Eknath Shinde : जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवर लाठीचार्ग प्रकरणाचे पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले आहेत. राज्यातील अनेक जिल्हे, तालुके बंद करत निषेध व्यक्त केला जात आहे तसेच एस टी बसेस सुद्धा बंद केल्या आहेत. अशातच आता राज्यात एकीकडे मराठा आंदोलक आक्रमक होतायेत, तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री बुलढाण्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम घेण्यात व्यस्त होते.. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघेही गैरहजर होते. याच पार्शवभूमीवर एकनाथ शिंदेच्या माथी मराठा आंदोलन प्रकरणाचं खापर फुटणार अश्या चर्चाना उधाण आलाय.. चला तर जाणून घेऊ थोडं सविस्तर.. फडणवीसांचे आदेश, Eknath Shinde यांना भोगावे लागणार मुंबईत पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, जालन्यातील आंदोलनकर्त्यांसोबत…
Author: mahalokwani
राज्यात पावसासंदर्भात हवामान विभागाने चांगली बातमी दिली आहे. राज्यात पाऊस weather आता परतणार आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दबाचा पट्टा तयार होत आहे. यामुळे पुढील पाच दिवस पावसाचे असणार आहे. राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. पुणे आणि परिसरात पुढील ४८ ते ७२ तासांत मुसळधार पाऊस होणार आहे. यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्यांनाही दिलासा मिळणार आहे. ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर आता पाऊस weather सक्रीय झाला आहे. पुढील पाच दिवस पावसाचे असणार आहे, असा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला. राज्यात अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. Maratha Reservation…
जालन्यातील झालेल्या लाठीचार्ज प्रकरणामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. अशातच मराठवाड्याकडे जाणाऱ्या सर्व एसटी बसेस ST Bus बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याहून छत्रपती संभाजीनगर, जालन्याला जाणाऱ्या बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्याहून संभाजीनगर आणि जालन्याला जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. ST Bus प्रवाशांना हाल सोसेना ST Bus बस सेवा बंद एसटी बस ST Bus सेवा अचानक बंद केल्यामुळे सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल झालेले पाहायला मिळत आहे, खाजगी बस कंपन्यांकडून नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट पाहायला मिळत आहे, दुप्पट भाडे घेतले जात आहे , सरकारने अशा प्रकारे अचानक बस सेवा बंद केल्यामुळे नागरिक आहे त्या ठिकाणी गुंतून राहिलॆ आहे…
जालन्यात मराठा Maratha आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले आहेत. अनेक ठिकाणी आज तिसऱ्या दिवशीही निदर्शने केली जात आहेत. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी रास्तारोकोही केला जात असून काही भागात बंद पुकारण्यात आला आहे. तर काही ठिकाणी टायर जाळून निषेध नोंदविला जात आहे. Maratha बेछूट लाठीमार प्रकरण सरकारने केली पोलिसांवर मोठी कारवाई जालन्यात मराठा Maratha आंदोलकांचं उपोषण सुरू असतानाच मराठा आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला. त्यामुळे अनेक मराठा आंदोलक जखमी झाले आहेत. पोलिसांनी बेछूट लाठीमार केल्याने या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. त्यामुळे मराठा आंदोलकांनी ठिकठिकाणी निदर्शने सुरू केली आहेत. अनेक ठिकाणी ठिय्या आंदोलन केला जात आहे. काही ठिकाणी रास्ता रोको करण्यात…
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार जामखेड Jamkhed शहरातील श्री. शनी मारुती मंदिर येथे प्रत्येक शनिवारी मंदिर समिती व भक्त मंडळी च्या वतीने सायंकाळी ७ वा आरतीचे नियोजन करण्यात येत असून मारुतीची मूर्ती व गाभाऱ्याला आकर्षक लाल गुलाबची सजावट करण्यात आली असून दोन्ही गाभारे लाल रंगाने न्हाऊन निघाले आहेत . हे नक्की वाचा Maratha Reservation | जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यामागे हात कुणाचा ?, वाचा संपूर्ण घटनाक्रम… Jamkhed| जामखेड शनी- मारुती या काळात मंदिर समितीने कधी तुळशीच्या तर कधी शेवंतीच्या फुलांनी तर गलांडा ची फुलांनी गाभाऱ्याची सजावट केली होती . लाल गुलाब हव्या त्या संख्येत मिळत नसल्याने अखेर मंदिर समितीने अनेक ठिकाणाहून…
