जामखेड प्रतिनिधी
सध्या जामखेड तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला असल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत खरीप पिके जळुन चालली आहेत. उर्वरित पिकांसाठी व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असताना महावितरणकडून शेतीपंपाचा विज पुरवठा विस्कळीत झाला आहे.
शेतीपंप विज पुरवठा विस्कळीत शेतकरी आक्रमक
भुतवडा, जगदाळे वस्ति व जमादारवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा विज पुरवठा विस्कळीत झाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.आज रोजी महावितरण कार्यालयात उपकार्यकारी अभियंता शरद चेचर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, चेअरमन सुंदरदास बिरंगळ, अशोक राळेभात, ऋषिकेश कदम,ज्ञानेश्वर कदम, वाल्मिक जगदाळे, पांडुरंग कदम, रमेश नेटके, पवन आजबे, ज्ञानदेव कोल्हे, शुभम आजबे, दिपक जगदाळे, अशोक नेटके, अक्षय जगदाळे, सागर आजबे, छगन आजबे, ऋषीकेश जगदाळे, रामनाथ जगदाळे आदी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
[better-ads type=’banner’ banner=’6874′ ]
याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांनी शेतीपंपाचा विज पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा इशारा दिला आहे.
[better-ads type=’banner’ banner=’3516′ ]
यावेळी उप अभियंता शरद चेचर म्हणाले की, विजेच्या मागणी व पुरवठ्याबाबत तफावत आल्यास तातडीचे लोड शेडिंगचे आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात येत असतात वेळोवेळी योग्य त्या ग्रुपसाठी शेतीपंप व गावठाण वाहिनीसाठी आदेश प्राप्त होत आसल्याने लोडशेडिंग करावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या आलेल्या निवेदनातील मागण्या वरीष्ठ कार्यालयाकडे कळवु व विजपुरवठा सुरळीत करू.
