सोमराज बडे,पाथर्डी वृत्तसेवा:
बुधवार दिनांक २७ जून 2023 रोजी चिंचपूर पांगुळ येथील श्री. वामनभाऊ विद्यालयात दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचा “गुणगौरव सोहळा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते संत वामभाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार तसेच श्रीफळ वाढवून करण्यात आली.

हे नक्की वाचा: Panjanrao Dakh |पंजाबराव डख एक शेतकरी ते हवामान तज्ञ; जाणून घ्या मेघराजाचा अचूक अंदाज दर्शविणाऱ्या पंजाबराव डख यांची कहाणी..
इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे संघर्षयोद्दा बबनराव ढाकणे केदारेस्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऋषिकेश ढाकणे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नरोडे सर व मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह,रोख बक्षिसे,प्रशिस्तीपत्रे व गुलाब-पुष्प देवून स्वागत केले.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ऋषिकेश ढाकणे हे होते तर अध्यक्षस्थानी जगन्नाथ बडे(सेवानिवृत्त पो.अधिकारी) हे होते.
यावेळी प्रथम ,दुतीय,तृतीय,तसेच चतुर्थ आलेल्या विदयार्थ्यांना जगन्नाथ बडे यांनी पाच हजार रुपये रोख बक्षीस दिले. केदार सर यांनी एक हजार रुपये, गणेश बडे एक हजार रुपये, गहिनाथ बडे एक हजार रुपये,डॉ राजेंद्र खेडकर तसेच इतर अनेक ग्रामस्थांनी रोख रक्कम बक्षीस म्हणून सदर विद्यार्थांना वितरित केली.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ऋषिकेश ढाकणे म्हणाले की,स्वातंत्रपूर्वी आपल्या देशात खूपच दारिद्र्य होते.त्याचे कारण म्हणजे शिक्षण मिळत नव्हते.पुढे देश स्वतंत्र झाला आणि शिक्षण मिळावे यासाठी आपल्या लोकांनी प्रयत्न केले आणि आज आपण पहात आहोत की, जगात आपल्या देशाचा कुठल्याही क्षेत्रात दबदबा निर्माण झाला आहे., त्याचे एकमेव कारण म्हणजे शिक्षण होय.
म्हणून तुम्ही सर्व विध्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावा आणि आपले शाळेचे,गावाचे नाव गाजवावे.
पुढे बोलतांना म्हणाले की आज आपल्या मातृ भाषेबरोबर परदेशी भाषेचे विद्यार्थ्यांना शिक्षणमिळणे आवश्यक आहे. ते आपल्या विद्यालयायील विदयार्थ्यांना कसे मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्याच प्रमाणे ढाकणे यांनी पुढील वर्षी दहावी उत्तीर्ण होणाऱ्या अनुक्रमे प्रथम पाच विद्यार्थ्यांना “स्मार्ट वॉच” मोफत देणार असल्याचे जाहीर केले.
तसेच पुढील वर्षी इयत्ता दहावी उत्तीर्ण होणाऱ्या मुलांना जगन्नाथ बडे, पोपट बडे ,काशिनाथ बडे,कानिफ ढाकणे,यांनी रोख रक्कम जाहीर केली आहे.तसेच मुंबई पोलीस बाळासाहेब बडे यांनी पाचवी ते दहावी प्रथम येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांस रोख रक्कम बक्षीस म्हणून देणार असल्याचे सांगितले आहे.
यावेळी अशोक अबिलढगे,शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष गणेश बडे,विष्णू राजगुरू,रामदास बडे,डॉ राजेंद्र खेडकर,बाबासाहेब राजगुरू,आश्रुबा बडे,सेवानिवृत्त तहसीलदार दराडे,दादासाहेब बारगजे,आनंद रधवे,पोपट बडे,नामदेव बडे,कानिफ ढाकणे,गर्जे मॅडम,अकोलकर सर,उदमले ,दहिफळे,श्री म्हस्के, यांचेसह इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक व विद्यार्थी उपस्तीत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापक श्री नरोडे यांनी केलीे. तर सूत्रसंचालन श्री सनी मर्दाने यांनी केले. आणि आभार प्रदर्शन विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री जाधव यांनी केले.
