Author: mahalokwani

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नागपुरच्या काटोल मार्गावरील फेटरी येथील धम्म नागा विपश्यना मेडिटेशन सेंटरमध्ये विपश्यनासाठी 7 दिवस मुक्कामी असणार आहे. अरविंद केजरीवाल आज नागपूर विमानतळावर दाखल झाले. सकाळी त्यांनी विपश्यना शिबिराला जाणार असल्याची माहिती ट्विटर हँडलवरून दिली होती. नागपुरात पोहचल्यावर मागील वेळी जयपूरला गेलो होतो. विपश्यना नागपूरला सुरू असल्याने यावेळी इथे आलो असल्याचं म्हणत नवीन वर्षाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत. 1996 पासून विपश्यनाला जात असल्याचंही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यावेळी माध्यमांशी बोलतांना सांगितलं. यावेळी ते नागपुरातील विपश्यना केंद्रात आलो असल्याच त्यांनी स्पष्ट केलं आहे. वर्षातून एकदा विपश्यनाला जाण्यासाठी प्रयत्न असतो. नागपुरात येत नवीन वर्षात1 जानेवारीला दिल्लीला परत जाणार…

Read More

आनंद आणि उत्साहाचं प्रतिक असलेला ख्रिसमस संपूर्ण ख्रिश्चन समुदायाचा मोठा सण आहे. जगभरात जिथं जिथं ख्रिश्चन राहतात तिथं ते हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. या सणाशी अनेक परंपरा निगडित आहेत, ज्यामुळे तो आणखी खास बनतो. अशीच एक परंपरा सांताक्लॉजची आहे. आपल्यापैकी प्रत्येकालाच बालपणी सांताक्लॉजची कहाणी सांगितली गेली असेल. दरवर्षी ख्रिसमसच्या निमित्ताने पांढरी दाढी आणि पांढरे केस असलेला सांता लाल रंगाचे कपडे आणि टोप्या घालून येतो. त्याच्या हातात एक भली मोठी बॅग असते, ज्यामध्ये त्याने बऱ्याच भेटवस्तू ठेवलेल्या असतात. जी तो सगळ्या लहान मुलांमध्ये वाटतो. पण तुम्हाला माहित आहे की, खरा सांता कोण होता? चला तर जाणून घेऊया… दरवर्षी २५…

Read More

पुणे जिल्हा प्रतिनिधी :- बबनराव धायतोंडे खानवटे तालुका दौंड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी दिनांक 24 /12 /2022 रोजी आनंद बाजार आणि खाऊ गल्लीचे आयोजन केले होते कार्यक्रमाचे उद्घाटन रंगनाथ ढवळे यांनी केले या खाऊगल्ली साठी गावातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आठवडे बाजारातील आनंद बाजार घेण्यासाठी महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता या चिमुकल्यांचे सर्व ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केले गावातील चोखंदळ खवय्यांनी खाऊ गल्लीचा.मनमुराद आनंद घेतला आणि सर्व शिक्षक वृंदांचे.कौतुक केले.येथील प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी सर्व प्रकारची तरकारी पालेभाज्या वडापाव डोसा उत्तप्पा इडली चहा इत्यादींचे स्टॉल लावले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक शाळेच्या सौ मोरे मॅडम .सौ पानसरे मॅडम.सौ भिसे…

Read More

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पनवेल व उरण तालुका महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी असणार्‍या आदिती सोनार यांच्यावर खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात पनवेल तहसील कार्यालयातर्फे फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आदिती सोनार यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट सहीचा आणि शिक्क्यांचा वापर करून अवैध बांधकाम केल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रार दाखल होताच, खांदेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मिळालेल्या माहितीनुसार, आदिती सोनार यांनी काही दिवसांपूर्वी पनवेलच्या विहिघर परिसरातील शेतजमिनीवर बांधकाम केलं होतं. यासाठी त्यांनी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या खोट्या सहीचा आणि शिक्यांचा वापर केला गेला. तसेच याशिवाय त्यांनी शेतजमीन बिगरशेती असल्याचे देखील भासवलं होते. याविषयी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार प्राप्त झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी केली असता, आदिती गोरे…

Read More

ता. 24 : सातारा जिल्ह्यातील मान खटाव विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. फलटण येथे हा अपघात झाला असून या अपघातात आमदार गोरे हे गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास हा अपघात झाला आहे. पुण्याहून गावी दहिवडीकडे जात असताना हा अपघात झाला.मिळालेल्या माहितीनुसार, फलटण येथील बानगंगा नदीच्या पुलावरून जाताना आमदार जयकुमार गोरे यांची फॉर्च्युनर ही कार सुमारे ३० फूट ऊंच असेलल्या पुलावरून खाली कोसळली. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पुलावर लावण्यात आलेल्या तारा तोडून खाली कोसळली असल्याचे समजते. गाडीमध्ये जयकुमार गोरे यांच्यासह चार जण प्रवास करत होते. अपघातात जखमी झालेल्या आमदार…

