जामखेड (प्रतिनिधी)
जामखेड तालुक्यातील वाकी येथील पे जल योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा कामात अपहार झाल्या प्रकरणी पंचायत समिती जामखेड या ठिकाणी मंगळवार दिनांक ३ जानेवारी रोजी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे हे जामखेड तालुक्यातील कार्कर्त्यांसमवेत पंचायत समिती जामखेड कार्यालयासमोर उपोषणास बसणार होते . यासंदर्भात गटविकास अधिकारी प्रकाश पौळ यांनी दखल घेऊन आठ दिवसात वाकी गावातील दलित वस्ती सह चार वस्त्यांना पाणी पुरवठा सुरळीत होईल
एक कॅच पकडला अन सामना पलटला; संपूर्ण क्रिकेट जगतात सुरू झालाय वाद, वाचा नेमकं कारण काय ?
असे आश्वासन दिल्याने आर. पी. आय.चे उपोषण मागे घेण्यात आले. जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अहमदनगर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली होती.या कामाची विस्तार अधिकारी बी.के माने,शाखा अभियंता जी. एस.भोसले ,उपअभियंता माने साहेब यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.त्याचा सविस्तर अहवाल पंचायत समिती जामखेड यांना सादर केला.
दिनांक ३ जानेवारी रोजी पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रकाश पौळ यांनी योजनेतील त्रुटी दूर करून आठ दिवसात वाकी गावासह दलित वस्ती चा पे जल योजनेअंतर्गत पाणीपुरवठा आठ दिवसात सुरळीत होईल असे लेखी आश्वासन दिले.त्यामुळे उपोषण आठ दिवसासाठी स्थगित घेण्यात आले आहे.
कर्करोगाशी झुंज अपयशी, चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन
यावेळी आर.पी.आय चे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे,जामखेड तालुका उपाध्यक्ष शिवाजी साळवे,सुजित धनवे,महिला आघाडी जामखेड तालुकाध्यक्ष रुक्साना पठाण,बापू जावळे,युवराज गायकवाड, कार्याध्यक्ष खंडू मोरे,आदी आर.पी.आय.चे कार्यकर्ते उपस्थित होते.
