जामखेड तालुका अध्यक्ष पदी नय्युमभाई सुभेदार तर जिल्हा उपाध्यक्ष पदी जयसिंग उगले
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
आमदार बच्चु कडु यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या जामखेड तालुका कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला आहे. जामखेड शहरातील लोकमान्य वाचनालय येथे पदाधिकारी निवड सभा 5 ऑगस्ट रोजी पार पडली .
अहमदनगर जिल्हा अध्यक्ष विनोद सिंग परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत विस्तारीत तालुका कार्यकारीणी जाहीर केली.

आमदार बच्चु कडु व प्रवक्ते संतोष पवार यांच्या सुचनेनुसार जाहीर झालेल्या या जामखेड तालुका कार्यकारीणीत तालुका अध्यक्ष या पदावर नय्युमभाई सुभेदार यांनी काम करून पक्ष विस्ताराची तसेच जिल्हा उपाध्यक्ष पदी जयसिंग उगले यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

नव्याने जाहीर झालेल्या या कार्यकारीणीत शहर अध्यक्ष दिनेश राळेभात , जामखेड तालुका दिव्यांग सेल च्या तालुका अध्यक्ष पदी सचिन उगले, अहमदनगर जिल्हा दिव्यांग सेल च्या जिल्हा उपाध्यक्ष पदी संदिप भुजबळ तर जिल्हा संघटक संजय मोरे तसेच जामखेड तालुका जवळा जिल्हा परिषद गट अध्यक्ष पदी राहुल भालेराव , जामखेड तालुका उपाध्यक्ष पदी संभाजी पवार, सोहेल तांबोळी यांना संधी देण्यात आली आहे.

आमदार बच्चु कडू, प्रवक्ते संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी जिल्हाध्यक्ष विनोद सिंग परदेशी व दिव्यांग सेल चे जिल्हाध्यक्ष ॲड लक्ष्मण पोकळे या पक्षश्रेष्ठींच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना जिल्हा अध्यक्ष विनोद सिंग परदेशी म्हणाले की,टाकलेला विश्वास सार्थ ठरवून गरजवंतांच्या पाठीशी सदैव उभे राहण्याचे पक्षाचे धोरण तळागाळापर्यंत पोहचवू.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे जिल्हा संघटक तुकाराम पाटील, जिल्हा समन्वयक विजूशेठ भंडारे,शेवगाव – पाथर्डी विधान सभा अध्यक्ष राम शिदोरे, नगर तालुका अध्यक्ष नानासाहेब पारधे, कर्जत चे तालुका अध्यक्ष सुदाम निकत, कार्याध्यक्ष स्वप्निल देशमुख, संभाजी ढोले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी युवा पत्रकार धनराज पवार यांना राष्ट्रीय छावा रत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आज रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा अध्यक्ष विनोद सिंग परदेशी यांच्या हस्ते व पदाधिकारी यांच्या उपस्थित सत्कार करण्यात आला

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नय्युमभाई सुभेदार तर आभार जयसिंग उगले यांनी मानले.
