अहिल्यानगर (दि.21 फेब्रुवारी):-
पाईपलाईनरोड येथील कादंबरी नगरी इस्कॉन मंदिर शेजारी हिंदू योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला.यावेळी सामाजिक कार्यकर्त्या शिव भगिनी सौ.मंगल राजेंद्र शेडाळे यांच्या वतीने सर्व शिवभक्तांना अन्नदान करण्यात आले.हिंदू योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने सौ. शेडाळे यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले.

या सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.यावेळी डॉ.राहुल कुलकर्णी म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक अडचणींवर मात करुन आपल्या शौर्याने स्वराज्य उभारले. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक महान योध्दा नव्हे, तर अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांनी आपल्या आदर्शवत राज्यकारभाराने रयतेच्या मनावर राज्य केले.अठरापगड जातीला बरोबर घेऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली.त्यांचे विचार व कार्य समाजासाठी दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.