नगर – तुम्ही, जर शिकले तरच ताठ मानाने जगताल, तुम्ही, जर संघटीत होऊन आपल्यावरील अन्यायाला विरोध केला तर न्याय मिळेल, पण संघर्ष करतांना मात्र माणसाला माणुसकी मिळवून देण्यासाठी संघर्ष करा, असा संदेश भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. तो कृतीतून साकारण्याची खरी गरज आहे, असे प्रतिपादन व्याख्याते अशोक औटी यांनी केले.

सावेडी उपनगरात गुलमोहोर रोडवर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वंचित बहुजन आघाडी व गुलमोहोर नागरी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा महासचिव योगेश साठे, अॅ्ड. लक्ष्मीकांत पठारे, अशोक औटी, शिरीष जानवे, कारभारी कराळे, माजी जि.प. सदस्य बाळासाहेब सोनवणे, माजी कृषी अधिकारी शिरिष जाधव, अभिजीत मेढे, सावन मकासरे, किशोर वारे, सचिन गायकवाड, अनिल भापकर, बाबुभाई टेलर, शशिकांत दळवी, भाऊसाहेब पानमळकर,प्रमोद आढाव, आजिनाथ थोरवे, प्रकाश दासी, भैय्या काळे, अमोल पानसरे आदि उपस्थित होते. प्रारंभी बौद्धाचार्य दिपक पाटोळे यांनी वंदना म्हटली.
यावेळी जिल्हा महासचिव योगेश साठे यांनी प्रास्तविकात वंचित आघाडीने वर्षभर राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, राष्ट्र पुरुषांच्या जयंती साजरी करण्यात येत असून त्यांचे विचार प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी प्रयत्न करीत असतो.
बाळासाहेब सोनवणे म्हणाले, माणसाच्या मुक्तीसाठी मन, मस्तक आणि मनगटाचा मिलाफ घडवून बिन चेहर्याचे आयुष्य जगत असलेल्या वंचितांना अस्मितेची ओळख डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवून दिली. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा या संदेशाबरोबर समतेचे सत्य, प्रज्ञेचे पाईक आणि करुणेचा कलश म्हणजे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त ही विचारांची प्रेरणा आपण प्रत्यक्षात आचरणात आणण्याची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी अशोक देवढे, देविदास भालेराव, दीपक जाधव, प्रज्योत शिर्के, भरत दिघे, शिवम जगदाळे, पंकज पवार, यशराज काळे, अंकुश मालसमिंदर, भारत भालेराव, स्वप्नील वैद्य, गणेश जपे, बबन गाडे, ज्ञानेश्वर वाघमारे, अखिलेश दहिफळे आदि उपस्थित होते.
