Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » नगरच्या उत्तरेच्या तुलनेत दक्षिण भागावर पूर्वीपासून सर्वच क्षेत्रांमध्ये भेदाभेद-राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रतापराव ढाकणे

नगरच्या उत्तरेच्या तुलनेत दक्षिण भागावर पूर्वीपासून सर्वच क्षेत्रांमध्ये भेदाभेद-राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रतापराव ढाकणे

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 22, 2023Updated:February 22, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज

सोमराज बडे: पाथर्डी तालुका प्रतिनिधी

मिरी ता. पाथर्डी –

सन १९८५ सालापासून नगर जिल्ह्याचे विभाजन करावे अशी मागणी सातत्याने जनतेतून होत आहे. उत्तरेच्या तुलनेत दक्षिण भागावर पूर्वीपासून सर्वच क्षेत्रांमध्ये भेदाभेद केला जातो.आजही जिल्ह्याला मिळणाऱ्या एकूण निधी पैकी सर्वाधिक निधी हा उत्तरेकडे नेला जातो.मात्र ज्या ज्या वेळी अशी मागणी पुढे येते उत्तरेतील नेते मंडळी मुख्यालय श्रीरामपूरला असावे की संगमनेरला यावरून वाघाचा बनाव निर्माण करून मुख्य मागणीवरून लक्ष विचलित करतात.अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे(Ncp) नेते प्रतापराव ढाकणे यांनी केली.

संवाद यात्रेनिमित्त आयोजितआज (ता.२१)रोजी मिरी ता. पाथर्डी येथील मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे होते यावेळी शिवशंकर राजळे ,भगवानराव दराडे बंडू पाटील बोरुडे सिताराम बोरुडे अमोल वाघ राजेंद्र मस्के रफिक शेख प्रकाश शेलार अभिजीत ससाने राहुल गवळी आदीची उपस्थिती होती.


पुढे बोलतांना ढाकणे म्हणाले की उत्तर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये नगरच्या दक्षिण भागावर कायमच अन्याय होत आलेला आहे. राजकीय सोयीसाठी म्हणून या भागाकडे उत्तरेतील नेत्यांनी पाहिली सत्ता मिळवली आणि या दुष्काळी भागावर समस्या सोडवण्याची वेळ येते तेव्हा जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी आज जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून जिल्ह्याला मिळणाऱ्या एकूण निधी पैकी सर्वाधिक निधी उत्तरेत पळवला जातो. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी या भागाचा वापर काही नेत्यांकडून जाणीवपूर्वक केला जातो. आजची परिस्थिती वेगळी नाही १९८५ ला दक्षिण जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी एकत्रित रित्या एक पत्र देऊन जिल्हा विभाजनाची मागणी केली, तेव्हापासून आजपर्यंत ही मागणी प्रलंबित आहे. नगर जिल्ह्याला अहिल्यादेवी चे नाव देण्यास काय हरकत आहे.?मात्र त्यालाही सत्तेतील पुढारी विरोध करतात हे आपले दुर्दैव आहे .

संवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न जाणून घेत आहोत.प्राजक्ता तनपुरेंनी राहुरी मतदारसंघातील पाथर्डीतील ३९गावांचा विकासाचा अनुशेष भरून काढला दुर्दैवाने महाविकास आघाडीचे सरकार गेले. आणि आज या भागातील विकासासाठी निधी मिळवायला तनपुरे यांना संघर्ष करावा लागतो.
यावेळी बोलतांना आमदार तनपुरे म्हणाले राज्य सरकार कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याच्या मानसिकतेत नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार त्यांना पराभवाची भीती सतावते आहे. त्यामुळेच ढाकणे यांनी काढलेली संवाद यात्रा लोकांना धीर देणारी ठरत आहे अशा यात्रेच्या माध्यमातून नेते व जनता यांच्यातील दरी कमी होण्यास मदत होते. आजचे भाजप सरकार शेतकऱ्यांची वीज तोडत आहेत अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव आहे. मिरी भागातील शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण शिराळ येथे उपकेंद्राची मंजुरी घेतली त्याचे काम येत्या काही दिवसात सुरू होईल.अधिकाऱ्यांना जनतेच्या समस्येसाठी फोन लावला असता त्यांच्यावर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा प्रचंड दबाव दिसून येतो लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना फिल्डवर बोलवले तर पालकमंत्र्यांच्या परवानगीशिवाय आम्ही येऊ शकत नाही.


असे उत्तर अधिकारी आम्हाला देतात आम्हाला पण जनतेने आमदार म्हणून संधी दिली आहे.लोकांचे प्रश्न सोडवायचे नसतील मग आम्ही आमदार काय फक्त मिरवायला झालो आहोत का? त्यामुळे हे सर्व ओळखून यापुढे जनतेने महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शिवशंकर राजळे,रफिक शेख,भगवान दराडे,बंडू पाटील बोरुडे, राहुल गवळी,आदींची भाषणे झाली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्धव दुसंग यांनी तर आभार महेंद्र सोलाट यांनी मानले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleमहाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धेला उदंड प्रतिसाद; खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत सोहळा पार..
Next Article खाजगी सावकाराला कंटाळून स्वतः ला घेतलं पेटवून ..!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.