अहमदनगरमधील कापडबाजारात आज धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुले व्यापारी वर्गातही संताप दिसून येत आहे.

भरबाजारात खळबळजनक घटना अहमदनगर शहरात घडली आहे. व्यापाऱ्यांवर प्राणघातक हल्ल्या झाला असून दोघेही व्यापारी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दीपक नवलानी आणि प्राणिल बोगावत अशी हल्ला झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत.
या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयाबाहेर व्यापाऱ्यांची मोठी गर्दी जमली आहे. कापड बाजारातील व्यापाऱ्यांनी या घटनेच्या निषेधार्थ बाजारपेठ बंद करण्याचा घेतला आहे
