नगर. ता. 19
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय. रामदासजी आठवले साहेब यांनी भीमा कोरेगाव प्रकरणातील केसेस मागे घेण्यात यावेत, जसे मराठा मोर्चातील केसेस मागे घेतले आहेत, त्याप्रमाणे भीमा कोरेगाव प्रकरणातील केसेसही मागे घेण्यात यावी यासाठी आठवले साहेबांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात येणार आहे.
1 जानेवारी हा संघर्ष दिन म्हणून ओळखला जातो या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातून भीम अनुयायी हे कोरेगाव भीमा येथे येत असतात महार समाजाच्या इतिहासाची आठवण म्हणून सर्वजण जमा होत असतात .डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याची सुरुवात केली होती . आता अलीकडच्या काळामध्ये बरेच राजकीय पक्ष या ठिकाणी सभा घेतात यातूनच काही अनुसूचित प्रकार घडतात हे घडू नये, म्हणून प्रशासनाने सभा घेण्यास परवानगी नाकारली आहे. पण रामदासजी आठवले साहेब यांनी बाहेर किंवा इतरत्र ठिकाणी सभा घेण्यास परवानगी मिळावी मागणी केली आहे.
यावेळी चंद्रकांत दादा पाटील यांनी केलेल्या वक्तव्य विषयी त्यांना विचारण्यात आले तेव्हा यावर आठवले साहेबांनी सांगीतले की, मी त्यांच्या विचाराशी सहमत नाही, असे स्पष्ट सांगितले,
तसेच महाविकास आघाडीतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चाबद्दल विचारणा केली असता आठवले साहेबांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिले स्वतःचे आमदार संभाळता आले नाही आता हे मोर्चा काढतात, राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याबद्दल आमची नाराजी आहे, त्यांनी दिलगिरी ही व्यक्त केली आहे. असे आठवले साहेब बोलत होते