जामखेड प्रतिनिधी :धनराज पवार अंतरवाली-सराटी. ता.अंबड जि. जालना. या ठिकाणी मराठा आरक्षण आंदोलकांवर लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आज रोजी सकल मराठा जामखेड तालुक्यातील बांधवांनी दिनांक २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ रोजी जामखेड तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. हे नक्की वाचा Maratha Reservation | जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यामागे हात कुणाचा ?, वाचा संपूर्ण घटनाक्रम… ही तर सरकार ची लोकसभा निवडणुकीसाठी खेळी आहे – प्राध्यापक मधुकर राळेभात यावेळी आंदोलकांवर लाठी हल्ला, आणि गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी. व आंदोलकांच्या मागण्या तत्काळ मान्य करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन नायब तहसीलदार मनोज भोसेकर यांना देण्यात आले.उद्या रविवारी ३ सप्टेंबर रोजी जामखेड तालुका बंद…
Maratha Reservation : जालन्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे काल (शुक्रवार) मराठा आरक्षण (Maratha Reservation )आंदोलनादरम्यान पोलिसांकडून लाठीमार झाला. या घटनेत अनेक पोलिस आणि ग्रामस्थ जखमी झाले. या प्रकरणात राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यादरम्यान जालना शहरात जमाव आक्रमक झाल्याने पोलिसांनी हवेत गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला आहे. कालच्या प्रकारानंतर जालना येथे मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. शहरातील अंबड चौफुली येथे आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी संतप्त आंदोलकांनी ट्रक देखील जाळली. तसेच पत्रकारांनाही रोखले. या दरम्यान आंदोलकांचा जमाव आक्रमक झाल्याने पोलिसांनी हवेत गोळीबार देखील केला. घटनास्थळी पोलीस अधीक्षक दाखल झाले…
जालन्यात Jalana मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं समोर आलं आहे. अंतरवाली सराटी गावात मराठा आक्रोश मोर्चाचं आरक्षणासाठी उपोषण सुरू होतं. तेव्हा पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. यामुळे एकच एक गोंधळ उडाला आहे. तर, गावकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचा दावा करण्यात येत आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर राज्यात तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची भिती आहे. मराठा समाज जर तुम्हाला सत्तेत आणु शकतो तर तुम्हाला सत्तेतून बाहेर काढु शकतो. जामखेड प्रतिनिधी धनराज पवार याबाबत माहिती अशी की,29 ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह 10 जण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले होते. त्यांच्या समर्थनासाठी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उपोषणकर्त्या आंदोलकांची प्रकृती…
जामखेड :- शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिल्या जाणाऱ्या 2022-23वर्षातील क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार आज शालेय शिक्षण विभागाने जाहीर केले आहेत. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा नायगाव शाळेतील आदर्श, तंत्रस्नेही व उपक्रमशील शिक्षक श्री.लक्ष्मीकांत एकनाथराव ईडलवार सर यांना या वर्षीचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणगौरव आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्यामुळे जामखेड तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. मागील सोळा वर्षाच्या शैक्षणिक सेवेमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सातत्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ केली. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शैक्षणिक लेख,विविध शालेय व सहशालेय उपक्रम,तसेच शासनाच्या विविध पोर्टलवर शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती,राष्ट्रीय स्तरावरच्या विविध…
धनराज पवार पोलिस दलात काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना आपल्या परिवारपासून दूर राहून आपले कर्तव्य बजवावे लागत असल्याने त्यांना या सणापासून वंचित राहावे लागत असल्याचे लक्षात घेत जामखेड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या वतीने जामखेड पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधन साजरे केले. यावेळी पोलिस निरीक्षक महेश पाटील, उपनिरीक्षक अनिल भारती तसेच कर्मचाऱ्यांना राखी बांधून आपली सामाजिक बांधिलकी जपली.अहोरात्र कर्तव्य बजावून जनतेचं रक्षण करणाऱ्या पोलिस बांधवांना बहिणीची उणीव भासू नये. त्यामुळे या पोलिस कर्मचाऱ्यांना राख्या बांधून आज त्यांच्यासोबत रक्षाबंधन साजरे केले. दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो, देव त्यांच रक्षण करो, अशी प्रार्थना या पोलीस बांधवांसाठी महिलांनी देवाकडे केल्याचं यावेळी पहायला मिळालं. [better-ads…