(छाया – विजय मते)
महालोकवाणी न्यूज :- दि 12 जाने 2023
नगर औरंगाबाद रोडवरील गजराज नगर जवळील एका गादीच्या कारखान्यास आग लागल्याने त्यामधील कापूस, कापड जळून पूर्ण भस्म सात झाले. गुरुवारी सकाळी ही दुर्घटना घडली. आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही पण 10ते 15लाख रुपयांचे नुकसान झाले त्यामुळे मालकाच्या अश्रूंचा बांध फुटला होता. कारण तीन वर्षांपूर्वी अशीच आग लागल्याने खुप मोठे नुकसान झाले होते त्यावेळी गजराज नगर जवळच हा कारखाना सुरू होता.

आता कुठूनही करता येणार मतदान, काय आहे RVM मशीन? RVM मशीन कसं काम करतं?
ही घटना घडली तेव्हा तातडीने युवा नेते अक्षय कर्डिले, सरपंच रामेश्वर निमसे, नगरसेवक सुनिल त्र्यंबके, बाळासाहेब पवार दत्ता तापकीरे, बबलू सुर्यवंशी आदींनी अग्नीशमन दलाला फोन करून वस्तुस्थिती सांगितली 3गाड्या आल्या आग आटोक्यात आणली पण मधल्या काळात कारखाना आगीच्या विळख्यात सापडला होता. शॉक सर्किट मुळे आग लागली असल्याचा अंदाज आहे.
