जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार दि १७ मे २०२३ रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे अनंत बहुउद्देशीय सेवा संस्थेच अध्यक्ष एस् .एच .बेग आणी मिडीया पार्टनर म्हणुन एन्. टी. व्ही. न्युज मराठी अहमदनगर यांनी हा राज्यस्तरीय “रुग्णमित्र पुरस्कार” जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना जाहीर केला. कारण गेली तीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रात त्यांचे कार्य उल्लेखनीय असल्याने त्यांच्या कार्याचा आदर्श घेण्यासारखा आहे तसेच जनजागृती पर उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून बुधवार दिनांक १७ मे २०२३ रोजी दुपारी ११:००वाजता अहमदनगर येथील इंद्रायणी हॉटेल जवळील एन्. आर. लॉन येथे त्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे तसेच यापुर्वी हि त्यांना त्यांच्या सामाजिक…
Author: mahalokwani
नगर – अवैध वाळू उपसा व यातून वाढलेल्या गुन्हेगारीला लगाम घालण्याबरोबरच नागरिकांना स्वस्तात वाळू मिळावी, यासाठी तेलंगण राज्याच्या धर्तीवर राज्य सरकारने वाळूचे नवीन धोरण आणले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीत जिल्हा प्रशासनाने आघाडी घेतली आहे. राज्यात पहिले वाळू गट आणि डेपो सर्वात प्रथम मंजूर झाले. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय वाळूचे नियंत्रण समितीने नऊ वाळू गट व तीन डेपो यावर मंजुरीची मोहर उमटवली आहे. वाळू डेपो व्यवस्थापन आणि ग्राहकाच्या वाहनात वाळू भरून देणे यासाठी दि. 21 एप्रिल ते 27 एप्रिलपर्यंत निविदा मागवण्यात आल्या आहेत. एक ब्रास वाळूसाठा 600 रुपय महसूल विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून पैसे भरावे लागतील, त्यानंतर थेट…
भारतातील सर्वात स्वस्त आयफोनची किंमत देखील 49900 रुपये आहे. असे असूनही, त्याची विक्री सर्वाधिक आहे, अगदी दीड लाखांच्या आसपास किंमत असलेल्या सर्वात महाग मॉडेललाही मोठी मागणी आ Apple अँपल हा एक प्रीमियम फोन ब्रँड आहे ज्याची सर्व मॉडेल्स जगभरात लोकप्रिय आहेत, अगदी भारतातही त्यांना इतकी मागणी आहे की आपण अंदाज लावू शकत नाही. लाखात किंमत असूनही लोकं त्यांची खरेदी करतात. भारतातील सर्वात स्वस्त आयफोनची किंमत देखील 49900 रुपये आहे. असे असूनही, त्याची विक्री सर्वाधिक आहे, अगदी दीड लाखांच्या आसपास किंमत असलेल्या सर्वात महाग मॉडेललाही मोठी मागणी आहे. इतके महागडे फोन बनवूनही अॅपल (iPhone ) ही प्रीमियम फोन सेगमेंटमध्ये अव्वल कंपनी आहे. ही गोष्ट…
अहमदनगर प्रतिनिधी (दि.२५ एप्रिल):-आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी तसेच, आ.राणे यांना अहमदनगर जिल्हाबंदी घालण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आज मंगळवारी (दि.२५) एप्रिल रोजी अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालयावर भव्य मोर्चा काढणार असल्याचा इशारा आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी दिला आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मिरवणुकीत दरम्यान बाजारपेठेत व्यापारावर हल्ला झाल्याचा दुर्दैवी प्रकार घडला आहे. मिरवणूक काढणारे मंडळ व आंबेडकरी जनतेमध्ये चिंतेचे वातावरण होते.तथापि पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपींना अटक करून मिरवणुकीस बाधा येणार नाही,अशी उपाययोजना केली.व्यापारी हल्ला प्रकरणात जिल्हा बाहेरील व्यक्ती शहरात येऊन कायदा-सुव्यवस्था धोक्यात आणत आहेत.स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी चिथावणीखोर भाषणे करून शहरात दोन गटात दंगल घडण्याची परिस्थिती निर्माण…
अहमदनगर येथील छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम निकाली कुस्तीत महेंद्र गायकवाडने सोन्याची गदा पटकावण्याचा मान मिळवला आहे. कुस्ती सुरू झाल्यापासूनच खिलाडी वृत्ती दाखवत सोलापूरचा महेंद्र गायकवाड याने महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेवर कब्जा मिळवत होता. दोन्ही दिग्गज मल्लांमध्ये जवळपास 10 मिनिटे ही निकाली कुस्ती सुरू होती. या 10 मिनिटांमध्ये शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यात चांगलीच धरपकड सुरू होती. अखेर महेंद्रच्या मजबूत पकडीनंतर अचानक शिवराजला त्रास झाल्याने जखमी झाला. शिवराजला गंभीर त्रास होत असल्याचं समजताच त्याला रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. त्यानंतर आयोजकांकडून सोलापूरच्या महेंद्र गायकवाड विजयी घोषित केले. ही अंतिम निकाली कुस्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लावण्यात आली. छत्रपती…
