जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार
बोंढार ता.जि.नांदेड येथे बौद्ध समाजातील युवक अक्षय भालेराव याची गावात भिमजयंती साजरी केली म्हणून गावातील जातीयवादी गावागुंडानी निर्घृण हत्या केली…या घटनेचे पडसाद संपुर्ण महाराष्ट्रभर उमटत आज जामखेड शहरात याचे पडसाद उमटले समस्त भिमसैनिक जामखेड तालुका यांच्या वतीने हल्लाबोल मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.

मोर्चाची सुरुवात खर्डा चौक ते तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात येऊन मोर्चाचे सभेत रुपांतर झाले मोर्चात भिमसैनिक मोठ्या संख्येने हातात निळे ध्वज व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा घेऊन सहभागी झाले होते.
अक्षय भालेराव खून प्रकरणी स्वतः जातीने लक्ष घालून पीडित कुटुंबास भेट देत त्यांना न्याय मिळवून द्यावा, कुटुंबीयांना ५० लाखांची मदत करावी, कुटुंबातील एकाला नोकरी द्यावी, हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे, या प्रकरणात सरकारी वकिलाची नियुक्ती करावी, अक्षय भालेराव यांच्या कुटुंबास पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी केली.
सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले म्हणाले की,फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली म्हणून एका बौद्ध तरुणाची निर्घृण हत्या केली जाते,ही निंदनीय आणि महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना आहे. या अमानुष घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो.आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालावा.तसेच दिवंगत अक्षय भालेराव यांच्या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत तात्काळ द्यावी.
मयत अक्षय भालेराव यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहीजे व पीडित कुटुंबाला शासनाने पन्नास लाख आर्थिक मदत देण्याची मागणी मोर्चेकरांनी केली. यावेळी अनिल सदाफुले, बाळासाहेब शिंदे, बापुसाहेब ओव्हळ, बापुसाहेब गायकवाड,उमरभाई कुरेशी, विनोद शिरसाट,मल्हारी सदाफुले,प्रा.राहुल आहिरे, राजन समिंदर,अजिनाथ शिंदे यांची भाषण झाले, तहसिलदार योगेश चंद्रे व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे,
सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले,नगराध्यक्ष निखिल घायतडक, बापुसाहेब गायकवाड,राजन समिंदर,
अनिल सदाफुले,दादासाहेब घायतडक, बापूसाहेब ओव्हळ, सनी सदाफुले,अतिश पारवे,प्रा.राहुल आहिरे,राजेंद्र सदाफुले,रजनीकांत मेघडंबर,सचिन सदाफुले,बाबा सोनवणे, जुबेर शेख,विनोद शिरसाट,डाॅ.सचिन घायतडक,संदेश घायतडक,किशोर सदाफुले,शेखर घायतडक,दिपक घायतडक,किशोर काबंळे,सुर्यकांत सदाफुले,दिनेश घायतडक,संभाजी आव्हाड,सुकेंद्र सदाफुले,राजू घायतडक,अँड.कृष्णा शिरोळे,मंगेश घोडेस्वार,विक्रांत अब्दुले,सोमनाथ आढाव,सनी प्रिन्स सदाफुले,राकेश घायतडक,सोनू सदाफुले,मनोज डाडर,संतोष थोरात,मिलिंद भोसले,सुमित काबंळे,महीला सुरेखा सदाफुले,अरुणा सदाफुले,मालन घायतडक,कुसुम साळवे आदी शेकडो भिमसैनिक उपस्थित होते.सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चासाठी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.