महालोकवाणी न्यूज:-
निरोगी आयुष्यासाठी आपल्याला दिवसभरामध्ये आठ तास झोप आवश्यक असते. मात्र बदलत्या जीवनशैलीत वाढलेल्या ताणामुळे या झोपेचं प्रमाण कमी झालं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्यानं विकसित झालेलं अहमदनगर महानगर देखील त्याला अपवाद नाही.

अहमदनगरमध्येही रात्रीच्या वेळी झोप न लागण्याचं प्रमाण वाढलंय. मानसोपचार तज्ज्ञांकडं याबाबत येणाऱ्या तक्रारीमध्ये वाढ झालीय. मानसोपचार तज्ज्ञ संदीप शिसोदे यांनी यावर काही उपाय सांगितले आहेत. तुम्हालाही या प्रकारची अडचण येत असेल तर त्यावर मात करण्यासाठी या टिप्स उपयोगाला येतील.
हे ही वाचा:- हिंदूंनाही करावा लागणार ‘कुराण’चा अभ्यास; ‘या’ देशातील सरकारचा अजब गजब कायदा !
झोप का लागत नाही याचे कारणे?

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाकडं अत्याधुनिक साहित्य आले आहे. या साहित्याचा रोजचं आयुष्य सोपं आणि वेगवान होण्यात फायदा झालाय. त्याचबरोबर याचे काही तोटेही आहेत. आता अनेकांच्या हातामध्ये स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनचं त्यांना व्यसन लागलंय. मोबाईलशिवाय बसणं, झोपणंच काय काहीही शक्य नाही अशी अनेकांची भावना असते. रात्री झोप न लागण्याच्या समस्येतही हे महत्त्वाचं कारण आहे.
हे ही वाचा :- Gautami Patil | गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात महिला आल्या दांडके घेऊन, जाणून घ्या कारण..
मानसोपचार रुग्णालयामध्ये येणाऱ्या दहापैकी पाच रुग्णांना झोप न लागण्याची समस्या आहे. तर काही जणांना झोप लागल्यावर अचानक काही वेळानं जाग येते. 40 ते 50 वयोगटातील नागरिकांचा यामध्ये समावेश आहे. झोपेच्या गोळ्या घेतल्याशिवाय झोप येत नाही अशाही तक्रारी आहेत. यामध्ये महिलांपेक्षा पुरुषांचं प्रमाण जास्त आहे
