जालन्यातील झालेल्या लाठीचार्ज प्रकरणामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. अशातच मराठवाड्याकडे जाणाऱ्या सर्व एसटी बसेस ST Bus बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याहून छत्रपती संभाजीनगर, जालन्याला जाणाऱ्या बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्याहून संभाजीनगर आणि जालन्याला जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
ST Bus प्रवाशांना हाल सोसेना

ST Bus बस सेवा बंद
एसटी बस ST Bus सेवा अचानक बंद केल्यामुळे सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल झालेले पाहायला मिळत आहे, खाजगी बस कंपन्यांकडून नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट पाहायला मिळत आहे, दुप्पट भाडे घेतले जात आहे , सरकारने अशा प्रकारे अचानक बस सेवा बंद केल्यामुळे नागरिक आहे त्या ठिकाणी गुंतून राहिलॆ आहे , असे अनेक प्रवाशी असे आहेत कि, त्यांच्याकडे बस तिकिटाचे पैसे नाहीत कारण सरकारी बस मध्ये पास , तसेच अर्ध्या तिकिटात प्रवास करता येतो, अशा नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत.

जालना Jalna येथे घटना घडल्या नंतर अचानक बस सेवा केल्यापण सरकारने जे प्रवाशी बस स्टॅन्डवर ST Bus अडकलेले आहेत त्यांना मात्र वाऱ्यावरच सोडलेले चित्र पाहायला मिळत आहे , सरकारने सामान्य नागिरकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे , खाजगी बस धारकांनी मात्र याचा फायदा घेतला , यावर सरकारचे कसलेच नियंत्रण राहिले नाही,
जालना येथील आंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर राज्यभरात त्याचे संतप्त पडसाद उमटले आहेत. त्याचाच परिणाम म्हणजे एसटी बससेवा रद्द करण्यात आली आहे. पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी

छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, धुळे, श्रीरामपूर, बीड या भागातील एसटी बस पुर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर लातूरला जाणाऱ्या सर्व बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. दररोज या भागांमध्ये ६०० एसटी बस ST Bus सोडण्यात येतात. याचा मोठा फटका सामान्य प्रवाशांना बसला आहे.
