महालोकवाणी न्यूज:
नगर – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अद्वितीय व्यक्तीमत्वातून बुद्धीमत्ता, व्युहरचना, साहस, मानवतावादी दृष्टीकोन असे अनेक गुण आजच्या तरुण पिढीला घेण्यासारखे आहेत. महाराजांनी संकुचितपणा, भेदभाव न करता सर्व समाज घटकांच्या कल्याणाचा विचार करणारा राजा अशीच ओळख जगाला करुन दिली. त्यांची प्रेरणा विद्यार्थ्यांनी घेऊन त्यांचे विचार प्रत्यक्षात अंमलात आणले पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.उदय नाईक यांनी केले.

विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पाहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ.उदय नाईक, शिक्षक समन्वयक प्रा.गणेश डहाणे, प्रा.सुनिल मांढरे, डॉ.एस.ए.मरकड, डॉ.के.बी.काळे, डॉ.आर.आर.नवथर, प्रा.निळकंठ देशपांडे, प्रा.आर.एस.तांबे, प्रा.अविनाश पुंड, विद्यार्थी प्रतिनिधी विशाल छाईलकर, वैष्णवी ढाकणे, मुस्कान शेख उपस्थित होते.
डॉ.विखे पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरुढ पुतळ्यास अभिवादन करुन विळदघाट येथील महाविद्यालयापर्यंत पायी शिवज्योत आणली. प्राचार्य व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांनी या ज्योतीचे स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन जयघोष करण्यात आला.
डॉ.नाईक यांनी मार्गदर्शन करतांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या प्रत्येक दिवस हा आपल्या देशासाठी प्रेरणादायी आहे. राष्ट्र परमवैभवाला नेण्यासाठी शिवराय अंगिकारणे गरजेंचे आहे. अशी महान विभुती पुन्हा होणे नाही. महाराजांचे विचार, सर्वसमावेशकता यातून सध्याच्या तरुण पिढीने प्रेरणा घ्यावी, असे सांगितले.
शिवजयंतीनिमित्त शिवज्योत आणणार्या विद्यार्थी संघटनांचा गौरव महाविद्यालयाच्यावतीने करण्यात आला. या कार्यक्रमास फौंडेशनचे डेप्युटी डायरेक्टर प्रा.सुनिल कल्हापुरे, प्रभारी सेक्रेटरी डॉ.पी.एम.गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.