Read More

पुणे जिल्हा प्रतिनिधी :- बबनराव धायतोंडे कोंडीराम सदाशिव क्षीरसागर माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज, भिगवण मध्ये ब्युटी पार्लर कोर्स प्रशिक्षण निःशुल्क सुरू करण्यात आले आहे… इयत्ता आठवी ते बारावीच्या सर्व विभागातील सर्व विद्यार्थिनींसाठी हा कोर्स ( प्रशिक्षण ) उपलब्ध करण्यात आला असून या कोर्सच्या माध्यमातून सर्व गरजू व उत्साही असणाऱ्या विद्यार्थिनींसाठी याचा फायदा होणार आहे.                  संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय अजित क्षीरसागर,  महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय तुषार क्षीरसागर सर यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अविनाश गायकवाड, ज्यूनियर विभाग प्रमुख प्रा. नवनाथ सावंत यांनी आपल्या मनोगतातून ब्युटी पार्लर कोर्स चे महत्व व आजची काळाची गरज याविषयी विद्यार्थिनींना जागृत केले..                सदर…

Read More

अहमदनगर : राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी या गावात धर्मांतर करण्यास प्रवृत्त करणाऱ्या आरोपीला पाठीशी घातल्याचे प्रकरण राहुरीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर शेकले आहे. हे प्रकरण विधानसभेत उपस्थित करण्यात आले. त्यानंतर पोलिस निरीक्षक दराडे यांची येत्या पंधरा दिवसांत चौकशी करण्याचे आणि तोपर्यंत त्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्याच्या सूचना प्रभारी गृहमंत्री शंभुराज देसाई यांनी विधानसभेत दिल्या. भाजपचे आमदार राम सातपुते यांनी याविषयावर अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता. एप्रिल २०२२ मध्ये राहुरी तालुक्यातील ही घटना उघडकीस आली होती. राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी गावात आठ महिन्यापूर्वी पंजाब मधील कमलसिंग नावाच्या ख्रिश्चन मिशनऱ्याने एका भाजीविक्रेत्या महिलेचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला, तसेच तिचा विनयभंगही केल्याचा आरोप आहे.…

Read More

चीन आणि इतर अनेक देशांमध्ये कोविड-१९ च्या नव्या व्हेरिएंटमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झालीये. चीनमध्ये या व्हेरियंटने मोठा हाहाकार निर्माण केला. अनेक ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी प्रेतांच्या रांगा लागल्या. भारतात देखील कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा सब-व्हेरियंट बीएफ.७ व्हेरियंटचे तीन रुग्ण आढळले. त्यामुळं केंद्र सरकारने इंट्रानेजल व्हॅक्सिनला म्हणजेच नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीकरणासाठी परवानगी दिलीये. दरम्यान, नाकावाटे दिली जाणारी लस कशी काम करते? आणि ती कुठे मिळणार? याच विषयी जाणून घेऊ. दोन वर्षांनी कोरोनातून नुकताचं कुठं सुटकेचा श्वास मिळाला असतांना आता काही देशात कोरोनाचा नवा व्हेरियंड हातपाय पसरू लागला. भारतातही कोरोनाच्या सर्वात जास्त धोकादायक असलेल्या व्हेरियंट BF.7 चे रुग्ण आढळले. BF.7 चे व्हर्जन सर्वात आधी चीनमध्ये…

Read More

महालोकवाणी न्यूज:- अंमळनेर :दि. 23 अंमळनेर ग्रामपंचायत ची नुकतीच निवडणूक पार पडली .जनतेने कौल दिला आहे . तो सर्वानी स्वीकारला पाहिजे . नवीन सरपंचांनी पद स्वीकारण्या पूर्वी गेल्या पंच वार्षिक चा संपूर्ण हिशोब घ्यावा व गावातील चौकात हिशोबाचे फ्लेक्स लावावेत अशी मागणी प्रा.बाळासाहेब पवार यांनी केली आहे. ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी बिनविरोध चा घाट घातला गेला परंतु तो उधळून लावण्यात आला . सत्ताधारी पॅनल ने त्यांच्या दरबारात सर्व ठरवले होते . परंतु गावाकऱ्यांनी एकत्र येत निवडणूक लढवली व अंमळनेर गावात चार जागा जिंकल्या आहेत . मिसळवाडीत प्रचंड दहशत असताना तेथील मतदारांनी दहशती विरुद्ध कौल दिला परंतु अंमळनेर च्या इंदिरा नगर मधून…

Read More

महालोकवाणी न्यूज दिनांक. 23 माऊली संकुल येथे लिटिल फ्लावर स्कूलच्या तीनही शाखेचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. निसर्गावर प्रेम करण्याचा संदेश लहान मुले यांनी विविध गाण्यांच्या माध्यमातून समाजाला देण्याचा प्रयत्न केला. व त्याचे रक्षण करणे हे आपणा सर्वांचे आद्य कर्तव्य आहे निसर्गाशी मैत्री करण्याचा संदेश यू.के.जी. च्या मुलांनी एका नाट्यद्वारे सर्वांना दिला . तर वृक्षाची तोड थांबवावी आणि नैसर्गिक ऑक्सिजनची वाढ करावी, हा संदेशही नाटकाद्वारे उपस्थित यांना देण्यात आला. पशु ,पक्षी , पाणी , पर्वत , चंद्र सूर्य , तारे , धरती , आकाश या सर्व नैसर्गिक संपत्तीचे नृत्याच्या माध्यमातून पालक वर्गाना सांगण्याचा प्रयत्न सर्व विद्यार्थ्यांनी या वर्षीच्या वार्षिक स्नेहसंमेलनात केला…

Read More