जामखेड प्रतिनिधि धनराज पवार –
पाटोदा गरडाचे येथे आज रोजी जामखेड, कर्जत – श्रीगोंदे या रस्त्याचे काम चालू आहे , संम्बधित ठेकेदारा कडून वाहतूक नियमांचे फलक लावलेले नव्हते त्यामुळे या ठिकाणी या अनेक अपघात झाले होते , या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांनी आंदोलनचा इशारा दिला होता त्या अभावी प्रवासी नागरिकांना, अपघाताला समोरो जावे लागत होते, गेल्या वर्षभरात लहान मोठे अपघात झाले असून, काहींना जीवाला मुकावे लागले आहे.

पाटोदा गावापासून २ किलो मीटर अंतरावरील रस्त्यावर मुरुमाचे ढिगारे हे गतिरोधका सारखे असल्या कारणाने अपघाताला निमंत्रण देत आहेत, हे मोटरसायकल वरून जात असताना अचानक दिसलेल्या ढिगाऱ्यावरून गाडी घसरून अपघात झाला याच मार्गामुळे अपघात ग्रस्तांना मुकावे लागले आहेत सर्व अपघात हे केवळ फलक नसल्यामुळेच घडले आहेत.
रस्त्याचे काम निखिल कन्स्ट्रक्शनचे ठेकेदार यांनी घेतले असून रस्त्यावर ठिकठिकाणी मुरुमाचे ढिगारे टाकले होते. माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांनी युवा पत्रकार धनराज पवार यांना फोन करून सदर घटनेची माहिती दिली होती. या घटनेची बातमी “महालोकवाणी न्युज” ने प्रसारित केली. या बातमीचा उद्देश हा लोकांचा जीव वाचावा यासाठी ही बातमी करण्यात आली होती.

या रस्त्याने ये- जा करणारे प्रवासी यामध्ये मोटार सायकल तसेच इतर वाहनांना अपघातास सामोरे जावे लागत आहे.रात्री – अपरात्री गाडी ंना हा ढिगारा दिसत नाही व अपघात होतात पंरतु रस्त्याला कोणताही फलक नाही की,कंपनीने त्वरीत रस्त्यावर चे मुरुमाचे ढिगारे काढले व फलक लावला या बद्दल माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांनी आपले आंदोलन मागे घेतले असून या रस्त्यावर त्वरीत हे काम मार्गी लावल्याबद्दल कंपनीचे ठेकेदार यांचे आभार मानले .
