rain update : राज्यात अजूनही हवा तसा पाऊस Rain झालेला नाही.राज्यातील अनेक जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. परंतु आता राज्यात पाऊस सक्रीय होणार आहे. हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

अर्धा जुलै महिना झाला आहे तरी राज्यांत अजूनही पुरेसा पाऊस Rain नाही. राज्यातील अनेक धरणांमध्ये पाण्याची पातळी खालवली आहे. उशिरा आलेला मान्सून त्यानंतर पावसाने घेतलेली विश्रांती यामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. आता गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागांत पाऊस सुरु झालाय. मुंबई शहरासह उपनगरांमध्ये सोमवारी पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु आहे. राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढणार आहे. राज्यातील काही भागांत मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

काय आहे हवामान विभागाचा अंदाज
राज्यात पुढील 4-5 दिवस मान्सून सक्रिय राहणार आहे. तसेच कोकण व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस Rain पडेल, असा अंदाज पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसळीकर यांनी व्यक्त केला आहे. यंदा प्रथमच मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. चंद्रपूरमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. मुंबई शहराला 3 दिवसाचा यलो अलर्ट दिला आहे. पुणे जिल्ह्यास सोमवारी ऑरेंज अलर्ट दिला आहे. विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.

पाऊस सक्रीय होणार
राज्यात पाऊस Rain आता सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय झाले आहे. यामुळे 17 व 18 जुलै रोजी संपूर्ण कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.

मुंबईत दमदार हजेरी
मुंबई शहरात सोमवारी पहाटेपासून दमदार हजेरी लावली आहे. दादर, माटुंगा ,माहीम हाजी अली परिसरात मुसळधार पाऊस Rain सुरु आहे. सोमवारी मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे. धुळे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सरासरीच्या केवळ 83 टक्के पाऊस पडलेला आहे. कमी पावसामुळे जिल्ह्यातील पेरण्या देखील रखडलेल्या आहेत. धुळे जिल्ह्यात केवळ 75 टक्के पूर्ण झालेल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरु आहे.
Table of Contents
१५ जुलै पासून बऱ्याच जिल्ह्यात मान्सूनला सुरवात झाली आहे, पण आत्ता पर्यंत शेतकरी संकटातच आहे, कारण पेरण्या करावा इतका पाऊस Rain झालेला नाही, त्यामुळे पावसाळा सुरवात होऊन दीड महिना झाला आहे , पण पाऊस जसा पाहिजे तास पडला नाही, आता तरी येणाऱ्या काळात पाऊस सक्रिय राहिला तर शेतकरी पेरण्या करू शकेल,
