Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ताराबाईने अंगावरची साडी दोर म्हणून फेकली अन्; वाचला तीन भावांचा जीव धक्कादायक घटना

ताराबाईने अंगावरची साडी दोर म्हणून फेकली अन्; वाचला तीन भावांचा जीव धक्कादायक घटना

mahalokwaniBy mahalokwaniJuly 27, 2024Updated:July 27, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

राज्यभर गेल्या दोन ते चार दिवसांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली दिसली. मुसळधार पावसाने धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली. त्यामुळे नदीपात्र दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे नदी काठावर असलेल्या गावांना याचा फटका बसेलला पाहायला मिळाला. शहरांमध्ये तर लोकांच्या घरात पाणी शिरलं होतं. शॉक लागून आणि पाण्यात बुडून माणसांसह जनावरांचा मृत्यू झाला. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगरमधील कोपरगाव तालुक्यामध्ये महिलेन आपली अंगावरील साडीच्या मदतीने दोन सख्ख्या भावांना बुडता-बुडता वाचवलं.


गोदावरी नदीपात्रामधील पाण्यामध्ये वाढ होऊ लागल्याने शेतकऱ्यांना आपल्या विद्युत मोटारी सुरक्षित काढण्यासाठी आपला जीव धोक्यात घालावा लागतोय. कोपरगाव तालुक्यातील कारवाडी हंडेवाडी येथील तीन सख्खे भाऊ आपली मोटार काढण्यासाठी मंजूर येथील गोदावरी नदीच्या पात्रात उतरले. काही वेळात दुर्देवाने नदीचं पाणी वाढलं आणि पाण्याच्या प्रवाहामुध्ये तिन्ही तरूण वाहून गेले. त्यावेळी तिथे शेळ्या चारण्यासाठी ताराबाई पवार आणि त्यांचे पती छबुराव पवार यांनी त्यांना बुडताना पाहिलं.

तीन सख्ख्या भावांना बुडताना पाहून ताराबाई यांनी वेळ न घालवता आपल्या अंगावरील साडी काढली. कोणताही विचार न करता तरुणांना वाचवण्यासाठी आपल्या अंगावरील साडीचा दोर करत तरूणांना मदत केली. त्यावेळी संतोष भीमाशंकर तांगतोडे, प्रदीप भीमाशंकर तांगतोडे आणि अमोल भीमाशंकर तांगतोडे यांच्यामधील दोघेजण वाचले. मात्र संतोष तांगतोडे हा खोल पाण्यात गेल्याने त्याला वाचवण्यात अपयश आलं. ताराबाई यांनी प्रसंगावधान दाखवत दोन भावांचा जीव वाचवला. ताराबाई यांच्या धाडसाची पंचक्रोषीमध्ये चर्चा असून त्यांचं कौतुक होत आहे. जर त्यांनी वेळीच मदत केली नसती तर तांगतोडे घरातील तिन्ही तरूण एकाचवेळी बुडाले असते.

दरम्यान, बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी कोपरगावचे तहसीलदार संदीप कुमार भोसले यांनी आपली यंत्रणा कामाला लावली. त्याचबरोबर ग्रामस्थांनी आणि कोपरगाव नगरपरिषदेचे अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि जिगरबाज तरुणांनी अथक मेहनत घेतली.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleखा. लंके यांच्या आंदोलनात भ्रष्ट पोलिसांच्या तक्रारींचा पाऊस !
Next Article income tax | इन्कम टॅक्स भरणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती; जाणून घ्या इन्कम टॅक्सचे नवीन नियम
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.