अहिल्यानगरमध्ये महायुतीचा फॉर्म्युला ठरला तर दिग्गजांचे पत्ते कट? तिकीट न मिळालेल्यांची दुसऱ्या दारावर धावपळ सुरू होणार!
अहिल्यानगर | राजकीय विश्लेषण
अहिल्यानगरच्या Ahilyanagar राजकारणात आगामी काळात मोठा उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे गटाची शिवसेना यांची महायुती प्रत्यक्षात आली, तर अनेक प्रस्थापित आणि दिग्गज इच्छुकांचे तिकीट कट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर

महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार मर्यादित जागांमध्ये अधिक इच्छुक, अशी स्थिती निर्माण होणार असून, त्यामुळे अनेक नेत्यांना पक्षांतर्गत डावललं जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ज्या उमेदवारांना महायुतीत तिकीट मिळणार नाही, ते पर्यायी राजकीय वाटा शोधण्यास सुरुवात करतील, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, तिकीट न मिळालेल्या नेत्यांची गर्दी राष्ट्रवादी शरद पवार गट, उद्धव ठाकरे गटाची शिवसेना, मनसे आणि काँग्रेसकडे होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे विरोधी पक्षांमध्येही इच्छुकांची संख्या अचानक वाढण्याची शक्यता असून, राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलू शकतात.
Table of Contents

अहिल्यानगरमध्ये आधीच अनेक प्रबळ उमेदवार मैदानात असल्याने, महायुतीचा निर्णय अनेकांचे राजकीय भविष्य ठरवणारा ठरणार आहे. आगामी काही दिवसांत कोणाचा पत्ता कट होतो आणि कोणाला नवी संधी मिळते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहणार आहे.
old news police bharati | मोठी पोलिस भरती ! लागा तयारीला, सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, असा करा अर्ज