जामखेड महाविद्यालच्या बोगस सचालक मंडळाच् गलथान पणा उघड..
जामखेड : शिक्षण विभागाने पुन्हा एकदा जामखेड Jamkhed महाविद्यलयाला दणका दिला आहे, संस्थेच्या बोगस सचालक मंडळाच्या गलथान पणा मुळे हि नामुष्की जामखेड महाविद्यालयालवर ओढवली आहे, असेच म्हणता येईल . जामखेड महाविद्यालयात रिक्त असणाऱ्या 19 जागा पैकी 8 जागा भरण्याची परवानगी मिळालेली असताना . संस्थेच्या बोगस सचालक मंडळाच्या गलथान पणा मुळे ही नोकरभरती रद्द झाली असून दि. 24 जुलै च्या शासन निर्णया नुसार या आठ जागा आता स्वायत्त महाविद्यालयाला वर्ग करण्यात आल्या आहेत .

पंधरा ते विस वर्ष तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकावर अन्याय झाला आहे त्याच बरोबर विद्यार्थ्यावर सुद्धा अन्याय झाला असून अगोदरच महाविद्यालय सी ग्रेड मध्ये असताना आणखी एक झटका बसल्याने जामखेड Jamkhed तालुक्यातील ग्रामीण व गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी ही संस्था बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे .
बारामतीचे पार्सल वापस पाठवणार; आमदार रोहित पवारांच्या विरोधात भाजपा कार्यकर्ते उतरले थेट रस्त्यावर.
Table of Contents
संस्थेचे सदस्य सुद्धा नसलेल्या पण बेकायदेशीर पणे सचिव म्हणून काम पाहत असलेल्या व्यक्तीने स्वतः च्या मुलाला प्राध्यापक करण्यासाठी महाविद्यालयाला मंजूर झालेल्या आठ जागा गमावल्या आहेत .

या महाविद्यालयाचा प्राध्यापक भरती प्रस्ताव सर्वात अगोदर सहसचालक यांना सादर झाला . परतू नियमां नुसार संस्थेचे अधिकृत सचालक मंडळ कोण याचे धर्मदाय आयुक्तांचे आदेश ही संस्था सादर करू शकली नाही . तर सचिव स्वतः च्या मुलाची जागा भरण्यासाठी प्रयत्न करत राहिले . शासनाने अनेकदा कळवले परंतु यांनी पूर्तता केली नाही . या संस्थेचे 2001 पासून सर्व बदल अर्ज रद्द झाले आहेत .

एक खोटी निवडणूक घेऊन चेंज रिपोर्ट सादर केला यात फक्त कुटूंबातील व नात्यातील व्यक्तींना सचिवानी स्थान दिले . त्यामुळे जुन्या सदस्यांनी हरकत घेतली . या कागदावर प्राध्यापक भरती करण्याला मान्यता मिळाली नाही . शेवटी वादग्रस्त संस्थान च्या 451 जागा राज्यातील स्वायत्त महाविद्यालयाल वर्ग करण्यात आल्या आहेत . या संस्थेचा कारभार चुकीच्या माणसा कडून काढून घेऊन शिक्षणप्रेमी माणसा च्या हाती सोपवण्याची गरज आहे .

स्व. साहेबराव पवार, स्व बनसीलाल कोठारी ,डॉ. कल्याणरावं काशीद ,दिलीपशेठ बाफना यांच्या कार्यकाळात असा काही गोंधळ नव्हता . माजी अध्यक्ष उद्धव देशमुख यांच्या आजारपणाचा फायदा घेत बोगस सचिवानी अतिशय चुकीचा कारभार चालवला आहे यात तालुक्यातील शिक्षण क्षेत्राचे नुकसान होत आहे.