Author: mahalokwani

मुंबई : विधीमंडळाचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरु असल्याने महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून ते विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून सभागृहात चांगलीच फटकेबाजी केली जातेय. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे स्वत: अधिवेशनाच्या निमित्ताने सभागृहात आले होते. या सगळ्या घडामोडी सुरु असताना एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकांनंतर आता पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. निवडणूक आयोगाने याबाबत महत्त्वाची घोषणा केलीय. नववर्षात मनरेगा योजनेत होणार मोठा बदल ; 1 जानेवारीपासून हा नियम लागू होणार ! निवडणूक आयोगाने शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर केलीय. येत्या 30 जानेवारीला या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 2 फेब्रुवारीला मतमोजणी होणार…

Read More

पुणेः लावणी नृत्यंगणा गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी होत असतानाच दुसरीकडून मात्र त्यांना संरक्षण देण्याची मागणी होऊ लागली आहे. गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमावर अश्लिलतेचा आरोप ठेऊन प्रस्थापित कलाकारांकडून विरोध आणि बंदीची मागणी होत असताना गौतमी पाटील यांनी टीव्ही नाईनशी बोलताना आपली स्पष्ट भूमिकाच मांडली. नवे वर्ष नवे नियम; बँक लॉकर, क्रेडिट कार्डपासून ‘या’ नियमांमध्ये होणार मोठा बदल ! गौतमी पाटील यांनी आपल्या कार्यक्रमावर अश्लिलतेचा आरोप केला जात आहे. मात्र तो आरोप का केला जात आहे याची मला खरचं माहिती नाही असंही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी तमाम महाराष्ट्राची माफी मागून सांगितले की, मागे जे कार्यक्रम झाले त्यामध्ये माझी चूक…

Read More

येत्या दोन दिवसात 2022 समाप्त होईल आणि नववर्षाला सुरुवात होणार आहे. नववर्षात अनेक बदल देखील होणार आहेत. अनेक शासकीय योजनेमध्ये देखील बदल केले जाणार आहेत. मनरेगा अर्थातच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेत देखील एक जानेवारीपासून अर्थातच नववर्षात मोठा बदल होणार आहे. नवे वर्ष नवे नियम; बँक लॉकर, क्रेडिट कार्डपासून ‘या’ नियमांमध्ये होणार मोठा बदल ! अशा परिस्थितीत आज आपण या योजनेत नेमका कोणता बदल होणार आहे? या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी यामुळे फायदा होईल की तोटा होईल यांसारख्या बाबींचा उलगडा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हाती आलेल्या माहितीनुसार एक जानेवारीपासून या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या मजूर वर्गाला आता डिजिटल…

Read More

जामखेड तालुक्यातील मौजे वाकी येथे पेजल योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा कामात अपहार झाल्या प्रकरणी जामखेड पंचायत समिती कार्यालय समोर 3 जानेवारी 2023 रोजी उपोषणास बसण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी दिला आहे. त्यांनी वाकी येथील नळ पाणीपुरवठा योजनेच्या निकृष्ट कामाची चौकशी होणे संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय , मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर, गटविकास अधिकारी पंचायत समिती जामखेड ,तहसीलदार जामखेड ,यांना निवेदन दिले होते. परंतु ,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे मंगळवार दिनांक 3 जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता ते कार्यकर्त्यांसह उपोषणास बसणार आहेत. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की., वाकी गावातील दलित वस्तीसह…

Read More

भारतीय टपाल विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोजगार वार्ता सप्ताहमध्ये एकूण 98 हजार रिक्त पदांसाठी अधिसूचना जारी केली जाऊ शकते. ही पदे भरली जाणार पोस्टमनच्या सर्वाधिक 59,099 रिक्त जागा, त्यानंतर मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 37,539 रिक्त जागा आणि नंतर मेल गार्डच्या 1,445 रिक्त जागा समाविष्ट केल्या जाऊ शकतात. पदांनुसार उमेदवारांना 98,000 रिक्त जागा अधिसूचना 2023 च्या पोस्ट विभागाकडून रिक्त पदांची अधिकृत माहिती मिळू शकेल. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. पोस्ट विभागात 98 हजारांहून अधिक पदांसाठी अर्ज आणि भरती प्रक्रिया आयोजित करण्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पोस्टमनच्या सर्वाधिक 59 हजार 99 रिक्त जागा, त्यानंतर मल्टी टास्किंग स्टाफच्या (MTS) 37 हजार 539…

Read More

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या वतीने योग विषयक प्रमाणपत्र अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2017-18 पासून सुरू करण्यात आलेला आहे. इयत्ता बारावी उत्तीर्ण किंवा समकक्ष असे कोणीही या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकत असून या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा कालावधी तीन महिन्यांचा आहे. दिनांक 2 जानेवारी 2023 पासून याचे प्रवेश अर्ज सुरू होत असून दिनांक 14 जानेवारी 2023 पर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहे, अशी माहिती क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ.दीपक माने यांनी दिली आहे. नवे वर्ष नवे नियम; बँक लॉकर, क्रेडिट कार्डपासून ‘या’ नियमांमध्ये होणार मोठा बदल ! किती जागा आहेत उपलब्ध? यासाठी 50 जागा असून…

