विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील ३ आक्टोबर १९५७ ला स्थापन झालेल्या रिपब्लिकन पक्षाला आज ६७ वर्ष पुर्ण झाल्याने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना डॉ रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशातील तळागाळापर्यत पक्ष पोहचला असून यावर्षी ३ आक्टोबर २०२३ रोजी हैदराबाद येथे अधिवेशन होणार असल्याने राज्यातील तथा अहमदनगर जिल्हातून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यानी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी केले आहे .
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ३ आक्टोबर १९५७ ला स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाची धुरा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना डॉ रामदास आठवले हे समर्थपणे सांभाळत असून संपूर्ण देशातील गावा गावात रिपब्लिकन पक्ष पोहचवून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण केले आज तळागाळातील व सर्व समाज्यातील लोक रिपब्लिकन पक्षाशी जोडले गेले असून आज खऱ्या अर्थाने पक्षाला बळकटी मिळाली आहे .

२०२४ ला लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याने आपल्या पक्षाचे बहुतांश लोक लोकसभेत जाणार हे निश्चित आहे . रिपब्लिकन पक्ष म्हणजे सर्वाना बरोबर घेवून जाणार पक्ष असून याकडे महीलांचा व तरुणांचा मोठा कल वाढला आहे .
३ आक्टोबर २०२३ ला रिपब्लिकन पक्षाचा ६७ वा वर्धापन असल्याने या पक्षाचे अधिवेशन तेलंगणातील हैदराबाद येथील नामपल्ली रेल्वे स्टेशन जवळील मुकररामजाही रोडवरील एक्शिबिशन ग्रांऊड वर होणार असून नगर जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यानी या अधिवेशात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी केले आहे
