कळवा रुग्णालयात एका दिवसांत पाच रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Kalwa कळवा रुग्णालयात एका दिवसांत पाच रुग्णाचा मृत्यू
कळवा Kalwa रुग्णालयात एका दिवसांत पाच रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कळवा रुग्णालयाला भेट दिली.अतिदक्षता विभागात रुग्णाचा मृत्यू होऊन सहा तास उलटून देखील, तो मृतदेह तशाच अवस्थेत पडून असल्याचे दिसून आले. यामध्ये एका गरोदर महिलेचा समावेश आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
Kalwa रुग्णालयातील भीषण वास्तव बघून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रशासनाची चांगलीच कानउघाडणी केली. वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर आक्रोश केला आहे. रुग्णालयाला मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे.
Flipkart Sale। फ्लिपकार्टवर बंपर सेल ऑफर; या तारखेपासून महाबचत सेलला सुरवात..
Table of Contents
ठाणे येथील कळवा रुग्णालयात सर्व सुविधा असून सुद्धा अपुऱ्या यंत्रणेमुळे हा प्रकार घडल्याचे प्रथमदर्शी दिसत आहे, पण हे ५ मृत्यू नेमके कश्यामुळे झाले आहेत याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे

रुग्णांना उपचार वेळेवर न मिळाल्याने रुग्ण दगावले असल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्यानंतर कळवा Kalwa रुग्णालय प्रशासनकडून देखील खुलासा करण्यात आला आहे. आयसीयू देखील फुल असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे सांगितले.
या ठिकाणी मोठ्या प्रमाणत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, कारण इतर रुग्णांना कोणता त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे ,
