पुणे जिल्हा प्रतिनिधी: बबनराव धायतोंडे दौंड नगरपालिकेच्या हद्दीमध्ये एकही सार्वजनिक मुतारी नसल्यामुळे दौंड शहरात येणाऱ्या व शहरातील लोकांची लघुसंखेची सोय नसल्यामुळे.दौंड शहरामध्ये पोलीस उपाधीक्षक कार्यालय व पोलीस निरीक्षक कार्यालय या दोन्ही कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर म्हणजे पन्नास फुटावर असलेली.जुनी पोलीस वसाहत या पोलीस वसाहतीचा सार्वजनीक मुतारी म्हणून वापर सर्रास केला जात आहे. त्यामुळे येथे अतिशय दुर्गंधी पसरली असून डासांचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य झालेले आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.रोगराईचा मोठ्या प्रमाणात फैलाव होवू शकतो त्यामुळे दौंड शहरामध्ये।सार्वजनीक मुतारीची सोय .नसल्यामुळे फार मोठा चर्चेचा विषय बनला आहे. नगरपालिकेने नवीन रस्त्यांच्या कामासाठी चार ते पाच मुताऱ्या पाडल्यानंतर पर्यायी सोय केली नाही…
Author: mahalokwani
पुणे जिल्हा प्रतिनिधीः – बबनराव धायतोंडे दौंड तालुक्यातील आठ ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी दिनांक 20 /12/2022/.तहसील कार्यालय दौंड येथे झाली.या निवडणुकीमध्ये आमदार राहुल कुल समर्थक सरपंच पाच ग्रामपंचायती वरती। विजयी झाले.. राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या दापोडी या ऐकाच ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवता आला तर. पाटेठाण ग्रामपंचायतीची.सरपंच पदाचा उमेदवार अनुसूचित जातीचा न मिळाल्याने सरपंच पद रिक्त राहिले आहे . सर्व ग्रामपंचायत मध्ये तुल्यबळ लढती झाल्या सरपंच पदाचे उमेदवार पुढीलप्रमाणे देवकरवाडी. तृप्ती दिगंबर मगर (861). दहिटणे. आरती सचिन गायकवाड (716 ) .नांदूर .युवराज बबन बोराटे (765) बोरी भडक कविता बापू कोळपे (1015). लोणारवाडी. प्रतिक्षा निलेश हिवरकर( 560). सर्व भाजपा आमदार राहुल दादा कुल समर्थक .…
सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.20, सिल्लोड तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत 18 पैकी 13 ग्रामपंचायतीवर शिवसेनेच्या शिंदे गटाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तसेच निल्लोड येथील 11 पैकी शिंदे गटाचे 7 उमेदवार निवडणूक आल्याने येथे शिंदे गटाचा उपसरपंच पदासाठी मार्ग मोकळा झाला आहे. एकूण 147 ग्राम पंचायत सदस्य पैकी शिंदे गटाच्या जवळपास 110 ग्राम पंचायत सदस्यांचा दणदणीत विजय झाला. ग्राम पंचायत निवडणूकीचा निकाल जाहीर होताच कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशे वाजवीत एकमेकांना पेढा भरवून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याहस्ते नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी…
सातारा जिल्ह्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या 318 ग्रामपंचायती पैकी 199 ग्रामपंचायतीवर शिंदे फडणवीस सरकारने सत्ता काबीज करून सातारा जिल्ह्यातील पारंपारिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ला धोबीपछाड दिला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस,राष्ट्रीय काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या शिवसेना यांच्या महाविकास आघाडीने एकूण 98 जागांवर सत्ता काबीज केली आहे. तर स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून 28 ग्रामपंचायतीवर तटस्थ उमेदवार हे ग्रामपंचायतीचे सरपंच झाले आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यात आता शिंदे फडणवीस सरकारची ताकद वाढल्याचे दिसून येत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 318 ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडल्या यामध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेने 101 ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकवला आहे तर भाजपने 98 ग्रामपंचायतीवर आपली सत्ता काबीज केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसने 78 ग्रामपंचायतीवर सत्ता…
आपण रोजच्या स्वंयपाकासाठी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करतो. पण अनेकदा कळत-नकळत गॅसचा स्फोट होतो आणि नको ते घडतं. दोनच दिवसांपूर्वी राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील भुंगरा गावात एका लग्न समारंभात ६ गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन किमान ८ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे झालेला हा पहिला अपघात नाही. अशा घटना या आधीही झाल्या. मात्र, तुमच्या घरात स्वयंपाकाच्या गॅसमुळे अपघात झाला तर तुम्ही तेल कंपनीकडून नुकसान भरपाई घेऊ शकता, हे तुम्हाला माहित आहे का? याच विषयी जाणून घेऊ.. भारतामध्ये सर्वाधिक संख्येने घरामध्ये LPG गॅस सिलेंडरचा वापर केला जातो. मात्र एलपीजी गॅस सिलेंडर वापरताना सावधानता बाळगली नाही तर दूर्घटना होण्याचा धोका…
