नगर शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या उपनगर परिसरात पारिजात चौकामध्ये असणाऱ्या अनधिकृत गाळ्यामध्ये अचानक आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे .
या परिसरामध्ये अनेक पत्र्याच्या गाळ्यामध्ये आपले व्यवसाय चालू केले आहेत, कुठल्याही प्रकारची खबरदारी न घेता किंवा प्रशासनाचे परमिशन न घेता सदर ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचे बांधकाम करणे पत्र्याचे बांधकाम गाळे काढण्यात आलेले आहेत

येथील नगरसेवक माननीय निखिल वारे यांना समजतात तिथे दाखल झाले व त्यांनी संबंधित सर्व विभागाला कल्पना दिली. त्यानंतर नगरसेवक बाळासाहेब पवार, नगरसेवक सुनील त्र्यंबके, यांनी पण या ठिकाणी तत्काळ धाव घेतली
या ठिकाणी अचानक आज दुपारी आग लागली यामध्ये व्यावसायिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे व्यावसायिक हा सामान्य घरातील असतो तो आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी अशा या कमी भाड्याच्या गळ्यामध्ये आपले व्यवसाय चालू करतो पण याचा मूळ मालक यांनी गाळे काढलेले आहेत तो कोणत्याही प्रकारची खबरदारी न घेता फक्त पैशाच्या किंवा आपल्याला भाडे मिळते या दृष्टीने विचार करून तो गाळे बांधतो
पहा व्हिडिओ:-
अहमदनगर प्रचंड आग pic.twitter.com/MBFBtjEmld
— Mahalokwani (@mahalokwani) June 16, 2023
सदर घटनेची माहिती मिळताच नगर शहराचे आमदार माननीय संग्राम जगताप या ठिकाणी हजर झाले आणि या संपूर्ण घटनेवर संबंधी बोलताना असे म्हटले की या घटना वारंवार घडलेल्या आहेत त्यामुळे या ठिकाणी आग लागलेली आहे पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे साधारणतः दोन ते तीन गाळ्यांना आग लागल्याचे दिसून येत आहे यामध्ये सर्व जळून खाक झालेले आहे
नियमात बसत नसतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे यावेळी त्यांनी सांगितले कारण की अशा घटना घडल्या तर ज्यांनी हा व्यवसाय चालू केलेला आहे त्याच्यावर खूप मोठे अर्थिक कर्ज होते कशा घटना घडल्यात त्यामध्ये नगरसेवक असतात आमच्यासारखे कार्यकर्ते म्हणजे असतो आणि सगळे एकत्र येऊन त्याच्या कुटुंबाला आर्थिक हातभार देखील वर्गणी करून लावण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून महानगरपालिकेचे त्याच्यावरती कारवाई करावी त्याला परमिशन्स होते का हे पाहणे ज्याला परमिशन देता येते असतील त्याला परवानगी महानगरपालिकेत द्यावी जेणेकरून अशा वारंवार घटना ज्या पत्रांच्यागाळ्यामध्ये घडतायेत आणि उद्या जर काही अशी जर घडलं तर एक ठिकाणी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतील त्याच्यामुळे बांधकाम करत असताना म्हणजे आग रोखण्याकरता जे काही व्यवस्था लागत असेल तर त्याची देखील महानगरपालिकेने करण आवश्यक आहे. प्रशासन विशेषता याच्यामध्ये प्रामुख्याने महानगरपालिकेचे प्रमुख म्हणून प्रशासन प्रमुख म्हणून महानगरपालिकेचे आयुक्त काहीतरी निर्णय घ्यावा असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले आहे
