बबनराव धायतोंडे: जिल्हा प्रतिनिधी पुणे
दौंड : खानवटे तालुका दौंड येथे दिनांक 18 रोजी पहाटे 1 ते 3 या सुमारास चोरांनी एक घर फोडण्याचा प्रयत्न केला व.एक घर फोडले आहे.पोटफोडे वस्ती वरील अनिल पोटफोडे यांच्या घराचे कुलूप तोडून आत जाण्याचा प्रयत्न केला
परंतु आवाज झाल्याने अनिल पोटफोडे जागे झाले व शेजारील विजय नगरे यांना त्यांनी फोन करून बोलवून घेतल्याने नगरे यांनी बँटरी दाखवल्यावर चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला व त्यांनी तिथून पळ काढला त्यामुळे पोटफडेे यांच्या घरचा चोरी चा प्रयत्न फसला नंतर लगेच ऐका तासाच्या फरकाने चंद्रकांत गाडे यांच्या घराचा दरवाजा उघडून किचन मधील डबे सामान असता व्यस्त करून त्यातील कुरडया ,पापडी, भांडी, बाहेर काढून डब्यातील सामान ओतून दिले .गाडे यांचे शेजारी संदीप पानसरे हे जागे असल्याने त्यांनी लगेच गाडे यांना फोन करून सांगितले की तुमच्या घराचे बाहेर चोरटे उभे आहेत लागलीच चंद्रकांत गाडे यांनी गावातील कुलदीप झोंड यांना फोन केल्याने झोंड यांनी लगेच त्यांच्या शेजारील राजेंद्र नगरे ,ओंकार पानसरे,अक्षय भोसले, अब्बास शेख, या मित्रांसोबत गाडे यांच्या घरी गेले असता चोरट्यांनी तेथून पळ काढला नंतर बरीच शोधाशोध केली असता सारे सामान किचन मधील डबे भांडी आस्था वेस्त झालेली होती किचन मधील डबे भांडी रस्त्यावर पडलेली होती विशेष म्हणजे या चोरट्यांनी फ्रीजमधील दह्याचे पातेले दह्या सहित घेऊन गेले .
या ठिकाणी त्यांना दही सोडून काहीच मिळाले नाही.दही चोरून नेहल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. परंतु दरम्यानच्या काळात भोसले वस्ती, पानसरे वस्ती, धायतोंडे वस्ती, येथील सर्व ग्रामस्थ रात्रभर जागे होते खानवटे गावात या दोन महिन्यातील ही दुसरी चोरी आहे मागील एक ते दिड महिन्यापूर्वी सुधाकर कांबळे यांच्या घरी दिवसा जबरी चोरी झाली होती तेथे 8 ते 9 लाखाचा मुद्देमाल चोरीस गेला होता परंतु त्याचा अजुन तरी छडा लागला नाही तोपर्यंत रात्री भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला.हा सर्व प्रकाराची माहिती देण्यासाठी लागलीच दौंड पोलीस स्टेशनला 02117262333 या नंबर वरती संपर्क सधला आसता संपर्क होवु शकला नाही. तसेच ग्रामसुरक्षा यंत्रणा चालू करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. ग्राम सुरक्षा यंत्रणा चालू असल्यानंतर एकाच वेळी हजारो ग्रामस्थांना एक जण बोलून मेसेज देऊ शकतो आणि गावातील ग्रामस्थांना एकाच वेळी सतर्क करू शकतो त्यामुळे ग्रामस्थ सतर्क होतात आणि पुढील होणारा अनर्थ,धोका, टळू शकतो त्यामुळे ग्राम सुरक्षा यंत्रणा अतिशय महत्त्वाची आहे. आणि ती लवकरात लवकर ग्रामपंचायतीने चालू करावी अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