Read More

मुंबई : टीम इंडिया 2023 या नववर्षाची सुरुवात श्रीलंका विरुद्ध टी 20 आणि एकदिवसीय मालिकेने (IND vs SL) करणार आहे. बीसीसीआयने या दोन्ही मालिकांसाठी मंगळवारी 27 डिसेंबरला भारतीय संघ जाहीर केला. निवड समितीने या दोन्ही मालिकांमध्ये एका खेळाडूला संधी न देऊन स्वत:चीच अडचण करुन घेतलीय. हा भारतीय खेळाडू राजकारणाचा बळी ठरलाय. टॅलेंटेड असूनही निवड समितीने या खेळाडूला टीमबाहेर बसवलंय. गॅस सिलेंडरचा स्फोट झाला तर, तुम्हाला मिळते ५० लाखांची नुकसान भरपाई; ‘असा’ करा क्लेम ! दूधातून माशी काढावी, तसंच अलगदपणे निवड समितीने रवी बिश्नोईला (Ravi Bishnoi) बाहेर केलंय. प्रतिभावान असूनही रवीसारख्या टॅलेंटेड लेग स्पिनरला संघात स्थान देण्यात आलं नाही. निवड समितीने…

Read More

औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील पिंप्री वरुड येथे शिरूर येथील श्रद्धा भूमी ते प्रगट भूमी असा प्रवास असून या पालखीमध्ये २०० महिला आणि पुरुषांचा सहभाग होता. गेल्या नऊ वर्षांपासून चालू असलेल्या परंपरेला कुठल्याही प्रकारचे गालबोट न लागता ही दिंडी अविरत चालू आहे. शिरूर गाव आणि परिसरातील महिला आणि पुरुष भाविक मोठ्या भक्तिभावाने या दिंडीत सहभागी झाले होते. नवे वर्ष नवे नियम; बँक लॉकर, क्रेडिट कार्डपासून ‘या’ नियमांमध्ये होणार मोठा बदल ! महिलांनी तुळशी कळस डोक्यावर घेऊन तर सहभागी झालेल्या पुरुषांनी विविध वेशभूषा करून भगवे ध्वज पताका, बँड, टाळ आणि मृदूंगाच्या गजरात मार्गे हळूहळू चला मुखाने गजानन बोला, गण गण गणात बोते…

Read More

प्रत्येक नवीन महिना आपल्यासोबत काही नवे बदल घेऊन येतो, जे सर्वसामान्यांसाठी खूप महत्त्वाचे असतात. काही दिवसांनी नवीन वर्ष सुरू होत असून अनेक बदलांसह नवीन वर्षाची सुरुवात होतेय. बँक लॉकर, क्रेडिट कार्ड आणि मोबाईलशी संबंधित अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. यासोबतच गॅस सिलिंडरच्या किमती आणि वाहनांच्या किमतीही वाढू शकतात. या सर्व बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. या बदलांकडे दुर्लक्ष केल्यास तुमचे आर्थिक नुकसानही होऊ शकतं. त्यामुळे जाणून घेऊया १ जानेवारीपासून नेमके काय बदल होणार आहेत? गॅस सिलेंडरचा स्फोट झाला तर, तुम्हाला मिळते ५० लाखांची नुकसान भरपाई; ‘असा’ करा क्लेम !▶ बँक लॉकरचे नवीन नियमरिझर्व्ह बँकेने सर्वसामान्यांच्या सुविधेसाठी बँक लॉकरसंबंधित…

Read More

नगर, प्रतिनिधी. (28. डिसेंबर.) : राजकीय वर्चस्वादातून योगेश राळेभात व राकेश राळेभात या दोन तरुणांची पिस्तुलातून गोळ्या घालून हत्या केल्याप्रकरणी स्वामी ऊर्फ गोविंद दत्तात्रय गायकवाड यास जन्मठेपेची शिक्षा ठोठाविण्यात आली आहे. श्रीगोंदा येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. जी. शुक्ला यांनी हा निकाल दिला. इतर आरोपींची सुटका करण्यात आली. यात सरकारी वकील म्हणून ॲड. उमेशचंद्र यादव पाटील यांनी काम पाहिले. झाल्याने दोषी ठरविलेले आरोपी गायकवाड यांनी राळेभात बंधूंचा खून केल्याप्रकरणी जन्मठेप आणि दहा हजार रूपये दंड, दंड न भरल्यास 1 वर्षे साधी कैद, भारतीय हत्यार कायदा कलम 3/27 नुसार 7 वर्षे सक्तमजुरी आणि 5 हजार दंड, दंड न भरल्यास…

Read More