औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील पिंप्री वरुड येथे शिरूर येथील श्रद्धा भूमी ते प्रगट भूमी असा प्रवास असून या पालखीमध्ये २०० महिला आणि पुरुषांचा सहभाग होता. गेल्या नऊ वर्षांपासून चालू असलेल्या परंपरेला कुठल्याही प्रकारचे गालबोट न लागता ही दिंडी अविरत चालू आहे. शिरूर गाव आणि परिसरातील महिला आणि पुरुष भाविक मोठ्या भक्तिभावाने या दिंडीत सहभागी झाले होते.
नवे वर्ष नवे नियम; बँक लॉकर, क्रेडिट कार्डपासून ‘या’ नियमांमध्ये होणार मोठा बदल !
महिलांनी तुळशी कळस डोक्यावर घेऊन तर सहभागी झालेल्या पुरुषांनी विविध वेशभूषा करून भगवे ध्वज पताका, बँड, टाळ आणि मृदूंगाच्या गजरात मार्गे हळूहळू चला मुखाने गजानन बोला, गण गण गणात बोते अशा नामघोषात गजानन महाराजांच्या दिंडीचे पिंप्री वरुड येथे आगमन झाले. पिंप्री वरुड येथील मंदिर व्यवस्थापन आणि गावकऱ्यांनी मंदिरासमोर सदा मारून रांगोळी काढून मार्गावर झेंडू आणि गुलाबाचा गालिचा तयार करून दिंडीचे स्वागत केले.तसेच गावातील गजानन महाराज मंदिरासमोर महाआरती करून गावातर्फे चहापाण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यानंतर ही दिंडी येथून शेगावकडे मार्गस्थ झाली.
