जामखेड प्रतिनिधि: धनराज पवार
जामखेड शहरातील जनविकास सेवाभावी संस्थेच्या वतीने नाशिक विभागाचे अप्पर आयुक्त संदिप गोलाईत यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी जनविकास सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मी पवार,संतोष पिंपळे,विकी पिंपळे,करण काळे,पवन पवार आदी उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील राजुर आदिवासी प्रकल्प येथे वेळो- वेळी जावून आदिवासी पारधी समाजाला विविध मिळणा ऱ्या योजने बद्दल चौकशी केली असता, संबंधित विभागाचे अधिकारी सांगतात की,सदर योजना आलेली नाही व कुठल्याही योजना पोहचत नाही.
हे नक्की वाचा: पंजाबराव डख यांचे मान्सून संदर्भात मोठे भाकीत; या दिवशी होणार मान्सून महाराष्ट्रात दाखल.! पहा आणखी काय म्हटले
या मध्ये शासकीय आश्रम शाळा समुह योजना ,स्वेच्छा संस्थाना आश्रम शाळा चालविण्यास अर्थ सहाय्य, पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना,आदिवासी मुला – मुलींची शासकीय वस्तिगृहे ,अनुसुचित जमातींच्या विद्यार्थांना शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना,सुवर्ण महोत्सवी आदिवासी पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना,केंद्र शासन सहाय्य योजना,शबरी आदिवासी घरकूल योजना,पारधी विकास कार्यक्रमांतर्गत घरकूल योजना,भारतरत्न डाँ. ए.पी.जे.अब्दूल कलाम अमृत आहार योजना ,वन हक्क योजना तसेच आदिवासी लोकांना सरकारी योजनेचा लाभ मिळावा व प्रत्येक योजना मिळवून देणे व त्यांचे भविष्य चांगले व्हावे अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.