महालोकवाणी न्यूज प्रतिनिधी:
सध्या जामखेड कर्जत ,श्रीगोंदा, दौंड या ठिकाणी राष्ट्रिय महामार्गाचे काम सुरू आहे. रस्त्याचे काम नियमानुसार होत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. मुरूम न वापरात चक्क माती टाकण्यात येत आहे. यामध्ये आहिल्यानगर ते वजनकाटा इथे रस्त्याच्या साईड पट्ट्या भरण्याचे काम चालू आहे, या साईड पट्ट्या भरण्यासाठी मुरमा ऐवजी चक्क मातीने साईड पट्ट्या भरण्याचे काम जोरात चालू आहे.

जामखेड शहरात मोठ्या प्रमाणात दळणवळणाचे साधन आहे होत आहे त्या दृष्टीचे या रोडचे काम चांगले होणे महत्वाचे आहे. . या रस्त्याचे काम ,माघील वर्षी सुरू झाले होते. संबंधित कंत्रादारांने रस्त्यावर मुरूम न टाकता फक्त माती टाकली आहे.त्यात वाहने घसरून अनेक लहानमोठे अपघात झाले. यात दोघांना आपला जीव गमावावा लागला.
पहा व्हिडिओ👇
#karjatjamkhed #nitingadkari #nationalraod pic.twitter.com/PlYBVOE13J
— Mahalokwani (@mahalokwani) May 18, 2023
सध्या पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे जर या पद्धतीने साईट पट्ट्या भरण्याचे काम चालू राहिले राहिल्यास पावसाळ्यामध्ये रस्त्याच्या खाली गाडी घेऊ शकणार नाहीत अशी स्थिती निर्माण होईल किंवा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही . हे काम अत्यंत नामांकित अशा निखिल कंट्रक्शनला दिले साईड पट्टया भरण्याचे काम चालू आहे यामध्ये कुठेतरी आपल्या कामाचा दर्जा कमी करताना दिसत आहे. या संबंधित कन्ट्रक्शनशी संपर्क केला असता त्यांच्याशी म्हणणे आहे की ही माती आम्ही टाकली नसून शेतकऱ्यांनी टाकली आहे , मग प्रश्न असा उपस्थित होतो की या रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर हे कर्जतजामखेड मधील शेतकऱ्यांना दिले आहे का? त्यामुळे हे साईट पट्ट्या भरण्यासाठी माती वापरतात नंतर त्यांच्याकडून असे सांगण्यात येते की सदरची माती आहे ती आम्ही उचलून घेणार आहोत अशी तफावत उत्तरे संबंधित ठेकेदाराकडून मिळत आहेत, मुरूम जवळ उपलब्ध नाही असेही सांगतात तरी या कामाच्या संदर्भात वरिष्ठांना या विभागाच्या वरिष्ठांना कामाचे व्हिडिओ आणि फोटो हे सर्व पाठवण्यात आले आहेत व या झालेल्या कामाचे व चालू कामाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी विनंती करण्यात आलेली आहे आता यावर संबंधित विभाग काय निर्णय घेतो का साईट पट्ट्या पूर्णतः मातीच्याच तयार करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे
