अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी:
या बाबत सविस्तर असे की, जामखेड येथील रत्नदीप मेडिकल फौंडेशनच्या मेडिकल कॉलेजच्या बी. फार्मसी मध्ये शिकत असलेल्या एका विद्यार्थींनींचा विनयभंग केल्या प्रकरणी संस्थाचालक भास्कर मोरेवर जामखेड पोलीस स्टेशनला दि. ४ मे रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे जामखेड तालुक्यासह संपुर्ण राज्यात या प्रकरणामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर मोरे हे बऱ्याच दिवस जामखेड मधील विवाह समारंभात दिसून आले होते, गुन्हा दाखल होऊनही भास्कर मोरे हे जामखेड मध्ये वास्तव्यास होते , त्यांनी कोर्टालाही चुकीची माहिती देऊन, तात्पुरता जामीन मिळवला होता, त्यानंतर सर्व बाबी उघड झाल्यानंतर श्रीगोंदा कोर्टाने मोरेचा जामीन अर्ज फेटाळला.

यानंतर मोरेंनी औरंगाबाद खंडपीठात आपल्याला अटक पूर्व जामीन मिळावा यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला, जामखेड पोलीसांनी केलेल्या जबाब, पंचनामे तसेच विविध सामाजिक संघटनांनी दिलेले निवेदने , उपोषणे , रास्तारोको यामुळे भास्कर मोरेचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळला

सध्या भास्कर मोरेचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानेही फेटाळला असून अटकेच्या भितीने मोरे फरार झाला आहे. यानंतर जामखेडमध्ये बऱ्याच मोठ- मोठ्या घटना घडल्या, व तसेच गुन्हे दाखल झाले जे गुन्हे दाखल झाले त्यातील गुन्हेगार सराईत असून त्यांना जामखेड पोलिसांनी अटक केली आहे, मंग भास्कर मोरे तर असे सराईत गुन्हेगार किंवा या अगोदर त्यांच्यावर गुन्हेही दाखल नसतील, त्यामुळे मोरेला जामखेड पोलिसांना पकडणे अवघड वाटत नाही , पण आत्तापर्यन्त जामखेड पोलिसांना भास्कर मोरे सापडत नाही, हे जामखेड पोलिसांचे अपयशच म्हणावे लागेल, नाही तर पोलीस कोणाच्या तरी दबावाखाली या गुन्ह्याचा तपास करीत तर नाहीत ना याची पडताळणी होणे महत्वाचे आहे.

या संपूर्ण प्रकरणामध्ये कोर्टाने ताशेरे ओढत सांगितले आहे कि, या प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करावी, व सदर प्रकरणचा तसेच माघील काही ज्या घटना घडल्या आहेत, त्याची सखोल चौकशी करावी , असे आदेश असताना सुद्धा जामखेड पोलिसांना भास्कर मोरे सापडला नाही , जर जामखेड पोलिसांना या प्रकरणाच्या तपासात काही स्थानिक अडचणी येत असतील, तर हा गुन्हा अहमनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करावा, जेणे करून त्या पीडित मुलीला लवकर न्याय मिळेल , अशी मागणी अनेक सामाजिक संघटनेच्या वतीने होत आहे.

त्यानुसार आता भास्कर मोरेला अटक करण्याची मोठी जबाबदारी जामखेड पोलीसांवर आली आहे. याबाबत जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील व या गुन्हाचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती यांच्याशी संपर्क केला असता भास्कर मोरेला अटक करण्यासाठी जामखेड पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येत आहे , पण अध्याप पर्यंत मोरेला अटक करण्यास जामखेड पोलीस अपयशी ठरले आहेत, आत्ता हेच पाहणे आहे की, मोरे याला जामखेड पोलीस कधी अटक करतात? आणि त्या पीडितेला न्याय मिळवून देतात.
