दिनांक २२ मार्च २०२३ रोजी गुढीपाडवा मेळाव्यात मनसे नेते राज ठाकरे यांनी केलेले भाषण चांगलेच चर्चेत आले. त्यांच्या या भाषणानंतर दुसऱ्या दिवशी प्रशासनाने धडक कारवाई सुरु केली . त्यांनी उल्लेख केलेले माहीम येथील बाधकाम पाडण्यात आले, दुसरीकडे पुणे शहरात त्यांच्यांविरोधात तक्रार अर्ज आला

राज ठाकरे यांनी २२ मार्च रोजी केलेले भाषण हिंदू-मुस्लीम समाजात भांडण लावणार आहे. त्यांच्या भाषणामुळे मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यातून जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे, राज ठाकरे यांचे संपूर्ण भाषण राजकीय दबाबाखाली केले गेले आहे असे सांगण्यात येत आहे . रमजान महिन्यात केलेल्या या भाषणामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे राज ठाकरे यांच्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच त्यांना यापुढे भाषणासाठी परवानगी देऊ नये, अशी मागणी तक्रारदार बाजीद राजाक सय्यद यांनी वाकड पोलीस ठाण्यात केली आहे

माहीमच्या खाडीतील अनधिकृत दर्ग्याबाबत आवाज उठवला. हा दर्गा अनधिकृत आहे. त्यावर कारवाई करा, नाही तर आम्ही तिथे गणपतीचं मंदिर बांधू, असा इशारा देतानाच राज ठाकरे यांनी प्रशासनाला कारवाईसाठी एक महिन्याची मुदत दिली. त्यांच्या या भाषणानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच कारवाई सुरु झाली. राज ठाकरे यांच्या इशाऱ्याला 24 तास उलटत नाही तोच मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने हे अतिक्रमण हटवले आहे. खाडीतील मजारच्या जागेवरील हिरवा झेंडा हटवण्यात आला आहे. तसेच अनधिकृत मजारवर जेसीबी मशीन फिरवण्यात आली आहे. सांगलीत त्या मशिदीवर कारवाई होण्याचे संकेत मिळत आहे.
