हवामान अंदाजासाठी पंजाबराव डख हे नाव अलीकडे शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय बनले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या नावाची एका प्रकारची सणसणीच पाहायला मिळते. हा अवलिया आपला हवामान अंदाज एका मिनिटात लाखो शेतकऱ्यांना व्हाट्सअपच्या आणि youtube च्या माध्यमातून सांगत असतो दरम्यान अलीकडे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन, वेगवेगळ्या कार्यक्रमात हवामानाचा अंदाज सांगण्याचे देखील कार्य सुरू केले आहे. दरम्यान त्यांनी यंदाच्या मान्सून बाबत एक मोठी माहिती दिली आहे. सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील बोरगाव येथे कृष्णा उद्योग समूहाने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हे नक्की वाचा:- १ मे पासून फक्त ६०० रुपयात मिळणार घरपोच वाळू.! यांना मिळणार मोफत वाळू.. शेतीवर हवामान बदलाचा होणारा…
Author: mahalokwani
कर्जत / जामखेड | कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या औद्योगिक वसाहतीच्या उभारणीबाबत कायदेशीर बाबींना गती मिळावी आणि अधिसूचना जाहीर व्हावी यासाठी आमदार रोहित पवार यांनी नुकतीच उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात औद्योगिक क्षेत्राची निर्मिती व्हावी यासाठी आमदार झाल्यापासूनच रोहित पवार हे प्रयत्न करत होते. मतदारसंघात औद्योगिक वसाहत स्थापन होण्यासाठी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात २०१९ साली पहिल्याच हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता. दरम्यान, सर्व बाबींचा विचार करून सर्वेक्षण करण्यात आले आणि दोन्ही तालुक्याला मध्यवर्ती ठरणारी आणि दोन्ही तालुक्याला मोठी एमआयडीसी मिळावी या अनुषंगाने कर्जत तालुक्यातील मौजे पाटेगाव व खंडाळा येथील जागेची निवड करण्यात आली.…
जामखेड प्रतिनिधि : धनराज पवार जामखेड jamkhed शहरातील लोकमान्य हॉस्पिटलच्या वतीने प्रथम वर्धापनदिना निमित्त भव्य मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. मंगळावर दि. २५ एप्रिल २०२३ आज रोजी सकाळी १०.०० वा. प्रसिद्ध उद्योगपती रमेश शेठ गुगळे यांच्या शुभहस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी हॉस्पिटल चे संचालक डॉ. भुपेंद्र पन्हाळे, डॉ. रोहन टोमके, डॉ. सचिन काकडे, डॉ. महादेव पवार, डॉ. बाबासाहेब कुमटकर, डॉ. जतीन बोस काजळे, डॉ. पांडूरंग सानप, डॉ. संजय राऊत, डॉ. सुनिल वराट, डॉ. अशोक बांगर, डॉ.नानासाहेब बोलभट, डॉ. गफ्कार शेख, प्रकाश डोके, सचिन जाधव आदी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना उद्योगपती रमेश गुगळे म्हणाले की,…
जामखेड प्रतिनिधि: धनराज पवार जामखेड शहरामध्ये प्रथमच व्हेटरीनरी डायग्नोस्टीक लॅबचे उद्घाटन करण्यात आले.उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून जामखेड पशुधन विकास अधिकारी डॉ. संजय राठोड व आंबी ता. भूम चे पशुधन विकास अधिकारी डॉ. ओंकार देशमुख होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर डॉ. झेंडे होते,कार्यक्रमास प्रमुख मान्यवर पशुवैद्यकीय संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ. विठ्ठल राळेभात हे होते. तसेच पशुवैद्यक क्षेत्रातील पशुधन पर्यवेक्षक डॉ. धारकर, डॉ. आटोळे, डॉ. मंडलीकर, श्री. पाचारणे तसेच डॉ. आबा बोराटे, डॉ. अनभूले, डॉ. घायतडक, डॉ. उबाळे, डॉ. भोरे, डॉ.मोरे, डॉ. विशाल बोराटे, डॉ. शिंदे, डॉ. लगस डॉ. जगताप, डॉ. डफाळ आदी मान्यवर उपस्थित होते. डेल्टा व्हेटरनरी डायग्नोस्टीक लॅबच्या माध्यमातून जामखेड व…
जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार दि १७ मे २०२३ रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे अनंत बहुउद्देशीय सेवा संस्थेच अध्यक्ष एस् .एच .बेग आणी मिडीया पार्टनर म्हणुन एन्. टी. व्ही. न्युज मराठी अहमदनगर यांनी हा राज्यस्तरीय “रुग्णमित्र पुरस्कार” जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना जाहीर केला. कारण गेली तीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रात त्यांचे कार्य उल्लेखनीय असल्याने त्यांच्या कार्याचा आदर्श घेण्यासारखा आहे तसेच जनजागृती पर उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून बुधवार दिनांक १७ मे २०२३ रोजी दुपारी ११:००वाजता अहमदनगर येथील इंद्रायणी हॉटेल जवळील एन्. आर. लॉन येथे त्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे तसेच यापुर्वी हि त्यांना त्यांच्या सामाजिक…
