जामखेड प्रतिनिधी
देशात व राज्यातील सत्ताधाऱ्यांनी लोकशाही मोडीत काढून हुकूमशाही सुरू केले आहे सरकारच्या या मनमानी कारभारावर शेतकरी व्यापारी उद्योजक नोकरदार यांच्यासह सर्वसामान्य नागरिक नाराज आहेत कायदा सुव्यवस्था मोडकळीस आली आहे सत्ताधारी राजकारणापायी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सचिव तसेच अहमदनगर दक्षिण लोकसभा चे उमेदवार रविंद्र कोठारी यांनी केले
आज रोजी जामखेड jamkhed शहरात ग्रामदैवत श्री नागेश्वराच्या पावनभूमी मध्ये “हर हर महादेव,घर घर महादेव ‘अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी युवक जिल्हाध्यक्ष विकास मासाळ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात “हर हर महादेव ,घर घर महादेव’ हे संपर्क व जागृती अभियान राबवून नागरिकांना पत्रके वाटण्यात आले. jamkhed जामखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पेठ,बिड रोड, कोर्ट रोड, तपनेश्वर रोड,बाजारतळ, खर्डा चौक येथे या अभियानास सुरवात करण्यात आली.शहरात या अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी युवा जिल्हा अध्यक्ष विकास मासाळ, तालुका अध्यक्ष डॉ. प्रकाश कारंडे, भानुदास हाके (मेजर), सदाशिव हजारे (वस्ताद), मोहन कारंडे(वकील) , सर्जेराव पाटील (उपसरपंच,बाळगव्हाण) , युवक तालुका अध्यक्ष पै.नंदकिशोर खरात, सोनू भिसे (युवा नेते),शाम म्हेत्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना कोठारी म्हणाले, भारतीय लोकशाही टिकली पाहिजे, जनसामान्यांचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी व लोकांच्या समस्या जाणीव असणाऱ्या जमिनीवर राहून काम करणाऱ्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणून संधी द्यावी रोजगाराची समस्या शेतमालाला हमीभाव, ग्रामीण व शहरी भागातील वाढती गुन्हेगारी दुर्लक्षित वाड्यावर वस्त्यावरील प्राथमिक सुविधांचा अभाव, दुष्काळी भागात पाणी व चारा समस्या आणि निकृष्ट दर्जाचे सार्वजनिक हिताचे झालेली कामे या अशा अनेक समस्येचे निराकरण करण्यासाठी “हर हर महादेव ,घरघर महादेव’ हे अभियान राबवून लोकांना संपर्क करून समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे हात बळकट करा.असे आवाहन केले.
