दि. 4 जून 2023 रोजी अहमदनगर येथील माऊली संकुल ‘ झोपडी कॅन्टीन येथे श्री देवदत्त नागे यांच्या शुभ हस्ते सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती श्री सांदिपनी ॲकॅडमीचे सर्वेसर्वो श्री बालराजू सर यांनी दिली आहे.

रविवार दिनांक 14 मे 2023 रोजी श्री सांदिपनी ॲकॅडमी तर्फे Nischay 2.0 परीक्षा आयोजित करण्यात आली होती. काल 20 मे रोजी संध्याकाळी 6.00 वाजता या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.दहावीची परीक्षा झाल्यानंतर, 10 वी तून 11 मध्ये जाणाऱ्या विद्यार्थांसाठी श्री सांदिपनी ॲकॅडमी तर्फे 4 एप्रिल ते 10 मे 2023 या काळात मोफत Bridge Course घेण्यात आला होता. यामध्ये JEE, NEET व CET या परिक्षेसाठी आवश्यक असलेली मूलभूत तयारी करून घेण्यात आली.
जवळपास 520 विद्यार्थ्यांनी या कोर्स साठी हजेरी लावली होती.

14 मे 2023 रोजी Nischay 2.0 ही परीक्षा श्री सांदिपनी ॲकॅडमीच्या दोन्ही शाखेत घेण्यात आली. JEE, NEET व CET या मुख्य परीक्षेच्या धर्तीवर ही परीक्षा घेण्यात आली होती. 450 विद्यार्थी या परीक्षेस बसले आहेत.2015 मध्ये संस्थेचे संस्थापक व सर्वेसर्वो श्री बालराजू सर यांनी 3 विद्यार्थ्यांपासून या अँकॅडमी ची सुरुवात केली होती. श्री बालराजू सर यांनी लावलेल्या छोट्याश्या रोपट्याचे आज एका विशाल वटवृक्षात रूपांतर होत आहे. मेहनत, जिद्द, चिकाटी व इमानदारीच्या जोरावर आज श्री सांदिपनी ॲकॅडमीने गरुडझेप घेतली आहे. JEE Mains परीक्षेत श्री सांदिपनी ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविल्यानंतर पालक व विद्यार्थी यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. IIT, NIT तसेच नामवंत युनिव्हर्सिटी चे गोल्ड मेडालिस्ट व गुणवंत असलेले शिक्षक हेच या यशाचे गमक आहे.

Nischay 2.0 या परीक्षेसाठी श्री सांदिपनी ॲकॅडमीचे सर्वेसर्वा श्री बालराजू सर, श्री राहुल गुजराल सर व श्री नानासाहेब बारहाते सर यांनी विशेष परिश्रम घेतले. Nischay 2.0 या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना 25,000 ते 2,00,000 पर्यंत स्कॉलरशिप तसेच 21,000 ते 51,000 रोख बक्षीस, Laptop, टॅब, स्मार्ट वॉच, ट्रॉफिस व मेडल्स मिळणार आहेत. 20 मे 2023 रोजी संध्याकाळी 6.00 वाजता Nischay 2.0 या परीक्षेचा निकाल श्री सांदिपनी ॲकॅडमीच्या नवीन शाखेत गुणवंत विद्यार्थी व पालकांच्या उपस्थीत करण्यात आला. या वेळी पालक व विद्यार्थी यांनी एकच गर्दी केली होती.
एकूण 80 पेक्षा जास्त विद्यार्थांना या परीक्षेत स्कॉलरशिप मिळाली आहे.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ‘जय मल्हार’ या मालिकेतील खंडोबाची भूमिका करणारे सुप्रसिद्ध अभिनेते श्री देवदत्त नागे यांच्या शुभहस्ते होणार आहे. ‘ तानाजी’ व ‘ अदिपुरूष’ या चित्रपटांतील भूमिकेमुळे श्री देवदत्त नागे हे लोकांच्या मनामनांत व घराघरांत पोहोचले आहेत.
