Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Manipur|मणिपूर हिंसाचाराचे नगरमध्ये पडसाद,आदिवासी विद्यार्थ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Manipur|मणिपूर हिंसाचाराचे नगरमध्ये पडसाद,आदिवासी विद्यार्थ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

mahalokwaniBy mahalokwaniJuly 25, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहमदनगर:- मणिपूर manipur येथील आदिवासी महिलांवरील अमानवीय अत्याचार करणाऱ्यावर फाशीची शिक्षा आणि मणिपूर मुख्यमंत्री यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ.जालिंदर घिगे यांच्या नेतृत्वाखाली, राज्य समन्वयक ॲड.अरुण जाधव यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.

आंदोलनाचे नियोजन पंकज खर्डे यांनी केले होते.यावेळी वंबआ जिल्हा महासचिव योगेश साठे,शहर जिल्हा उपाध्यक्ष मनोहर जिंदम,गणेश तडवी, देविसिंग पाडवी,विलास तडवी,उमेश तडवी,मगण वसावे आदीसह अन्य आदिवासी जमातीचे विद्यार्थी उपस्थित होते.


मणिपूर manipur राज्यामध्ये भाजप सरकारने मैतेई जमातीला आदिवासी आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यामुळे कूकी व नागा या मूळ आदिवासी जमातींचा संतप्त प्रतिक्रियेनंतर मागील ३ महिन्यापासून दोन जमाती मध्ये हिंसाचार सुरू आहे.तेव्हा पासून अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत कित्येक घरे उद्ध्वस्त झाली आहेत हजारो कुटुंबांना गावेसोडून स्थलांतरित व्हावे लागले आहे.जनजीवन विस्कळित झाले आहे दोन दिवसांपूर्वी मे महिन्यात २आदिवासी जमातीच्या महिलांवर सामूहिक बलात्कार व नग्न धिंडचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत या घडलेल्या घटनेच्या नंतर मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री यांच्या प्रतिक्रिये नंतर केंद्रातील भाजप सरकार व राज्यातील भाजप सरकारच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे भाजप सरकार पुरस्कृत हिंसाचार आहे की काय?असा थेट सवाल विचारला जात आहे.

सादर घटना अत्यंत क्रूर व अमानवीय आहे सदर कृत्य करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी व सदर घटना दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या मणिपूर राज्यशासनाने केल्याचे दिसून येत आहे म्हणून मणिपूर मुख्यमंत्री,गृहमंत्री यांचे राजीनामे घेऊन यांचेसह संबंधित प्रशासन यंत्रणा यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.

सदर निवेदन जयश्री आव्हाड उपजिल्हाधिकारी यांना संध्या पावरा, मिनाक्षी वसावे, वर्षा वळवी या मुलींच्या हस्ते देण्यात आले. यावेळी डॉ.जालिंदर घिगे, ॲड.अरुण जाधव,योगेश साठे,डॉ.पंकज खर्डे आदींनी मनोगत व्यक्त केले.


मणिपूर manipur थे दोन आदिवासी महिलांची अर्धनग्न धिंड काढल्याचे प्रतिसाद आता नगर जिल्ह्यात देखील उमटण्यास सुरुवात झालेली असून नगर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी बांधव असलेल्या विद्यार्थ्यांकडून भाजप सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. २४ तारखेला सकाळी साडेअकराच्या सुमारास आदिवासी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केलेली असून यावेळी मणिपूर येथील हिंसाचाराचा यावेळी तीव्र निषेध करण्यात आला सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या प्रकरणी ७९ दिवसापर्यंत मौन बाळगल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला आहे.

आदिवासी बांधवांमधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटलेले होते.मणिपूर राज्यात भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे भडकलेल्या हिंसाचारात आदिवासी महिलांची अर्धनग्न अवस्थेत धिंड काढून त्यानंतर बलात्कार करून खून केल्याच्या घटनेसह दररोज घडणाऱ्या इतरही घटनांच्या निषेधार्थ आदिवासी विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमलेले होते त्यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांचा देखील यावेळी निषेध एकमुखाने करण्यात आलेला आहे.आदिवासी विद्यार्थ्यांनी यावेळी मणिपूरचे मुख्यमंत्री यांच्यावर बिरेनसिंह यांच्यावर निशाणा साधलेला असून केंद्र सरकारच्या आदिवासी बांधवांच्या विरोधातील धोरणामुळे अशा घटना होत असल्याबद्दल संताप व्यक्त केलेला आहे.

अनेक आदिवासी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या निदर्शनात सहभागी झालेले होते त्यावेळी केंद्राने लवकरात लवकर योग्य ती पावले उचलावी अशी एकमुखी मागणी सर्व आदिवासी बांधवांकडून करण्यात आलेली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेडमधील नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू; आमदार प्रा राम शिंदे यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला प्रश्न !
Next Article अडीच वर्षात MIDC मंजूर करता आली नाही म्हणून वैफल्यग्रस्त झालेल्या आ.पवार यांनी खालची पातळी गाठली – पै.शरद कार्ले (सभापती कृ.उ.बा.स)
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.