जामखेड तालुक्यातील शिक्षकांची किमान वीस कोटी रुपयाला फसवणूक झाली असल्याची जोरदार चर्चा असून . या सदर्भात अद्याप कोणीही तक्रार देण्यास पुढे येत नाही मात्र आकड्याची चर्चा जोरात आहे .
जामखेड तालुक्यातील शिक्षकांची किमान वीस कोटी रुपयाला फसवणूक झाली असल्याची जोरदार चर्चा असून . या सदर्भात अद्याप कोणीही तक्रार देण्यास पुढे येत नाही मात्र आकड्याची चर्चा जोरात आहे . हडपसर पुणे येथील एक शेअर ब्रोकर च्या माध्यमातून ही फसवणूक झाली आहे . प्रत्येक महिन्याला गुंतवलेल्या रक्मेच्या दहा टक्के पैसे आपल्या खात्यावर जमा होतील असे आश्वासन देण्यात आले . सुरुवातीला काही शिक्षकांना भरपूर फायदा मिळाला .
त्यामुळे अनेक शिक्षक या कडे वळले . असा फायदा नियमित खात्यावर जमा झाला व त्याची जोरदार चर्चा तालुक्यात झाली . त्यानंतर या ब्रोकरचे दोन शिक्षक एजंट बनले दुसऱ्याची गुंतवणूक मिळवून दिल्यास एजंटा ला एक टक्का रक्कम मिळू लागली . त्यामुळे या एजंटांनी आपला हा व्यवसाय जोरात सुरु केला .

ज्यांना शक्य होते त्यांनी शिक्षक बँकेचे कर्ज काढले . ज्यांच्या वर शिक्षक बँकेचे कर्ज होते त्यांनी खोटे पागरपत्र तयार करून दुसऱ्या बँकेचे कर्ज काढले . यात धक्कादायक म्हणजे या शिक्षकांनी शिक्षक बँकेची कर्ज कपात असताना ती मुख्याध्यापकांना सांगून पगारपत्रकात दाखवली नाही . दुसऱ्या बँके कडून पण कर्ज घेतले . यात शिक्षक जोडपी व नोकरदार जोडपी जास्त प्रमाणात आहे व त्यांनी पाचवीस लाखा पेक्षा जास्त रुपये यात गुंतवले होते . त्याना शिक्षक बँक व इतर बँक असे दोन हप्ते भरावे लागत आहेत . त्यांचा जीव मेटाकुटी ला आला आहे .
परंतु इज्जत वाचवण्यासाठी ते तक्रार देण्यास तयार नाहीत . सदर शेअर ब्रोकर वारला असल्याची बतावणी एजंट शिक्षक करत आहेत् त्यामुळे सर्व गप्प आहेत परंतु असे काही झालेले नाही . ब्रोकर पळून गेला आहे . कार्यालय बंद आहे . हे सर्व शिक्षक पैसे मागतात म्हणून ते दोन शिक्षक नेते लपून बसले आहेत . या दोन एजंट शिक्षका कडून पैसे मिळण्याची अजिबात शक्यता नाही . त्यामुळे या दोनशे शिक्षकांनाची फसवणूक झाली ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे . व हे एजंट एव्हडी रक्कम देऊ शकत् नाहीत . त्यांच्यात मारामारी झाल्याची चर्चा आहे . शिक्षक नेता असणाऱ्या एजंटांनी कोट्या वधी रुपये स्वतः च्या व्यवसायात टाकले होते . तिथ पण तो व्यवसाय बंद पडल्याने कोणाला ही पैसे परत मिळणार नाहीत . कोणताही शिक्षक या कर्जातून सेवा निवृत्त झाला तरी सुटणार नाही हे नक्की .
जामखेड ला नव्याने रुजू झालेले गट शिक्षण अधिकारी बाळासाहेब धनवे यांनी अशा पगारा शिवाय पैसे कमवणाऱ्या शिक्षकांची कार्यशाळा घ्यावी म्हणजे फसवणूक होणार नाही . ज्या मुख्याध्यापकांनी खोटी पगारपत्र देऊन कर्ज काढण्यास मदत केली त्यांची चौकशी करावी