महालोकवाणी न्यूज: जामखेड प्रतिनिधि: धनराज पवारजामखेड नगरपरिषदेकडून, शहरातील विकास कामांना व सोयी सुविधाच्या निधीसाठी, जामखेड नगरपरिषदेच्या वसुली पथकाकडून आगळ्या वेगळया स्वरूपात जाहीर आवाहन करण्यात आले.जामखेड नगर परिषदेने रिक्षा द्वारे, थकबाकी व चालू कर वसुलीसाठी शहरातून जनजागृती अभियान चालू यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पेठ, जुना कोर्ट रोड, बीड रोड,मिलींद नगर, तपनेश्वर रोड, या मार्गाने करण्यात आले. महालोकवाणी न्युजशी बोलताना मुख्याधिकारी अजय साळवे म्हणाले की, जामखेड नगरपरिषदेची अर्थिक परिस्थिती चिंताजनक आहे. मागील अर्थिक वर्षात वसुली फक्त 8 टक्के होती. आता जानेवारी 23 अखेर ती 16 टक्के आहे. मालमत्ता थकबाकी 4 कोटी 90 लाख 67 हजार व चालू । कोटी 68 लाख आहे.…
Author: mahalokwani
महालोकवाणी न्यूज: सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. दोन्ही बाजूचा युक्तीवाद पूर्ण झालेला आहे. या प्रकरणावरील निकाल कोर्टाने राखून ठेवला आहे. 7 जणांच्या घटनापीठाकडे निर्णय जाणार का? याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाची सुनावणी नबाम रेबिया प्रकरणानुसार होणार का? याबाबतचा निकाल सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला आहे. नबाम रेबियाचा संदर्भ का घेऊ नये असे तुम्हाला वाटते? जेठमलानी: 28 जून रोजी राज्यपालांनी फ्लोअर टेस्ट करण्याचे आदेश दिले.. तर स्पीकरला आमदार अपात्र ठरवण्याचा अधिकार होता का? कोर्ट : सात सदस्य खंडपीठाकडे पाठवायचे की नाही? जेठमलानी – विधानसभा उपाध्यक्ष वतीने पाठविण्यात आलेले नोटीस यांची सत्यता तपासण्याची गरज आहे अविश्वास ठराव आणलेले आमदारांच्या स्वाक्षरी तपासल्या तर…
विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी व्यवस्थापनकायम प्रयत्नशील – अॅड.वसंतराव कापरे महालोकवाणी न्यूज:नगर – डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय हे अभ्यासक्रमाचे विविध पैलू शिकविण्याची व शिकण्याची आधुनिक पद्धत तसेच संशोधनातील नविनता व त्याचा विस्तार, शिक्षण संसाधने आणि विद्यार्थ्यांच्या आधुनिक विषयातील प्रगतीसाठी डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे व्यवस्थापन सतत प्रयत्नशील असल्याने महाविद्यालयास ए+ मानांकन मिळाले ही अभिमानास्पद बाब आहे, असे प्रतिपादन फौंडेशनचे विश्वस्त अॅड.वसंतराव कापरे यांनी केले. विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयास नॅक कमिटीचे ए+ मानांकन प्रमाणपत्र मिळाले याप्रसंगी फौंडेशनचे उपसंचालक प्रा.सुनिल कल्हापुरे, प्राचार्य डॉ.उदय नाईक, डॉ.अंकुश शिर्के, डॉ.रविंद्र नवथर, विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.अॅड.कापरे पुढे म्हणाले, नॅशनल व इंटरनॅशनल स्तरावरील पेपर…
महालोकवाणी न्यूज: फुंडे-दिनांक-१५ फेब्रुवारी २०२३ रोजी महाविद्यालयात वीर वाजेकर पुण्यतिथी व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कवी व विचारवंत प्राध्यापक अशोक बागवे उपस्थित होते. त्यांच्या समवेत कवी नारायण लाळे, सतीश सोलापूरकर त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. बाळाराम पाटील( माजी शिक्षक आमदार, रायगड विभाग सल्लागार समिती, रयत शिक्षण संस्था सातारा) प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते मा. श्री .रामशेठ ठाकूर( सदस्य मॅनेजिंग कौन्सिल, रयत शिक्षण संस्था सातारा)मा.श्री.कृष्णा कडू, मा. श्री. सुधीर सेठ घरत, मा. श्री. कॉम्रेड भूषण पाटील,मा. भावणताई घाणेकर,मा.श्री.मेघनाथ तांडेल, मा.श्री.उमेश म्हात्रे,शैलजा सुधीर घरत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.प्राचार्य,डॉ.प्रल्हाद पवार यांनी आपल्या प्रस्ताविकातून,वीर वाजेकर यांचे जीवनचरित्र…
