अहमदनगर : जामखेडच्या पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या बोगस संचालक मंडळाचे कारनामे बंद होण्यास तयार नाहीत . गेली विस वर्ष संस्थेच्या घटने नुसार एक ही निवडणूक न घेता बोगस सचालक मंडळाने आता प्राध्यापक भरती करण्यासाठी अधिकार नसताना तसा प्रस्ताव सहसचालक उच्च शिक्षण पुणे यांना दोन दिवसा पूर्वी सादर केला आहे .

ही नोकर भरती करून कोट्यावधी रुपये लाटण्याचा प्रयत्न सुरु आहे . सध्या सचिव म्हणून काम करणारे संस्थेचे साधे सभासद नाहीत .परंतु काहीही करून स्वतः च्या मुलाला प्राध्यापक करण्यासाठी धडपडत आहेत.
भरती प्रक्रिया न्यायालयात आव्हान दिली जाणार आहे त्यामुळे या उमेदवारांची मोठी फसवणूक होऊ शकते.
या शिक्षण संस्थेचे 2001 पासून चे सर्व बदल अर्ज धर्मदाय आयुक्त अहमदनगर यांनी रद्द केले आहेत . त्यामुळे या संस्थेला सचालक मंडळ अस्तित्वात नाही .
तरीही या बोगस सचालक मंडळाने जामखेड महाविद्यालय जामखेड इथे प्राचार्य पद भरले आहे . हे पद पूर्णतः बेकायदेशीर भरती केलेले आहे . विद्यार्थी हित पाहता या विरुद्ध तक्रार करण्यात आली नाही . परंतु नवीन प्राचार्य स्वतः बोगस असताना ते नवीन बोगस प्राध्यापक भरतीचा प्रयत्न करत आहेत .

त्यामुळे त्याच्या निवडीला न्यायलयात आव्हान देणार असल्याची माहिती उल्हास पवार व विलास साठे सर यांनी दिली . तसेच हे प्रकरण धर्मदाय आयुक्त यांच्या कडे दाखल आहे . बोगस सचिव यांनी स्वतः संस्थेच्या सचालक मंडळाच्या निवडणुकीची मागणी केली आहे .त्यांना तो अधिकार नाही त्यामुळे उल्हास साहेबराव पवार व विलास साठे यांनी हरकत घेतली असताना . व धर्मदाय आयुक्त अहमदनगर यांनी निवडणुकीस परवानगी दिली नसताना .गेल्या आठवड्यात कोणत्या ही सदस्याला माहिती न देता गुपचूप खोटी निवडणुका दाखवून नवीन सचालक मंडळ तयार करून बोगस बदल अर्ज दाखल केला आहे.
अगोदरचे प्रकरण अद्याप निकाली निघाले नसताना . निवडणूक न घेता फक्त दाखल करून त्यावर शिक्का घेऊन सहसचालक उच्च शिक्षण व महाराष्ट्र शासन तसेच उमेदवाराची व संस्थेच्या सर्व सभासदाची फसवणूक करण्याचा प्रयत्न हे पाच सहा लोक करत आहेत . त्या विरुद्ध उल्हास पवार व विलास साठे यांनी हरकती दाखल केल्या आहेत.
हे पाच सहा लोक संस्था सभासदांना माहिती न होता संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
गेल्या विस वर्षातील भ्रस्टाचारा ची चौकशी आर्थिक गुन्हे शाखा व जामखेड पोलीस करत असताना . बनवाबनवी सुरु आहे . जामखेड मधील हे लोक संस्थेवर ताबा मिळवण्यासाठी काहीही करत आहेत परंतु त्यांचे प्रयत्न न्यायालयात हानून पाडू व संस्था चांगल्या लोकांच्या हाती सोपवू असा विश्वास विलास साठे यांनी व्यक्त केला आहे.
जामखेड करांनी अशा लबाड लोका पासून सावध राहावे असे आव्हान विलास साठे आणि उल्हास पवार यांनी केले आहे.