पुणे जिल्हा प्रतिनिधी: बबनराव धायतोंडे
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक मा. खा. राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांची वीज तोडणी करू नये , खंडित केलेला वीज पुरवठा पूर्ववत करावा,केंद्र सरकारने हमीभावाचा कायदा करावा उसाच्या एफ आर पी प्रमाणे इतर सर्व शेतीमालाला हमीभाव कायद्याचे संरक्षण द्यावे शेतकऱ्यांना शेती पंपाला दिवसा बारा तास विना कपात वीज मिळावी नियमित कर्ज फेड करणारे शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेली ५० हजार रुपये अनुदान कोणत्याही अटी शर्ती शिवाय तात्काळ त्यांच्या बँक खात्यात जमा करावे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी काटामारीतून लूट होत आहे यासाठी देशातील सर्वच कारखान्यांचे वजन काटे डिजिटल ऑनलाइन व्हावे व त्यावर थेट साखर आयुक्तांचे नियंत्रण असावे, उसाच्या एकरकमी एफ आर पी चा कायदा करुन तात्काळ अमलबजावनी करावी, उर्वरित थकीत एफ आर पी त्वरित जमा करावी या विविध मागण्यांसाठी आज राज्यभर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले

याचाच एक भाग म्हणून देऊळगाव राजे येथे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले, यावेळी दौंड पूर्व भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते दौंड पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी चौक बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला होता महावितरणचे दौंड शाखा अभियंता महेश धावडे , ग्रामीणचे जीवन ठोंबरे हे यावेळी उपस्थित होते, यावेळी राजाभाऊ कदम राजेंद्र बुराडे , दादा सूर्यवंशी, विलास पाचपुते, राजू सूर्यवंशी,विकास खोसे, ताराचंद बाराते सागर सूर्यवंशी, जगन्नाथ बुराडे, मदन खेडकर ,पोलीस पाटील सचिन पोळ , पोपट खोसरे, नाथा कदम, गणेश कदम , उमेश काळे, नंदू काळे,पांडूरंग कदम, वासुदेव आवचर, बाळूकाका पाचपुते, नामदेव बरडे, वासुदेव गायकवाड, संदीप जगताप, नाना जराड, कमलाकर कदम, भरत गिरमकर आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