महालोकवाणी न्यूज:- रस्ता सुरक्षा ही एक व्यापक आणि महत्त्वाची समस्या आहे जी जनजागृती करण्यासाठी, विशेषतः तरुण पिढीमध्ये शिक्षण, सामाजिक जागरूकता आणि इतर यासारख्या असंख्य विषयांशी संबंधित आहे. प्रत्येकजण, विशेषत: लहान मुले आणि तरुण लोक ज्यांना गंभीर कार अपघातांचा धोका आहे, त्यांनी रस्त्याच्या नियमांशी परिचित असले पाहिजे. उत्पादन असे प्रतिपादन श्री सुरज उबाळे असिस्टंट इन्स्पेक्टर आरटीओ अहमदनगर यांनी श्री छत्रपती शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना आयोजित राष्ट्रीय रस्ते सुरक्षा कार्यक्रमात केले. यावेळी असिस्टंट इन्स्पेक्टर प्रियंका उनवणे, प्राचार्य डॉ. वाय आर खर्डे ,विभाग प्रमुख प्रा ए बी काळे , प्रा पी जी निकम, प्रा एस एम वाळके, प्रा वाय सिसोदिया उपस्थित होते आधी उपस्थित होते पुढे बोलताना श्री उबाळे म्हणाले की,आजच्या जगात रस्ते अपघात मोठ्या प्रमाणावर होत आहेत, ज्याचे मुख्य कारण म्हणजे रस्ता सुरक्षेकडे लक्ष न देणे. ड्रायव्हरचा बेजबाबदारपणा, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे यामुळे रस्ते अपघात दिवसेंदिवस कसे वाढत आहेत आणि ते कमी करण्यासाठी रस्त्यावरती नियमांचे उल्लंघन करणे हे किती घातक असून त्यामुळे आपल्या जीवनास आपण मुकु शकतो हेही त्यांनी सांगितले. रस्ता सुरक्षा मोहिमेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची अनोखी भूमिका आहे कारण महाविद्यालयीन विद्यार्थी हे रस्त्यावरती चालताना गाडी वेगात चालवणे वाहतुकीचे नियमांचे पालन करणे सर्रासपणे करताना दिसतात आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून भविष्यातील सुजाण ना गरिक वाहतुकीचे नियमांचे पालनच करतील त्यांनी व्यक्त केली. आकडेवारीनुसा र, बहुतेक वाहतूक अपघातांच्या घटनांमध्ये मुले गुंतलेली असतात कारण ते इतर वयोगटांपेक्षा अधिक असुरक्षित असतात. त्यांना लहानपणापासूनच रस्ता सुरक्षा शिक्षण आणि समज आवश्यक आहे. असिस्टंट इन्स्पेक्टर प्रियंका उनवणे यांनी , महाविद्यालयीन विद्यार्थी तथा यांनी रस्ते सुरक्षा संदर्भ माहिती देताना रहदारीच्या परिस्थितीत रस्त्यावरून वेगात जाणाऱ्या महाविद्यालयीन तरुण तरुणी ह्या गाफील असतात , विशेषतः जेव्हा ते वाहना समोरून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे त्यांच्या जीवाला गंभीर धोका होण्याची शक्यता असते आणि हे वाहतुकीचे छोटेसे नियम आपण वेळोवेळी बघणे महत्त्वाचे ठरतात. त्याबरोबरच यामध्ये पालकांचीही महत्त्वाची जबाबदारी असून त्यांनीही आपला पाल्य रहदारीच्या ठिकाणी गाडी कटाक्ष नजर ठेवून वाहन चालवतोय की नाही याची माहिती घेणे अत्यावश्यक ठरते. फक्त मी आणि माझं ही भावना न ठेवता आपली ही वाट बघणार घरी कोणीतरी आहे विशेषता या तरुणांनी घ्यावी त्यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय आर खर्डे यांनी रस्ते सुरक्षा महाविद्यालयीन तरुणाच्या दृष्टीने महत्व व त्या दृष्टीने महाविद्यालयाने घेतलेल्या पाऊला बद्दल महत्व अधोरेखित करताना या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी हे रस्ते वाहतुकीबद्दलच्या नियमांचा काटेकोर पालन करतील अशी अपेक्षा व्यक्त केली व पाहुण्यांचे स्वागत केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय आर खर्डे यांनी रस्ते सुरक्षा महाविद्यालयीन तरुणाच्या दृष्टीने किती व त्या दृष्टीने महाविद्यालयाने घेतलेल्या पाऊला बद्दल महत्व अधोरेखित करताना या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी हे रस्ते वाहतुकीबद्दलच्या नियमांचा काटेकोर पालन करतील अशी अपेक्षा व्यक्त केली व पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिविल विभागातील विद्यार्थी विशाल आव्हाड यांनी केले तर आभार प्रदर्शन नायब पटेल या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता राष्ट्रीय सेवा योजना चे समन्वयक प्रा गिरीश पाटील, प्रा. ए कुलकर्णी , प्रा एम मांढरे प्रा एस आगळे यांनी परिश्रम घेतले मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.
