जामखेड Jamkhed तालुक्यातील पीपल्स एज्युकेशन सोसायटी जामखेड च्या विविध विद्यालय व उच्च माध्यमिक च्या रिक्त जागा महाराष्ट्र शासनाच्या पवित्र पोर्टल मार्फत भरण्या च्या बेकायदेशीर संचालक मंडळा च्या प्रयत्नांना उच्च न्यायालय औरंगाबाद ( छ.संभाजी नगर)यांनी स्थगिती दिली
Royal Enfield Shotgun 650 रॉयल एनफील्ड शॉटगन 650 चे अनावरण, जाणून घ्या फिचर्स आणि किमत
Jamkhed|जामखेड पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षक भरती
या शिक्षक भरती. बाबत संस्थेचे सचिव दिलीप बाफना व बाळासाहेब पवार यांनी उच्च न्यायालयात याचिका क्र.10703 /2024 दाखल केली होती . या संस्थेचे संचालक मंडळ 2001 पासून बेकायदेशीर पद्धतीने काम करत आहे 2001 पासून आज पर्यंत या संस्थेचे सर्व बदल अर्ज उप आयुक्त धर्मदाय अहमदनगर यांनी रद्द केले आहेत . तरीही काही लोक संचालक म्हणून कारभार करत आहेत . या पूर्वी जामखेड महाविद्यालय जामखेड ची अशीच प्राध्यापक भरती करण्याचा प्रयत्न या मंडळी नी केला होता .
Table of Contents
या विरुद्ध दिलीप बाफना व बाळासाहेब पवार यांनी ही बाब सह संचालक व संचालक उच्च शिक्षण यांच्य लक्षात आणून दिली त्यामुळे प्राध्यापक भरती सुद्धा रद्द करण्यात आली . या मंडळींनी जामखेड Jamkhed महाविद्यालया च्या प्राचार्यांची नियुक्ती अशीच बेकायदेशीर पद्धतीने केली आहे . या बाबत ही कारवाई सुरू आहे

महाराष्ट्र शासनाच्या पवित्र पोर्टल वर याच मंडळींनी अधिकार नसताना रिक्त जागांची माहिती परस्पर भरली व आपणच संस्था अध्यक्ष व सचिव असल्याचे दाखवले . वास्तविक पाहता शशिकांत देशमुख हे कधीच या संस्थेचे सदस्य सुद्धा नव्हते व आजही नाहीत तरी सचिव म्हणून सांगत गैर व्यवहार करत आहेत .
दिलीप बाफना व बाळासाहेब पवार यांनी शिक्षण अधिकारी माध्यमिक अहमदनगर व शिक्षण आयुक्त पुणे यांना या बाबत अगोदर पत्र व्यवहार केला होता परंतु संगणक प्रणाली मुळे या रिक्त जागा ची परवानगी मिळाली त्यामुळे उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली . या प्रक्रियेत उमेदवार ची आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून वेळी वेळी प्रयत्न करण्यात आले . आता या बेकायदेशीर संचालक मंडळाला. कोणतीही नोकरभरती करण्या पासून उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे . ही याचिका विधीज्ञ महेश भोसले यांच्या मार्फत दाखल केली होती तर विधीज्ञ कृष्णा शिंदे यांनी सहाय्य केले .
पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही कसला ही शैक्षणिक दृष्टीकोन नसलेल्या लोकांनी गेली वीस वर्ष चुकीच्या पद्धतीने चालवली कसलीही प्रगती केली नाही . दिलीप बाफना यांच्या काळात चार माध्यमिक शाळा मंजूर करून आणल्या त्यातील तीन सुरू केल्या त्या नंतर आलेल्या लोकांनी शिक्षण संस्था दुकाना प्रमाणे दुकानातून चालवली . शैक्षणिक दर्जा राहिला नाही . कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक मिळते . हे सुधारण्यासाठी हा लढा सुरू आहे – प्रा डॉ.बाळासाहेब पवार
