आज दिनांक 15 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी पाचच्या वाजण्याच्या सुमारास आष्टी तालुक्यातील अरणविहिरा ,तागडखेड ,वेलतुरी देवळाली, घाटापिंपरी गोखेल, सह परिसरात गारांचा वर्षाव होऊन शेत पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे
बीड: बळीराजा शेतकऱ्यांवर कोपला; आष्टीतील अरणविहीरा, तागडखेल, वेलतूरी, घाटा पिंपरी, देवळाली, गौखेलसह परिसरात ढगफुटी सदृश्य पावसाचे थैमान…#maharashtraRain @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @SandipKshirsagr @sureshdhas1 pic.twitter.com/F51CqkOGgg
— Mahalokwani (@mahalokwani) April 15, 2023
मागील चार ते पाच दिवसापासून नगर- बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही प्रचंड मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व गारांचा वर्षाव तसेच ढगफुटीसदृश्य परिस्थिती पाहावयास मिळत आहे.

यामध्ये शेतकऱ्यांच्या तोंडाघाशी आलेला घास निसर्गाने पुन्हा एकदा हिरावून घेतलेला पाहावयास मिळत आहे प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होऊन सुद्धा सरकारला कसल्याही प्रकारचे दखल घेताना दिसत नाही, शिंदे-फडणवीस सरकार हे फक्त आपले सरकार टिकवण्यातच व्यस्त असताना दिसत आहे, आणि विरोधी पक्ष ही आपण सत्तेत कसे जाऊ यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचे झालेले नुकसान भरपाई मिळवण्यास कोणीही मदतीला धावून येत नाही यासारखी बिकट परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण होताना दिसत आहे. जो तो आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे मात्र बळीराजाला मदतीची गरज आहे त्याकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे, अवकाळी पावसामुळे फळबागा तसेच कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे,

चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी नगर जिल्ह्याच्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली पण पाणी केल्यानंतर प्रत्यक्ष शेतकऱ्यांना लाभ अद्याप पर्यंत मिळालेला नाही ज्या घरांचे नुकसान झाले 40 घरांचे नुकसान झाले होते त्यापैकी फक्त दोन घरांनाच मदत मिळाली आहे जर असे होत असेल तर शेतकऱ्याने मदत मागायची तरी कोणाला असा प्रश्न उपस्थित होत आहे