पुणे जिल्हा प्रतिनिधीः बबनराव धायतोंडे खानवटे तालुका दौंड येथे दिनांक9/12/2022 रोजी सकाळी 7 ते 11या वेळेत जुने ग्रामदैवत श्री. भैरवनाथ मंदिराचा कलशरोहन समारंभ ह. भ .प .बालब्रह्मचारी गोविंद महाराज शिंदे त्यांच्या हस्ते संपन्न झाला या मंदिराच्या सभामंडपासाठी व शिखराच्या कामासाठी व कलश बसविण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी .गावात झोळी फिरवून वर्गणी मागितली होती तसेच .या मंदिरासाठी आमदार राहुल दादा कुल यांनी दहा लाख रुपये निधी सभा मंडपासाठी दिला आहे. या मंदिराचे बांधकाम हुतात्मा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज चौथे नातू कै..दत्ताजीराव दिनकरराव राजेभोसले सावर्डेकर सरकार यांनी .. 1939 साली बांधकाम । केले होते याच मंदिराचा। जिर्णोध्दार व आज।पाच जोडपे पुजेला बसून होम यज्ञ…
राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील शिंदे-फडणवीस सरकारने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष अंतर्गत अर्थसहाय्य करण्यात येणाऱ्या आजारांच्या यादीत अनेक नवीन आजारांचा समावेश केला आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे१. अर्ज ( विहीत नमुन्यात)२. निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. (खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.)३. तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला.(रु. १.६० लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.)४. रुग्णाचे आधारकार्ड (महाराष्ट्र राज्याचे) लहान बाळासाठी (बाल रुग्णांसाठी) आईचे आधारकार्ड आवश्यक५. रुग्णाचे रेशनकार्ड (महाराष्ट्र राज्याचे)६. संबंधीत आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे.७. अपघातग्रस्त रुग्णांसाठी चङउ रिपोर्ट आवश्यक आहे.८. प्रत्यारोपण रुग्णांसाठी नढउउ / शासकीय…
नगर. ता. 19 केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय. रामदासजी आठवले साहेब यांनी भीमा कोरेगाव प्रकरणातील केसेस मागे घेण्यात यावेत, जसे मराठा मोर्चातील केसेस मागे घेतले आहेत, त्याप्रमाणे भीमा कोरेगाव प्रकरणातील केसेसही मागे घेण्यात यावी यासाठी आठवले साहेबांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात येणार आहे. 1 जानेवारी हा संघर्ष दिन म्हणून ओळखला जातो या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातून भीम अनुयायी हे कोरेगाव भीमा येथे येत असतात महार समाजाच्या इतिहासाची आठवण म्हणून सर्वजण जमा होत असतात .डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याची सुरुवात केली होती . आता अलीकडच्या काळामध्ये बरेच राजकीय पक्ष या ठिकाणी सभा घेतात यातूनच काही अनुसूचित प्रकार घडतात हे…
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचा महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशनावर दिनांक २३ डिसेंबर रोजी नागपूरात विराट मोर्चा. महाराष्ट्र विधानसभा आगामी हिवाळी अधिवेशन संत्रानगर नागपूरात दिनांक १९ डिसेंबर २०२२ पासून सुरू होत असून दिनांक २३ डिसेंबर २०२२ रोजी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने राज्यातील जनतेच्या ज्वलंत महत्वपूर्ण प्रश्नावर विराट मोर्चा चे आयोजन केले असून संपूर्ण राज्यभरातून जवळपास ५० हजार बी. आर. एस. पी. समर्थक नागपूरात या मोर्चासाठी धडकणार आहेत. या मोर्चाचे नियोजन म्हणजे या मोर्चासाठी एकटया नागपूर जिल्हातून दहा हजार व उर्वरित जिल्हयातून १५००० असे एकूण २५००० तर मराठवाडयातून एकूण १५००० व उर्वरित मुंबई कोकण, उत्तर महाराष्ट्र या विभागातून १५०००, असे एकूण ५०…
राज्य सरकारने लोकायुक्त कायदा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे. लोकायुक्त कायद्यामुळे महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी बोललो. चांगला निर्णय घेतल्याबाबत मी त्यांचे अभिनंदन केले. मी त्यांना सांगितले की, तुम्ही जो कायदा करत आहात त्याचे महत्त्व तुम्हाला आज कळणार नाही. कायदा झाल्यावर लोक जेव्हा त्या कायद्याची अंमलबजावणी करतील, तेव्हा तुमच्या लक्षात येईल हा निर्णय किती क्रांतिकारक आहे. माहिती अधिकार कायद्याच्यावेळी लोकांनी मला वेड्यात काढले होते. आता त्यांना माहिती अधिकार कायद्याचे महत्त्व कळते, असे मी त्यांना सांगितल एका बाजूला फडणवीसांनी आम्हाला आश्वासन…