Teacher| प्राध्यापक भरती
अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षण संस्थेमध्ये 2 हजार 900 प्राध्यपक Teacher भरतीच्या मुलाखती तीन दिवसात घेतल्याचा आरोप अतिशय बिनबुडाचा व दिशाभूल करणारा आहे . या संस्थेत 14 विषयाची जाहिरात होती व 49 प्राध्यापकाच्या जागा भरायच्या होत्या . यासाठी 2 हजार 900 अर्ज आले होते हे खरे आहे . परतू एकच उमेदवाराने एकच वेळी वेगवेगळ्या संवर्गातून तीन तीन अर्ज केल्या मुळे ही संख्या फुगली होती . प्रत्यक्षात मात्र फक्त 936 उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत . या मुलाखती तीन दिवस चालल्या आहेत एकाच वेळी चौदा विषयाच्या मुलाखती वेगवेगळ्या चौदा कक्षात सुरु होत्या .


तीन दिवस चाललेल्या मुलाखती मध्ये प्रत्येक विषयाला सरासरी प्रत्येक दिवशी फक्त 22 मुलाखती घेतल्या गेल्या आहेत त्यामुळे या प्राध्यापक Teacher संघटनेने विचार पूर्वक माहिती न घेता बिन बुडाचे आरोप केले आहेत . यात कसले ही तथ्य नाही . निवड समिती एक दिवसात 22 मुलाखती सहज घेऊ शकते . सहसचालक यांनी प्रत्येक मुलाखतीला उपस्थित राहणे बंधन कारक नाही ते फक्त ही प्रक्रिया व्यवस्थित पार पडते का नाही एवढेच निरीक्षण करण्यासाठी असतात . व शासन नियमांचे पालन होते का नाही हे पाहतात.

सदर संघटनेने या मुलाखती सुरु असताना शिक्षण संचालक व सहसंचालक यांच्या वर दबाव आणून दोन जागा आमच्या मतानुसार भरती करण्यासाठी दबाव आणला असल्याचे समजते. कार्यालयात गोंधळ घालून अपशब्द वापरल्या चे समजते व या अध्यक्षा विरुद्ध सहसचालक उच्च शिक्षण यांनी बंड गार्डन पोलीस स्टेशन पुणे येथे तक्रार दाखल केल्याचे ही समजते . सदर संघटना पदाधिकारी प्रत्येक विभागात आपल्या दोन तीन प्राध्यपकांना Teacher घ्या असा दबाव आणतात .

Table of Contents
या संस्थेत त्यांनी ज्या विषयाची जागा मागितली त्या जागेवर गेल्या बारा वर्षा पासून विनाअनुदानित ला विद्यापीठ मान्यता असणारा प्राध्यापक काम करत आहे . तो उमेदवार सेट सह पीएच्. डी सुद्धा आहे ही संघटना ज्याचा आग्रह धरत आहे तो उमेदवार पीएच.डी. ही नाही.
त्याला गुण कमी पडत असताना काम करणाऱ्या उमेवाराला काढून आपला उमेदवार घ्यावा यासाठी ही टोळी प्रयत्न करत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेड चे उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत व मागासवर्गीय ,ओबीसी,अल्पसंख्याक शिक्षक शिक्षकेतर संघाचे सचिव विलास साठे सर यांनी केला आहे . या संघटनेच्या दबावा खाली जर काही फेरफार केला तर संपूर्ण आरक्षण बदलेल व निवड झालेल्या मगावर्गीय , बहुजन मुलांवर अन्याय होईल हे आम्ही कदापि सहन करणार नाही . नोकरभरतीत असा हस्तक्षेप करणाऱ्या संदीप पाथरीकर विरुद्ध मुख्यमंत्री , शिक्षण मंत्री , शिक्षण संचालक यांना निवेदन दिले आहेत . अशा लोकांचा बंदोबस्त करण्याची जबबदारी शासनाची आहे . महाविद्यालयात पगार घेऊन नोकरी न करता असे उद्योग करणाऱ्या प्रा. संदीप पाथरीकर याच्यावर निलंबनाची कारवाई करावी
व याचं संस्थेत काम कारणाऱ्या तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांवर Teacher संस्थेने कारवाई करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड चे उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत व मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे विलास साठे यांनी केली आहे.

