील कार्यालय दौंड येथे झाली.या निवडणुकीमध्ये आमदार राहुल कुल समर्थक सरपंच पाच ग्रामपंचायती वरती। विजयी झाले.. राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या दापोडी या ऐकाच ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवता आला तर. पाटेठाण ग्रामपंचायतीची.सरपंच पदाचा उमेदवार अनुसूचित जातीचा न मिळाल्याने सरपंच पद रिक्त राहिले आहे . सर्व ग्रामपंचायत मध्ये तुल्यबळ लढती झाल्या सरपंच पदाचे उमेदवार पुढीलप्रमाणे देवकरवाडी. तृप्ती दिगंबर मगर (861). दहिटणे. आरती सचिन गायकवाड (716 ) .नांदूर .युवराज बबन बोराटे (765) बोरी भडक कविता बापू कोळपे (1015). लोणारवाडी. प्रतिक्षा निलेश हिवरकर( 560). सर्व भाजपा आमदार राहुल दादा कुल समर्थक .…