नगर – अवैध वाळू उपसा व यातून वाढलेल्या गुन्हेगारीला लगाम घालण्याबरोबरच नागरिकांना स्वस्तात वाळू मिळावी, यासाठी तेलंगण राज्याच्या धर्तीवर राज्य सरकारने वाळूचे नवीन धोरण आणले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीत जिल्हा प्रशासनाने आघाडी घेतली आहे. राज्यात पहिले वाळू गट आणि डेपो सर्वात प्रथम मंजूर झाले. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय वाळूचे नियंत्रण समितीने नऊ वाळू गट व तीन डेपो यावर मंजुरीची मोहर उमटवली आहे. वाळू डेपो व्यवस्थापन आणि ग्राहकाच्या वाहनात वाळू भरून देणे यासाठी दि. 21 एप्रिल ते 27 एप्रिलपर्यंत निविदा मागवण्यात आल्या आहेत. एक ब्रास वाळूसाठा 600 रुपय महसूल विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून पैसे भरावे लागतील, त्यानंतर थेट…
भारतातील सर्वात स्वस्त आयफोनची किंमत देखील 49900 रुपये आहे. असे असूनही, त्याची विक्री सर्वाधिक आहे, अगदी दीड लाखांच्या आसपास किंमत असलेल्या सर्वात महाग मॉडेललाही मोठी मागणी आ Apple अँपल हा एक प्रीमियम फोन ब्रँड आहे ज्याची सर्व मॉडेल्स जगभरात लोकप्रिय आहेत, अगदी भारतातही त्यांना इतकी मागणी आहे की आपण अंदाज लावू शकत नाही. लाखात किंमत असूनही लोकं त्यांची खरेदी करतात. भारतातील सर्वात स्वस्त आयफोनची किंमत देखील 49900 रुपये आहे. असे असूनही, त्याची विक्री सर्वाधिक आहे, अगदी दीड लाखांच्या आसपास किंमत असलेल्या सर्वात महाग मॉडेललाही मोठी मागणी आहे. इतके महागडे फोन बनवूनही अॅपल (iPhone ) ही प्रीमियम फोन सेगमेंटमध्ये अव्वल कंपनी आहे. ही गोष्ट…
अहमदनगर प्रतिनिधी (दि.२५ एप्रिल):-आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी तसेच, आ.राणे यांना अहमदनगर जिल्हाबंदी घालण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आज मंगळवारी (दि.२५) एप्रिल रोजी अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालयावर भव्य मोर्चा काढणार असल्याचा इशारा आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी दिला आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मिरवणुकीत दरम्यान बाजारपेठेत व्यापारावर हल्ला झाल्याचा दुर्दैवी प्रकार घडला आहे. मिरवणूक काढणारे मंडळ व आंबेडकरी जनतेमध्ये चिंतेचे वातावरण होते.तथापि पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपींना अटक करून मिरवणुकीस बाधा येणार नाही,अशी उपाययोजना केली.व्यापारी हल्ला प्रकरणात जिल्हा बाहेरील व्यक्ती शहरात येऊन कायदा-सुव्यवस्था धोक्यात आणत आहेत.स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी चिथावणीखोर भाषणे करून शहरात दोन गटात दंगल घडण्याची परिस्थिती निर्माण…
अहमदनगर येथील छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम निकाली कुस्तीत महेंद्र गायकवाडने सोन्याची गदा पटकावण्याचा मान मिळवला आहे. कुस्ती सुरू झाल्यापासूनच खिलाडी वृत्ती दाखवत सोलापूरचा महेंद्र गायकवाड याने महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेवर कब्जा मिळवत होता. दोन्ही दिग्गज मल्लांमध्ये जवळपास 10 मिनिटे ही निकाली कुस्ती सुरू होती. या 10 मिनिटांमध्ये शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यात चांगलीच धरपकड सुरू होती. अखेर महेंद्रच्या मजबूत पकडीनंतर अचानक शिवराजला त्रास झाल्याने जखमी झाला. शिवराजला गंभीर त्रास होत असल्याचं समजताच त्याला रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. त्यानंतर आयोजकांकडून सोलापूरच्या महेंद्र गायकवाड विजयी घोषित केले. ही अंतिम निकाली कुस्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लावण्यात आली. छत्रपती…
महात्मा बसवेश्वरांनी समता व एकात्मतेचा संदेश दिला – तहसिलदार योगेश चंद्रे जामखेड प्रतिनिधि: धनराज पवार लिंगायत धर्माचे धर्मगुरु, विश्वगुरु महात्मा अर्थात बसवेश्वर महाराज यांचा जन्मदिन वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय तृतीयेला झाला, हा दिवस बसवेश्वर जयंती म्हणून साजरा केला जातो. नैतिक बना, विवेकी बना, स्वतःमध्ये बदल करा. स्वता:मधील दोष दूर करा. कर्मकांड दूर करा. स्वतःची स्तुती करू नका अशी सहज साधी सोपी वाटणारी पण माणसाला घडवणारी बहुमोलाची शिकवण बसवेश्वरांनी दिली आहे.वीर शैव लिंगायत समाज,जामखेड यांच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये आज रोजी जामखेड शहरातील खर्डा चौक येथे सकाळी ११.०० वाजता बसवेश्वर महाराज यांची…