दिनांक १ ऑगस्ट २०२३ रोजी गांधी नगर , रेणुकानगर या भागातील अनेक महिलांनी अहमदनगर महानगरपालिकेवर मोर्चा काढला होता , यामध्ये त्यांची अशी मागणी होती कि, बोल्हेगाव फाटा चैतन्य क्लासिक हॉटेल ते गांधीनगर हा सरळ रस्ता असून या रस्त्यावर प्रचंड खडे , आणि चिखल झाला आहे , या रोड वर मोठी रहदारी आहे शाळकरी लहान मुले , या रस्त्यावरून ये जा करत असतात , त्यामुळे या रस्त्याच्या दुरावस्तेमुळे लहान मुलांना जीव वेठीस धरून शाळेत जावे लागत आहे ,

आत्ता पर्यंत या रस्त्यावर अनेक अपघात झालेले आहेत, अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे , पण अद्याप पर्यंत , महानगर पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे ना येथील खड्डे बुजविण्यात आले नाहीत, किंवा नीट पाहणी पण केली नाही, या अगोदर महिलांनी आयुक्त यांना भेटून निवेदन दिले होते , चार दिवसात हे काम मार्गी लावण्यात येईल असे खोटे आश्वासन मा. आयुक्त साहेबानी दिले होते, आज पुन्हा महिलांनी या प्रश्नाबाबत आयुक्तांना निवदेन दिले आहे कि आमचा हा प्रश्न पुढील ८ दिवसात मार्गी लागला नाही तर , अधिकाऱयांची तिरडी काढण्यात येईल , हा तिरडी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येईल, असे निवदेन आणि इशारा दिला आहे ,

यावेळी या भागातील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वाघमारे यांनी देखील या प्रश्नाबाबत या अगोदर
वेळोवेळी अधिकाऱ्यांना या रोडच्या बाबतीत कल्पना तसेच निवेदन सुद्धा दिले आहे , यावेळी बोलताना ते म्हटले कि, आमच्या भागात या रोडची झालेली अवस्था पाहून गॅस गाड्या सुद्धा यात येत नाहीत , आमच्या महिलांना डोक्यावर गॅस टाकी घेऊन २ किमी जावे लागते , जर या रस्त्यावरील खड्डे ८ दिवसात बुजविले नाही तर यापुढचे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,