Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » शिर्डी साई मंदिर ट्रस्टकडे पैसे ठेवायलाच जागा नाही; दर महिन्याला जमा होते इतके दान.!

शिर्डी साई मंदिर ट्रस्टकडे पैसे ठेवायलाच जागा नाही; दर महिन्याला जमा होते इतके दान.!

mahalokwaniBy mahalokwaniApril 21, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

शिर्डीच्या साई मंदिरात आता गेल्या काही वर्षापासून दान म्हणून प्रचंड नाणी मिळाली आहेत. हजारो किलो वजनाचीही नाणी असून ही नाणी ठेवायची कुठे असा प्रश्न ट्रस्टी आणि बँकांना पडला आहे.

भाविक साईबाबांचं मनोभावे दर्शन घेतात आणि आपआपल्या कुवतीनुसार साईचरणी भेटही अर्पण करतात. काही लोक सोनं अर्पण करतात. काही चांदी देतात. काही नाणी तर काही नोटा अर्पण करतात. जसा नवस तशी भेट साईबाबांना दिली जाते. मनोकामना पूर्ण झाल्यावर भक्त करोडो रुपयांचे दान करतात. मात्र आता हे दानच आता डोकेदुखी ठरताना दिसत आहे. हजारो किलोंची नाणी साई मंदिर ट्रस्टकडे जमा झालेली आहे. ही नाणी ठेवायची कुठे? असा प्रश्न फक्त साई मंदिर ट्रस्टलाच नाही तर बँकांनाही पडला आहे.

Advt

बँक प्रशासनाच्या मते आता ग्राहक नाणी घेत नाहीत. ही नाणी ठेवण्यासाठी जागाही नाही. साडे तीन ते चार कोटी रुपयांची नाणई ठेवण्यासाठी ना ट्रस्टकडे जागा आहे ना बँकेकडे, असं सांगितलं जातं. एका वृत्तवाहिनीने हे वृत्त दिलं आहे.

विशेष म्हणजे या नाण्यांमुळे ट्रस्टी, बँकच त्रस्त नाही तर नाणी ठेवण्यात येणाऱ्या बिल्डिंगच्या खाली काम करणारे व्यापारीही भयभीत झालेले आहेत. या हजारो किलो वजनाच्या नाण्यांच्या वजनामुळे इमारत कोसळण्याची भीती या व्यापाऱ्यांना वाटत आहे. ही नाणी लवकरात लवकर इमारतीतून हटवली पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. ऑनलाइन पेमेंटमुळे रोख रकमेचा व्यवहार कमी झाला आहे. लोक आता रोख रक्कम खिशात ठेवत नाही.

अन्य बँकांमध्ये अकाऊंट खोलण्याचा कमिटीने निर्णय घेतला आहे. असं केल्याने थोडा दिलासा मिळेल. आरबीआयनेही आमची नाणी ठेवण्याची समस्या दूर करावी अशी आमची विनंती राहील, असं सीईओ राहुल जाधव यांनी सांगितलं.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleस्वभिमानाचं सन्मानाच,आणि समाजहिताच राजकारण करणार – प्रा. सचिन (सर) गायवळ
Next Article दौंड Daund Crime| तुला मुलीच होतात, मुलगा होत नाही म्हणून सूनेला छळले, महिलेने घेतला टोकाचा निर्णय
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.