महात्मा बसवेश्वरांनी समता व एकात्मतेचा संदेश दिला – तहसिलदार योगेश चंद्रे जामखेड प्रतिनिधि: धनराज पवार लिंगायत धर्माचे धर्मगुरु, विश्वगुरु महात्मा अर्थात बसवेश्वर महाराज यांचा जन्मदिन वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय तृतीयेला झाला, हा दिवस बसवेश्वर जयंती म्हणून साजरा केला जातो. नैतिक बना, विवेकी बना, स्वतःमध्ये बदल करा. स्वता:मधील दोष दूर करा. कर्मकांड दूर करा. स्वतःची स्तुती करू नका अशी सहज साधी सोपी वाटणारी पण माणसाला घडवणारी बहुमोलाची शिकवण बसवेश्वरांनी दिली आहे.वीर शैव लिंगायत समाज,जामखेड यांच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये आज रोजी जामखेड शहरातील खर्डा चौक येथे सकाळी ११.०० वाजता बसवेश्वर महाराज यांची…
नगर – एमआयडीसी येथील स्नेहालयात चाईल्ड लाईनच्या 20 वर्धापन दिनानिमित्त बाल संरक्षण 2023 च्या पुरस्काराने योगेश पिंपळे यांना प्रशस्तीपत्रक, स्मृतीचिन्ह, पुस्तके भेट देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी बालकल्याण समिती अध्यक्ष ॲड जयंत ओहोळ अॅड.अनुराधा येवले, अॅड.प्रज्ञा हेेंद्रे, अॅड. भाग्यश्री जरंडीकर, संध्या राशिनकर, हनीफ शेख, शाम असावा, प्रविण मुत्याल, दत्तात्रय कवळे, विकेश निमांडे, वैभव देशमुख, राजेंद्र वारे, संजय गुगळे, राजीव गुजर आदि उपस्थित होते. प्रवेश चालू.. यावेळी बाल कल्याण समितीचे अध्यक्ष जयंत ओहोळ यांनी गेल्या 20 वर्षात चाईल्ड लाईनने केलेल्या कामांचा आढावा घेतला. तसेच विविध उपक्रमांची माहिती दिली. श्री.पिंपळे यांनी बाल कामगार, बाल विवाह रोखण्यासाठी प्रयत्न करुन, बाल गुन्हेगारी बाबत चाईल्ड…
MGNREGA Pashu Shed Scheme मनरेगा पशुशेड योजना 2023 फॉर्म PDF डाउनलोड करा | मनरेगा पशुशेड योजना यादी, मनरेगा पशुशेड योजना ऑनलाईन अर्ज करा – शेतकरी आणि पशुपालकांना लक्षात घेऊन केंद्र सरकार अनेक योजना राबवत असते, याच मार्गावर आता केंद्र सरकारने मनरेगा पशुशेड योजना सुरू केली आहे. बिहार, पंजाब, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये राहणाऱ्या पशुपालकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सर्व पशुपालकांना या योजनेत अर्ज करून अनेक फायदे मिळू शकतील, ज्याच्या मदतीने ते त्यांच्या जनावरांची चांगली काळजी घेऊ शकतील. मनरेगा पशुशेड अंतर्गत, सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या खाजगी जमिनीवर जनावरांचे शेड उभारण्यासाठी आर्थिक लाभ दिला जाईल, कारण असे अनेक पशुपालक आहेत जे…
पुणे जिल्हा प्रतिनिधी : बबनराव धायतोंडे तुला सारख्या मुली होतात, तुला मुलगा होत नाही असे म्हणून त्रास देत असत. तसेच सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून दौंड (Daund)तालुक्यातील खोर परिसरात असणाऱ्या मुकदम वाडी येथील एका विवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अश्विनी योगेश चौधरी असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून याबाबत संदेश जयसिंग काळकुटे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून सासु मंदा ज्ञानदेव चौधरी, पती योगेश ज्ञानदेव चौधरी, सासरे ज्ञानदेव सोनबा चौधरी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. गुरुवार दि.२० एप्रिल रोजी ही घटना घडली आहे. याबाबत.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,…
शिर्डीच्या साई मंदिरात आता गेल्या काही वर्षापासून दान म्हणून प्रचंड नाणी मिळाली आहेत. हजारो किलो वजनाचीही नाणी असून ही नाणी ठेवायची कुठे असा प्रश्न ट्रस्टी आणि बँकांना पडला आहे. भाविक साईबाबांचं मनोभावे दर्शन घेतात आणि आपआपल्या कुवतीनुसार साईचरणी भेटही अर्पण करतात. काही लोक सोनं अर्पण करतात. काही चांदी देतात. काही नाणी तर काही नोटा अर्पण करतात. जसा नवस तशी भेट साईबाबांना दिली जाते. मनोकामना पूर्ण झाल्यावर भक्त करोडो रुपयांचे दान करतात. मात्र आता हे दानच आता डोकेदुखी ठरताना दिसत आहे. हजारो किलोंची नाणी साई मंदिर ट्रस्टकडे जमा झालेली आहे. ही नाणी ठेवायची कुठे? असा प्रश्न फक्त साई मंदिर ट्रस्टलाच नाही…