महालोकवाणी न्यूज: सांगवी वाहतूक पोलीसांची मोठी कारवाई : बीआरटी मार्गातून येणाऱ्या २०० वाहनांवर आज दंडात्मक कारवाई; १५ दिवसांत विशेष मोहिमेत १३ लाख ८७ हजारांचा दंड वसूल सांगवी वाहतूक पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत पंधरा दिवसांत १३ लाख ८७ हजार ७५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच रक्षक चौक ते पिंपळे सौदागर बीआरटी लेन येथेआज पोलिसांनी कारवाई करत २०० वाहनांवर केसेस व दंड वसूल केला. या विशेष मोहिमेत पोलिसांनी बीआरटीएसमधून येणारी वाहने, पीटीपी नाकाबंदी, नो एन्ट्री, काळ्या काचेच्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. या १ ते १४ फेब्रुवारी पंधरा दिवसात बीआरटीएस मार्गामधून येणाऱ्या ९५० खासगी वाहनांवर कारवाई करत ६ लाख ३६ हजार…
पाथर्डी प्रतिनिधी : सोमराज बडेपाथर्डी तालुक्यातील माळीबाभूळगाव हद्दीत अपेक्स लॉजवर पोलिसांनी धाड टाकून दोन अल्पवयीन मुलींसोबत असलेले दोन आरोपी व लॉजच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून बाल कल्याण समितीच्या मध्यस्थीने अल्पवयीन मुलीना पालकांच्या ताब्यात देण्यात आले असून लॉज मालका सह दोघा आरोपी विरुद्ध कायदेशिर कार्यवाही करण्यात आली आहे. अल्पवयीन मुली व जोडीदार लॉजवर प्रवेश करणार त्याच क्षणी पोलीसांनी धाड टाकत हि करवाई केली आहे. गोपनीय खबर मिळाल्या वरून सोमवारी दुपारी माळी बाभूळगाव शिवारातील अपेक्स लॉजवर पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सचिन लिमकर,श्रीकांत डांगे,पो.कॉ.ज्ञानेश्वर रसाळ, संदीप कानडे,दत्तात्रय बडधे,कृष्णा बडे,किरण बडे,मनिषा वारे यांच्या पथकाने घातलेल्या धाडीत माळी बाभूळगाव येथील…
ठाणे : डॉ.जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबाला संपवण्यासाठी तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शूटर तैनात केले असल्याची कबुली देणारी ठामपातील अधिकारी महेश आहेर यांची ऑडिओ क्लिप वायरल झाली आहे. या ऑडिओ क्लीपमुळे ठाण्यात खळबळ माजली आहे. ठाणे पालिकेतील प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर आणि अन्य दोघांमधील हे संभाषण वायरल झाले आहे. या संभाषणात महेश आहेर यांनी डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा उल्लेख साप असा केला असून त्यांना ठेचण्याची भाषाही आहेर यांनी केली आहे. या संभाषणात, ” माझं जेव्हा प्रोटेक्शन काढलं. तेव्हा रात्री पावणे बारा वाजता सीएमनी जॉइन्ट सीपीना फोन केला होता. माझ्या जीवाला जितेंद्र आव्हाडांकडून धोका…
महालोकवाणी न्यूज ;अहमदनगर शहरात शिंदे गटाच्या आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपचे नेते माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डीले आणि शिंदे गटाचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप सातपुते यांचा मुलगा ओंकार सातपुते यांच्या एका लग्नात झालेल्या वादाचे रुपांतर थेट दगडफेकीत झाले आहे. भाजपचे(BJP) नेते माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डीले आणि शिंदे गटाचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप सातपुते यांचा मुलगा ओंकार सातपुते यांचा एका लग्नात वाद झाला होता. या वाद विकोपाला गेल्याने मंगळवारी रात्री भाजपच्या कार्यकर्त्यांनी सातपुते यांच्या केडगामधील हॉटेलची तोडफोड केली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी 50 ते 60 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या दगडफेकीमुळे अहमदनगर…
पुणे जिल्हा प्रतिनिधी: बबनराव धायतोंडे देणाऱ्याने देत जावेघेणाऱ्याने घेत जावेघेता घेता देणाऱ्याचेदोन्ही हात ही घ्यावेअश्या प्रकारे पसायधान हॉटेलचे मालक श्री ,श्रीराम न्हाणे व बाळकृष्ण न्हाणे यांनी दि.13 रोजी पुणे_सोलापूर हायवे शेजारील स्वामी चिंचोली तालुका दौंड येथिल पसायधान हॉटेल च्या तिसऱ्या वर्धापनदिना निम्मित जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व मुलांना स्वादिष्ट रुचकर असे भोजन दिले शाळेतील मुलांनी जेवणाचा अस्वाद घेतला मुलांना हॉटेलमध्ये जेवायला मिळाल्यामुळे मुलांमध्ये आनंदाचे वातावरण होते व शाळेचे मुख्याध्यापिका रामगुडे मॅडम. व त्यांचे सहशिक्षक काळे मॅडम, पवार मॅडम,हिवरे सर, यांनी पसायदान व्हेज चे मालक श्रीराम नहाने व बाळकृष्ण नहाने यांचे आभार मानले शाळेच्या मुख्याध्यापिका रामगुडे मॅडम यांनी हॉटेल पसायदान व्हेज…