जयंती पुण्यतिथी साजरी करत असताना आपण महापुरुषांचे गुण अंगीकृत केले पाहिजेत – राजेंद्र कोठारी
धनराज पवार

रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश संकुल मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जयंती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रा कॉ महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस स्थानिक स्कूल कमिटी सदस्य राजेंद्रजी कोठारी साहेब प्रमुख उपस्थिती प्राचार्य मडके बी के मुख्याध्यापिका चौधरी के डी , पर्यवेक्षक कोकाटे व्ही के ,

पर्यवेक्षक संजय हजारे गुरुकुल प्रमुख संतोष ससाने, गुरुकुल प्रमुख बाबासाहेब आंधळे ,वस्तीगृहप्रमुख नानासाहेब शिर्के, प्राध्यापक विनोद सासवडकर ,प्रा सखाराम सप्रे ,एनसीसी प्रमुख मयूर भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. श्री नागेश विद्यालय, ज्यूनियर कॉलेज ,कन्या विद्यालय सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रास्ताविक सखाराम सप्रे केले

विद्यार्थी भाषणामध्ये मयुरेश केदार, शंभूराजे कोल्हे, संचित खैरे, अजिंक्य कोल्हे ,देवेंद्र काळे, ओंकार डोंगरे , तेजश्री सांगळे, प्रणाली बहिर या विद्यार्थ्यांनी भाषणे केली. प्रा विनोद सासवडकर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवन चरित्रावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्रजी कोठारी यांनी स्वातंत्र्य सैनिकी समाज सुधारक यांच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे त्यामुळे त्यांच्या विचारांचा चरित्राचा अभ्यास विद्यार्थी जीवनात करावा. जयंती पुण्यतिथी साजरी करत असताना आपण महापुरुषांचे गुण अंगीकृत केले पाहिजेत असे मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन संभाजी इंगळे आभार प्रदर्शन शंभूलाल बडे यांनी केले.
